शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

रॅलीतून नोंदविला निषेध

By admin | Updated: November 5, 2014 00:04 IST

जवखेडे हत्याकांड : आरोपींना पकडण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावात झालेल्या दलित हत्याकांडाचा कुडाळ तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्यावतीने शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या हत्याकांडातील सर्व आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला लाजविणारे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावातील दलित जाधव कुटुंबियांचे हत्याकांड ठरले आहे. या हत्याकांडाच्या विरोधात निषेध करण्यासाठी व यातील आरोपींना पकडून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी राज्यातील दलित समाजबांधव एक झाले असून ठिकठिकाणी मोर्चे काढून याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. या अनुषंगाने कुडाळ तालुका आरपीआय पक्षाच्यावतीने कुडाळ शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीचे नेतृत्व आरपीआयचे कुडाळ तालुकाध्यक्ष आत्माराम कुडाळकर यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, जिल्हा सचिव सत्यवान साठे, जयभीम युवक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार जाधव, माजी पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र कदम, आरपीआय शहराध्यक्ष बाबूराव केळूसकर, विद्याधर कुडाळकर, मिलिंद जाधव, भूषण कुडाळकर, प्रसाद जाधव, सागर कुडाळकर, स्मिता नाईक, बाबा सोनवडेकर, अभय जाधव, भगवान कदम, बाबली जाधव, सहदेव आरोसकर, पी. डी. कदम, दिनेश जाधव, अंकिता जाधव, संतोष सरमळकर व अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी चौक, जिजामाता चौक, पोलीस ठाणे मार्गे प्रांत कार्यालयात दाखल झाली. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनीही, या हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला असून यासंदर्भात विधीमंडळात आवाज उठविण्याचे आश्वासन आरपीआयच्या कार्यकर्त्यांना दिले. (प्रतिनिधी)मागण्या वरिष्ठांपर्यंत नेण्याचे आश्वासनयावेळी या मोर्चाला उद्देशून बोलताना मुख्य पदाधिकारी यांनी, महाराष्ट्राचा लौकिक आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडातील आरोपींना फाशी होईपर्यंत ही लढाई अशीच सुरू ठेवावी लागणार असल्याचे सांगितले. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांना निवेदन दिले. या हत्याकांडाचा तपास अत्यंत धिम्या गतीने होत असून तो सीबीआयकडे देण्यात यावा, तपासात हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटीखाली कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्या वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी दिले.