शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

प्रचार संपला; जोडण्या सुरू

By admin | Updated: February 19, 2017 22:58 IST

निवडणूक यंत्रणा सज्ज : आज मतपेट्या होणार रवाना

कणकवली / रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार रविवारी संपला आहे. उद्या, मंगळवारी मतदान होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४९८ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६६२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंदिस्त होणार आहे. अधिकृत प्रचार संपला असला तरी मतदानाच्या दिवसापर्यंत विविध प्रकारे छुपा प्रचार सुरूच राहणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप आणि घरोघरी प्रचाराचा धुरळा आता संपला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून आज, सोमवारी मतपेट्या रवाना होणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी ६५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत जिल्हा परिषदेचे ५, तर पंचायत समितीचे ६ उमेदवारी अर्ज बाद ठरविले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या २२६ उमेदवारांपैकी ५३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ५० जागांसाठी १७३ उमेदवार राहिले आहेत. तसेच पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ४१६ उमेदवारांपैकी १०० उमेदवारांनी माघार घेतल्याने ३१६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांसह अपक्ष तसेच बंडखोर उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा परिषद आपल्याकडे खेचून घेण्यासाठी शिवसेना तसेच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृतरीत्या या पक्षांची युती नसली तरी अनेक ठिकाणी छुपी युती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यात ६६२ उमेदवार रिंगणातरत्नागिरी : जिल्हा परिषद व ९ पंचायत समितींच्या उद्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली राजकीय पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली. मात्र, त्याआधीच दोन दिवस छुप्या गाठीभेटींना वेग आला आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५५ तर जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या ११० जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सेना, भाजप व राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडी अशा तिरंगी लढती होत आहेत, तर काही ठिकाणी कॉँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. गेल्या महिनाभरापासून या जिल्ह्यातील गावागावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू होती. भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेनेतर्फे पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, तर राष्ट्रवादीतर्फे आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांनी स्टार प्रचारक म्हणून काम पाहिले. प्रत्येक उमेदवाराचे स्वतंत्र निवडणूक वचननामा पत्रकही मतदारांपर्यंत पोहोचले आहे. त्यानंतर पक्षाचा जाहीरनामाही मतदारांच्या हाती देण्यात आला आहे. काही उमेदवारांच्या प्रचारात महिलांच्या गटांनीही आघाडी घेतली. (प्रतिनिधी)