शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

राणेंच्या आरोपांवर प्रदेश कॉँग्रेसचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:12 IST

अनंत जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या स्वभावानुसार काँग्रेस नेत्यांवर टीका करणार हे गृहीत आहे. यावर उपाय म्हणून प्रदेश काँग्रेसकडून टीकेला उत्तर न देता मौन धारण करण्याची रणनीती आखण्यात आली असून, याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याचे निर्देशही नूतन जिल्ह्याध्यक्ष विकास सावंत ...

अनंत जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या स्वभावानुसार काँग्रेस नेत्यांवर टीका करणार हे गृहीत आहे. यावर उपाय म्हणून प्रदेश काँग्रेसकडून टीकेला उत्तर न देता मौन धारण करण्याची रणनीती आखण्यात आली असून, याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याचे निर्देशही नूतन जिल्ह्याध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत. यामुळे राणे पक्षातून गेले तर काँग्रेसवर याचा कोणताही फरक पडत नाही हेही दिसून येईल आणि राणेंच्या आरोपातील हवा निघून जाईल, असे मानले जात आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेस सोडणार, अशी चर्चा गेले कित्येक महिने सुरू आहे. मात्र, आता राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश लक्षात घेता काँग्रेसनेही तशी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यापूर्वी प्रदेश काँग्रेसच्यावतीने एक शिष्टमंडळ जिल्ह्यात पाठविले होते. मात्र, यावेळी झालेल्या बैठकीत राणे समर्थकांनीच प्रदेश स्तरावरून आलेल्या नेत्यांना धारेवर धरत ही बैठक हायजॅक केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पक्षात फूट पाडत असल्याचा आरोपही यावेळीआमदार नीतेश राणे यांनी केला होता.या बैठकीचा अहवाल खासदार हुसेन दलवाई यांनी प्रदेश काँग्रेसला दिला होता. या अहवालानुसार अखिल भारतीय काँग्रेसने शनिवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली आहे. ही बरखास्ती राणे यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच राणे यांनी आपल्या निशाण्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांना घेतले आहे.मात्र, राणे यांची टीका काँग्रेसने गृहीतच धरली होती. त्यामुळे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर न देण्याची रणनीती कॉँग्रेसने आखली आहे..यामुळे राणेच्या आरोपातील हवा निघून जाईल. राणे हे काँग्रेसमधून गेलेच तर त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, हेही यातून दिसून येईल, अशी पक्षाची भूमिका आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राणेंच्या कोणत्याच टीकेला उत्तर देत नसून, त्यांनी आपल्या सहकाºयांनाही उत्तर द्यायचे नाही असे सांगितले आहे.प्रदेश काँग्रेसच्या या रणनीतीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्याचे आदेशही नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसची जशी रणनीती असेल, तसे आम्ही काम करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले. राणे किंवा अन्य नेत्यांनी आपल्यावर योकाचे व्यक्तिगत पातळीवरचे आरोप केले तर त्याचा खुलासा मात्र करणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.चौकटरणनीती नाही, मात्र आम्ही ठरविले : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणनारायण राणे हे आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे ते आमच्यावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तरीही त्यांनी पक्षावर टीका केली तर आम्ही त्यावर प्रत्युत्तर देणार नाही. ही रणनीती नाही, मात्र आम्ही तसे ठरविले आहे. पक्षाचे काम करून पक्ष मोठा करणे हे आमचे धोरण आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सिंधुदुर्गमध्ये सभासद नोंदणी झाली नाही. याच्या तक्रारी प्रदेश काँग्रेसकडे आल्या होत्या. ही नोंदणी न होणे म्हणजे तेथे पक्षाचे काम नसल्याचे लक्षण आहे. मात्र, आता नवीन अध्यक्ष दिले आहेत. ते चांगल्याप्रकारे काम करतील, अशी आशा यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केली.