शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

विकासाची क्षमता विरोधकांत नाही

By admin | Updated: August 17, 2014 22:34 IST

नारायण राणे : वैभववाडीतील कार्यक्रमात टीका

वैभववाडी : जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता विरोधकांमध्ये नाही आणि जठारांमध्ये ती पात्रता नाही हे जनतेला पटवून द्या, असे आवाहन राणे यांनी केले.ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि पंचायत समिती इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, सभापती नासीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने आदी उपस्थित होते.राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आनेवाले है असे सांगून सत्तेवर येताच महागाईत वाढ करून जनतेला फसविले आहे. जिल्ह्याचा विकास करायला मोदी इथे येणार नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना जनतेने यापुढे बळी पडू नये. लोकसभा निवडणुकीत वैभववाडी तालुक्याने हवी तशी साथ दिली नाही. याचे मला खूप वाईट वाटले. परंतु हे पुन्हा घडणार नाही. याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावी.राणे यांनी आमदार जठार यांचा नामोल्लेख गटार असा करून सगळे मी केले असे म्हणणाऱ्या आमदारांनी काय केले? विकासकामे करण्याची त्यांची पात्रता आहे का? असा सवाल करीत नीतेश राणेंना कणकवलीतून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे वैभववाडी तालुका नावाप्रमाणे वैभवशाली बनविण्यासाठी तालुक्याने संपूर्ण साथ द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले. (प्रतिनिधी)