शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

काँग्रेसचे सोमवारी राज्यभर रास्ता रोको

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

हरिष रोग्ये : सरकारविरोधी आक्रमक मुद्दे मांडण्याचा नेत्यांचा निर्धार

राजापूर : यापूर्वी विविध प्रकारची आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-सेनेच्या युती शासनाने १०० दिवसांचा कालावधी पूर्ण केला असून, दिलेल्या आश्वासनांची कुठलीच पूर्तता केलेली नाही. भांडवलदारांसाठी योजना राबवणाऱ्या या शासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, त्यांच्या अपयशी कामकाजाविरुद्ध काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभर रास्ता राको आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरले आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजपने जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेले नाहीत. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना हे शासन दिसत नाही. या सरकारला भाववाढदेखील रोखता आलेली नाही, असा आरोप रोग्ये यांनी केला.सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षात एकवाक्यता नाही. भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांचे नाराजी नाट्य कायम आहे. एलबीटी, टोलबाबत योग्य भूमिका घेऊ, असे सांगणाऱ्या आजच्या सत्ताधाऱ्यांनी ते रद्द करण्यासाठी काहीच केलेले नाही, तर केंद्रातील सरकारची अवस्थाही याहून वेगळी नसल्याचे रोग्ये म्हणाले.केवळ मोदी हेच सर्वेसर्वा आहेत. अमेरिकेसोबत कोणते करार झाले, त्याचा लेखाजोखा अद्याप जनतेपुढे आलेला नाही. देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यादेखील परराष्ट्र धोरण ठरवताना कुठेच दिसत नाहीत. फक्त आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आला आहे.भांडवलदारांचे लांगुलचालन करणे हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे लागत नाही. त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेला कळावा, यासाठी काँग्रेसने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात रास्ता रोको करुन सरकारचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा प्रदेश प्रवक्ते रोग्ये यांनी दिला. (प्रतिनिधी)