शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

सुरक्षारक्षक, कामगार संस्थेने पारदर्शीपणा सिध्द करावा

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

समविचारी मंच : नोंदणी शुल्क भरल्यानंतर काहीच न कळवल्याने संभ्रम

रत्नागिरी : बेरोजगारांच्या फसवणुकीचा अवलंब करीत एकामागोमाग एक प्रकार रत्नागिरीत उघड होत असतानाच सुरक्षारक्षक भरती आणि सेवा देणाऱ्या एका संस्थेचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न समविचारी मंचने केल्याने संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या संस्थेने आपले पारदर्शक कामकाज जाहीर करावे, अशी मागणी समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये, जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, तालुकाध्यक्ष संजय नागवेकर, सरचिटणीस तुकाराम दुड्ये, युवा आघाडीप्रमुख नीलेश आखाडे यानी केली आहे.राज्य सुरक्षारक्षक अ‍ॅण्ड जनरल कामगार युनियन, मुंबई या नावाने रत्नागिरी कुवारबाव येथे सुमारे दोन वर्षे संलग्न कार्यालय सुरु आहे. स्थानिक बेरोजगारांनी समविचारींशी संपर्क साधून रत्नागिरी शाखेविषयीच्या आपल्या तक्रारी मांडल्या. त्यानुसार, प्रत्येक बेरोजगार युवकाकडून तीनशे रुपये प्रवेशशुल्क वसूल करण्यात येते. सुरक्षारक्षकाची सेवा पुरवण्याची तोंडी हमी देऊन उमेदवारांना लेखी, तोंडी, परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि इतर सेवा शर्ती पूर्ण केल्यावर सेवा देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे संबंधित उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केले.कुवारबाव येथील कार्यालयात समविचारींनी संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज आणि सत्यासत्यतेची पडताळणी करण्यासाठी धडक मारली. त्यावेळी हे कार्यालय मागील आठवडाभर बंद आहे.कार्यालयाच्या अनियमीत कामकाजामुळे अनेक बेरोजगारांना पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. अनेक बेरोजगारांनी नोंदणी शुल्क भरुन गेले कित्येक महिने आम्हा बेरोजगारांना कोणतीही परीक्षा वा इतर काहीच न कळवल्याने या संस्थेविषयी संशयाची भावना निर्माण झाली असल्याचे ढोल्ये यांनी यावेळी सांगितले.बंद कार्यालयावरील नमूद असलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधताच कार्यालय उघडण्याची परवानगी मला नाही, असे सांगून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे संपर्क नंबर दिले. यावेळी या कार्यालयाविषयी असणारे आक्षेपांचे निराकरण करून संस्था कार्यपद्धती, पुरविलेले रोजगार, सदस्य संख्या शासकीय मान्यता, नोंदणीची सत्यता याविषयीचे शंका निरसन येत्या आठवड्यात करावे अन्यथा कार्यालय चालू करु देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, युवा प्रमुख नीलेश आखाडे यांनी यावेळी दिला.समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये यांनी या संस्थेविषयी आलेल्या तक्रारींची शहानिशा झालीच पाहिजे, असे सांगून स्थानिक उमेदवारांच्यावतीने आम्ही जरुर पडल्यास पुढील आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पत्र दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)