शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

संवादातून जनतेच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: November 19, 2014 23:19 IST

नीतेश राणे : कणकवली मतदारसंघातील तीन तालुक्यात गावभेट कार्यक्रम

कणकवली : प्रत्येक गावाचा विकास करीत असताना संवाद महत्वाचा आहे. जनतेचा विश्वास दृढ केला जात असतानाच संवादाच्या माध्यमातून समस्याही तत्काळ सोडविण्यात येतील. आमदार आणि जनता असा भेद न करता एकाच कुटुंबातील आपण सदस्य आहोत या भावनेतून गावाबरोबरच तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत होऊया, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले. आमदार नीतेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील तीन तालुक्यात गावभेटीचा कार्यक्रम सुरु केला आहे. बुधवारी खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील तळेरे, साळिस्ते, शिडवणे, वारगाव, कुरंगवणे, शेर्पे या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यापुढे ग्रामस्थांनी कोणत्याही समस्या आपल्यासमोर मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या गावभेट कार्यक्रमाच्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा वळंजू, बाळा जठार, काँग्रेस विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, पंचायत समिती सदस्य भिकाजी कर्ले, सोनाली शिर्सेकर उपस्थित होते.आमदार नीतेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, मतदानाच्या माध्यमातून तुम्ही मला आशीर्वाद दिला आहे. तुमच्या गावाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. ती निश्चितपणे पार पाडण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कोणती विकासकामे पूर्ण करून हवी आहेत ते मला सांगावे. त्याप्रमाणे अग्रक्रम देऊन विकासकामे पूर्ण केली जातील. संवादाच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडतानाच प्रलंबित असलेल्या कामांची आठवण करून दिल्यास आम्हाला काम करणे सोपे जाईल. एक दुसऱ्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊया. या भागाचा आमदार म्हणून तुमचा माझ्यावर हक्क आहे. त्या हक्कानेच तुम्ही कोणतेही विकासकाम सांगितल्यास ते तत्काळ पूर्ण करण्यात येईल.(वार्ताहर)खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील गावभेटीदरम्यान आमदार नीतेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.