शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

काँग्रेसचे सोमवारी राज्यभर रास्ता रोको

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

हरिष रोग्ये : सरकारविरोधी आक्रमक मुद्दे मांडण्याचा नेत्यांचा निर्धार

राजापूर : यापूर्वी विविध प्रकारची आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-सेनेच्या युती शासनाने १०० दिवसांचा कालावधी पूर्ण केला असून, दिलेल्या आश्वासनांची कुठलीच पूर्तता केलेली नाही. भांडवलदारांसाठी योजना राबवणाऱ्या या शासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, त्यांच्या अपयशी कामकाजाविरुद्ध काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभर रास्ता राको आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरले आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजपने जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेले नाहीत. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना हे शासन दिसत नाही. या सरकारला भाववाढदेखील रोखता आलेली नाही, असा आरोप रोग्ये यांनी केला.सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षात एकवाक्यता नाही. भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांचे नाराजी नाट्य कायम आहे. एलबीटी, टोलबाबत योग्य भूमिका घेऊ, असे सांगणाऱ्या आजच्या सत्ताधाऱ्यांनी ते रद्द करण्यासाठी काहीच केलेले नाही, तर केंद्रातील सरकारची अवस्थाही याहून वेगळी नसल्याचे रोग्ये म्हणाले.केवळ मोदी हेच सर्वेसर्वा आहेत. अमेरिकेसोबत कोणते करार झाले, त्याचा लेखाजोखा अद्याप जनतेपुढे आलेला नाही. देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यादेखील परराष्ट्र धोरण ठरवताना कुठेच दिसत नाहीत. फक्त आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आला आहे.भांडवलदारांचे लांगुलचालन करणे हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे लागत नाही. त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेला कळावा, यासाठी काँग्रेसने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात रास्ता रोको करुन सरकारचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा प्रदेश प्रवक्ते रोग्ये यांनी दिला. (प्रतिनिधी)