शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सत्ता कोणाचीही, विरोधक सक्षमच

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

वैभववाडी नगरपंचायत : विरोधकांच्या साठेमारीत काँग्रेसची सरशी

प्रकाश काळे - वैभववाडी--नगरपंचायतीच्या निवडणुकीने वैभववाडीच्या राजकारणाचे विविध कंगोरे उलगडून दाखविले आहेत. आमदार नीतेश राणेंनी तळ ठोकल्यामुळे काँग्रेसने राखलेली पत, प्रमोद रावराणेंच्या खेळीमुळे भाजपने मारलेली मुसंडी आणि शिवसेनेत परतून जयेंद्र रावराणेंनी स्वत:च्या ताकदीवर काँग्रेसच्या नाकावर टिच्चून प्रतिष्ठेच्या दोन जागांवर मिळवलेला विजय, या बाबी वैभववाडीचे राजकारण अधोरेखित करणाऱ्या ठरल्या आहेत. या तिघांनीही आपापल्या परीने प्रतिष्ठा जपली आहे. परंतु आघाडी न केल्याने नामुष्कीजनक पराभवाला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी इतकीच सत्तेच्या उंबरठ्यानजीक पोहोचलेल्या काँग्रेसला पक्ष आणि राणेंच्या प्रतिष्ठेची प्रभाग एकची जागा गमवावी लागली. त्याचप्रमाणे प्रभाग सहामधील मैत्रीपूर्ण लढतीत महायुतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नगरपंचायतीत सत्ता कोणाचीही येवो, विरोधक सक्षम असणार एवढे मात्र नक्की आहे.वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक विकासाच्या गप्पांपेक्षा आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे आणि काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या जयेंद्र रावराणे यांच्या नेतृत्वाभोवताली फिरत राहिली होती. राणेंच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी भाजपचे प्रमोद रावराणे आणि शिवसेनेच्या जयेंद्र रावराणेंनी मोजक्या कार्यकर्त्यांच्या साथीने आपल्या हिमतीवर मिळवलेले यश खरोखरच वाखाणण्यासारखे असून आमदार राणेंनी निवडणूक काळात तळ ठोकला नसता तर या रावराणे द्वयींनी काँग्रेसची काय अवस्था केली असती याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.कणकवली नगरपंचायतीची सत्ता राणेंच्या ताब्यातून संदेश पारकर गटाच्या ताब्यात गेल्यामुळे आमदार राणे यांनी संपूर्ण लक्ष वैभववाडीवर केंद्र्रीत केले होते. त्यामुळेच ते नगरपंचायतीच्या निकालापर्यंत वैभववाडीकर बनले होते. २१ दिवसांच्या येथील मुक्कामात आमदार नीतेश राणे यांनी फक्त वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करून गुप्त यंत्रणा राबवत प्रत्येक मतदाराच्या उंबऱ्याला पाय लावून मते मागितली. त्यामुळे काँग्रेस पक्ष सात जागा जिंकून सत्तेच्या जवळपास पोहोचला आहे. मात्र, काँग्रेसला स्पष्ट बहुमतापासून रोखण्याची किमया शिवसेनेच्या जयेंद्र रावराणेंनी केली आहे.दहा महिन्यांपूर्वी राणेंपासून फारकत घेऊन स्वगृही परतलेल्या जयेंद्र रावराणेंच्या मुलास पराभूत करून आमच्यापासून दुरावल्यावर काय होते हे रावराणेंना दाखवून देत त्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा चंग आमदार राणे आणि काँग्रेसने बांधला होता. परंतु जयेंद्र रावराणेंनी एका मताने आपल्या सुपुत्राच्या गळ्यात विजयाची माळ घालून राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून दिला. त्यामुळे प्रभाग एकमध्ये जयेंद्र्र रावराणेंकडून झालेला पराभव काँग्रेस पक्ष आणि खुद्द राणेंच्याही जिव्हारी लागणारा आहे. रावराणेंनी प्रभाग एक प्रमाणेच प्रभाग अकरामध्ये आपला मुत्सद्दीपणा आणि राजकीय कसब पणास लावत काँग्रेसचा पराभव करून शिवसेनेच्या संतोष पवार यांना निवडून आणले. त्यामुळे वैभववाडीच्या राजकारणात आपण आजही वाघच आहोत. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे काँग्रेसने आपली घुसमट केली होती, हेही रावराणेंनी या निकालातून दाखवून दिले आहे.काँग्रेसच्या विजयात भाजपच्या प्रमोद रावराणेंनी अडथळा निर्माण केला. रावराणेंनी आमदार नीतेश राणेंच्या राजकीय डावपेचांना छेद देत भाजपचे तीन उमेदवार निवडून आणल्याने बिनविरोध सुप्रिया तांबेसह भाजपचे संख्याबळ चारवर नेऊन नेतृत्वाची चुणूक दाखवली. प्रभाग आठमध्ये नातेसंबंधातील हक्काची सतरा ते अठरा मते असताना काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून प्रमोद रावराणेंनी मनीषा मसूरकर हिला निवडून आणत काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला. प्रमोद रावराणेंना माजी आमदार प्रमोद जठार यांचे चांगले पाठबळ लाभल्यामुळे प्रमोद रावराणेंनी प्रभाग आठ आणि बारामध्ये काँग्रेसचा पराभव करून राजकीय कौशल्य दाखवून देत सत्तेसाठी विकास आघाडीकडे हात पसरण्याची वेळ काँग्रेसवर आणली.काँग्रेसशी काडीमोड घेत स्वबळावर निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादीला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक व माजी उपसरपंच गुलाबराव चव्हाण यांच्या घरच्या मैदानात त्यांच्या कन्येला पराभूत करून आघाडी तोडल्याचा पुरेपूर वचपा काँग्रेसने काढला. खरेतर प्रभाग चार हा चव्हाण यांचा हक्काचा मतदारसंघ असल्याने या प्रभागात त्यांच्या कन्येला पराभूत करणे सहज शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे व दिलीप रावराणे यांनी या प्रभागाची जबाबदारी नासीर काझी व माजी अध्यक्ष दिगंबर पाटील यांच्यावर सोपवत राजकीय खेळी खेळली होती. परंतु, काझी-पाटील या जुन्या जोडगोळीने अशक्य असलेला विजय सहज मिळवून दिला आहे. त्यामुळे जुन्यांची जोडगोळीने पक्षांतर्गत परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत पक्षाची प्रतिष्ठाही जपली आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संशयाचे ढगराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अबिद नाईक, आदी राष्ट्रवादीचे नेते नामनिर्देशनपत्र सादर करताना वैभववाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसने अपेक्षित जागा न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढवू असे जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसशी काडीमोड घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र, पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हे नेते फिरकलेही नाहीत. त्यामुळे काँग्रेसशी घेतलेली काडीमोड नेत्यांना आवडली नाही की काँग्रेसने त्यांना थांबवले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.विश्लेषण : आमदारांचे यशनगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने महायुतीशी टक्कर देत सत्तेच्या दारापर्यंत झेप घेतली. हे संपूर्ण यश आमदार नीतेश राणे यांचे आहे. त्यामुळेच प्रभाग एक, आठ, अकरा आणि बारामधील धक्कादायक पराभवातून साठे, रावराणे सहिसलामत सुटले. आमदार राणेंनी वैभववाडीत तळ ठोकला नसता तर या पराभवाचे धनी साठे, रावराणेच ठरले असते. या विजयातूनही काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे.