शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्रकल्पग्रस्तांची पायपीट सुरुच

By admin | Updated: October 5, 2015 00:07 IST

गडनदी प्रकल्प : पाटबंधारे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

सुभाष कदम- चिपळूण --सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजीवली, रातांबी, कुटगिरी- येडगेवाडी येथे पाटबंधारे खात्यातर्फे गडनदी प्रकल्प उभारण्यात आला. परंतु, येथील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना रस्त्याअभावी एस. टी. बस बंद पडल्याने १२ कि. मी.ची पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागण्यांकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त आपला घर संसार, सामानसुमान घेऊन पाटबंधारे कार्यालयात संसार थाटणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे खाते, उपविभागीय अधिकारी, चिपळूण व संगमेश्वर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना ठिय्या आंदोलनाबाबत नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसमध्ये आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचण्यात आला आहे. गडनदी प्रकल्प येण्यापूर्वी कुटगिरी येडगेवाडीचा रस्ता हा नदीतून जात होता. धरण क्षेत्रात राजीवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत ९ वाड्यांचा समावेश आहे. धरणक्षेत्रात येणाऱ्या ७ वाड्यांचे पुनर्वसन धरणालगतच करण्यात आले. कुटगिरी - बौद्धवाडीचे पुनर्वसन खेरशेत(चिपळूण) येथे करण्यात आले. शिर्केवाडी व घाडगेवाडी शासकीय पुनर्वसन गावठाणे येथे करण्यात आले. कदमवाडी, निकमवाडी व राजीवली- बौद्धवाडी यांनी स्वेच्छा पुनर्वसन करुन धरणाशेजारीच आपल्या जमिनीत राहण्याचा निर्णय घेतला. पाटबंधारे खात्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे रातांबी आणि राजिवली - काळंबेवाडी यांच्या पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडले आहे. या सर्व वाड्या धरणाच्या उजव्या बाजूला एकाच मार्गावर प्रस्थापित झाल्या तर येडगेवाडीचे पुनर्वसन न करता या वाडीला नागरी सुविधा देण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी संतोषकुमार यांनी मान्य केले होते. त्याला अनुसरुन प्रशासनाने संयुक्त पुनर्वसन गावठाणे रिंगरोडने जोडण्यासाठी १५ कि. मी. चा रिंगरोड तयार करण्याचे निश्चित झाले. सन २००५मध्ये या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाला चालढकल सुरु आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याने प्रकल्पग्रस्त हैराण झाले आहेत.वारंवार केलेल्या मागणीनंतर १० कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. परंतु, हे कामही निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून प्रयत्न केले. प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराने ३ कि. मी. पैकी ६३० मीटर बी. बी. एम.चे काम झाले. उर्वरीत काम अपूर्ण असल्याने या मार्गावरील एस. टी. बस बंद झाल्याने आता प्रकल्पग्रस्तांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आंदालनाचा इशारा दिला आहे.कार्यालयातच ठिय्या आंदोलन करणारगड प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलने केली.पावसाळ्याच्या तोंडावर केवळ ३ कि.मी.पैकी ६३० मीटर रस्ता डांबरीकरण करुन केली बोळवण.पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभाराचा रातांबी व राजीवली ग्रामस्थांना फटका.रस्ता नादुरुस्त असल्याने येडगेवाडी एस. टी. सेवा बंद.आता घरसंसार घेऊन पाटबंधारेच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करुन तेथे संसार मांडण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंतांसह उपविभागीय अधिकारी , पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनाही दिली नोटीस.