शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे सोमवारी राज्यभर रास्ता रोको

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

हरिष रोग्ये : सरकारविरोधी आक्रमक मुद्दे मांडण्याचा नेत्यांचा निर्धार

राजापूर : यापूर्वी विविध प्रकारची आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-सेनेच्या युती शासनाने १०० दिवसांचा कालावधी पूर्ण केला असून, दिलेल्या आश्वासनांची कुठलीच पूर्तता केलेली नाही. भांडवलदारांसाठी योजना राबवणाऱ्या या शासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, त्यांच्या अपयशी कामकाजाविरुद्ध काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभर रास्ता राको आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरले आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजपने जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेले नाहीत. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना हे शासन दिसत नाही. या सरकारला भाववाढदेखील रोखता आलेली नाही, असा आरोप रोग्ये यांनी केला.सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षात एकवाक्यता नाही. भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांचे नाराजी नाट्य कायम आहे. एलबीटी, टोलबाबत योग्य भूमिका घेऊ, असे सांगणाऱ्या आजच्या सत्ताधाऱ्यांनी ते रद्द करण्यासाठी काहीच केलेले नाही, तर केंद्रातील सरकारची अवस्थाही याहून वेगळी नसल्याचे रोग्ये म्हणाले.केवळ मोदी हेच सर्वेसर्वा आहेत. अमेरिकेसोबत कोणते करार झाले, त्याचा लेखाजोखा अद्याप जनतेपुढे आलेला नाही. देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यादेखील परराष्ट्र धोरण ठरवताना कुठेच दिसत नाहीत. फक्त आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आला आहे.भांडवलदारांचे लांगुलचालन करणे हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे लागत नाही. त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेला कळावा, यासाठी काँग्रेसने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात रास्ता रोको करुन सरकारचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा प्रदेश प्रवक्ते रोग्ये यांनी दिला. (प्रतिनिधी)