शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

By admin | Updated: June 23, 2015 00:55 IST

दत्तात्रय शिंदे : रात्रीच्यावेळी गस्तीपथक वाढविणार

सिंधुदुर्गनगरी : सध्या जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या हा अतिशय संवेदनशील विषय आहे. या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी व गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी तीन प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये संवेदनशील व गुन्हे प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी गस्तीपथक वाढविणे व प्रथम, द्वितीय प्रभारी पोलीस अधिकारी गस्ती घालून या सर्वांचा आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले की, वाढत्या चोऱ्यांचा विषय हा चिंतेचा विषय आहे. साधारणत: जून महिन्यात पावसाचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रकार होत आहेत. यापूर्वीच्या काही वर्षातील चोऱ्यांच्या गुन्ह्याचा आढावा घेतला तर जून महिन्यातच जास्त चोऱ्या झाल्याचे उघड झाले आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी तीन नवीन उपाययोजना आखल्या आहेत. यामध्ये फिक्स पॉईड, गस्ती वाढविणे व या दोघांवर प्रथम व द्वितीय दर्जाचे पोलीस अधिकारी लक्ष ठेवून ते स्वत: गस्त घालणार आहेत.दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना बसणार चपराकजिल्ह्यात पाऊस सक्रीय झाल्याने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांसाठी गोवा, कर्नाटक राज्याप्रमाणेच इतर ठिकाणांहून आंबोली येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्या ठिकाणी जर काही अतिउत्साही पर्यटक दारु पिऊन धिंगाणा घालत असतील तर ते गैर आहे. त्यामुळे अशा पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात सुरक्षित पर्यटन व्हावे यासाठी पर्यटक सुरक्षा व नियमन पथकांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. तसेच आंबोली येथील वर्षा पर्यटन स्थळावर शनिवार व रविवार विशेष वाढीव पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे.जिल्ह्यात कोठेही गावठी दारु काढणारे, बाळगणारे व विकणारे लोक मिळून आल्यास त्यांच्याविरूद्ध तत्काळ कारवाई करा असेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात आपत्कालीनसाठी १०० नंबर, महिला सुरक्षा संबंधित व लहान मुलांच्या संबंधित सुरक्षा संबंधित १०९१ व सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने १०९३ असे टोल फ्री नंबर असून या संबंधी काही घडना घडल्यास या नंबरशी संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता असे आवाहनही यावेळी दत्तात्रय शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. (प्रतिनिधी) आपत्तीच्या ठिकाणी तातडीने पोहोचाजिल्ह्यात अतिवृष्टी, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तसेच दरडी कोसळल्यास सर्वसामान्यांना मदतीच्या दृष्टीने प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांने सतर्क रहा. आपत्ती निर्माण झाली तर तत्काळ घटनास्थळी पोहोचा. महामार्गावर झाड उन्मळून पडले तर ते तोडून बाजूला करण्यासाठी गाडीमध्ये कायमस्वरूपी कुऱ्हाड व करवत ठेवा असे आदेशही सर्व पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.