शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांची पायपीट सुरुच

By admin | Updated: October 5, 2015 00:07 IST

गडनदी प्रकल्प : पाटबंधारे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

सुभाष कदम- चिपळूण --सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजीवली, रातांबी, कुटगिरी- येडगेवाडी येथे पाटबंधारे खात्यातर्फे गडनदी प्रकल्प उभारण्यात आला. परंतु, येथील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना रस्त्याअभावी एस. टी. बस बंद पडल्याने १२ कि. मी.ची पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागण्यांकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त आपला घर संसार, सामानसुमान घेऊन पाटबंधारे कार्यालयात संसार थाटणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे खाते, उपविभागीय अधिकारी, चिपळूण व संगमेश्वर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना ठिय्या आंदोलनाबाबत नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसमध्ये आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचण्यात आला आहे. गडनदी प्रकल्प येण्यापूर्वी कुटगिरी येडगेवाडीचा रस्ता हा नदीतून जात होता. धरण क्षेत्रात राजीवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत ९ वाड्यांचा समावेश आहे. धरणक्षेत्रात येणाऱ्या ७ वाड्यांचे पुनर्वसन धरणालगतच करण्यात आले. कुटगिरी - बौद्धवाडीचे पुनर्वसन खेरशेत(चिपळूण) येथे करण्यात आले. शिर्केवाडी व घाडगेवाडी शासकीय पुनर्वसन गावठाणे येथे करण्यात आले. कदमवाडी, निकमवाडी व राजीवली- बौद्धवाडी यांनी स्वेच्छा पुनर्वसन करुन धरणाशेजारीच आपल्या जमिनीत राहण्याचा निर्णय घेतला. पाटबंधारे खात्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे रातांबी आणि राजिवली - काळंबेवाडी यांच्या पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडले आहे. या सर्व वाड्या धरणाच्या उजव्या बाजूला एकाच मार्गावर प्रस्थापित झाल्या तर येडगेवाडीचे पुनर्वसन न करता या वाडीला नागरी सुविधा देण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी संतोषकुमार यांनी मान्य केले होते. त्याला अनुसरुन प्रशासनाने संयुक्त पुनर्वसन गावठाणे रिंगरोडने जोडण्यासाठी १५ कि. मी. चा रिंगरोड तयार करण्याचे निश्चित झाले. सन २००५मध्ये या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाला चालढकल सुरु आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याने प्रकल्पग्रस्त हैराण झाले आहेत.वारंवार केलेल्या मागणीनंतर १० कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. परंतु, हे कामही निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून प्रयत्न केले. प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराने ३ कि. मी. पैकी ६३० मीटर बी. बी. एम.चे काम झाले. उर्वरीत काम अपूर्ण असल्याने या मार्गावरील एस. टी. बस बंद झाल्याने आता प्रकल्पग्रस्तांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आंदालनाचा इशारा दिला आहे.कार्यालयातच ठिय्या आंदोलन करणारगड प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलने केली.पावसाळ्याच्या तोंडावर केवळ ३ कि.मी.पैकी ६३० मीटर रस्ता डांबरीकरण करुन केली बोळवण.पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभाराचा रातांबी व राजीवली ग्रामस्थांना फटका.रस्ता नादुरुस्त असल्याने येडगेवाडी एस. टी. सेवा बंद.आता घरसंसार घेऊन पाटबंधारेच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करुन तेथे संसार मांडण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंतांसह उपविभागीय अधिकारी , पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनाही दिली नोटीस.