शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

विकासाची क्षमता विरोधकांत नाही

By admin | Updated: August 17, 2014 22:34 IST

नारायण राणे : वैभववाडीतील कार्यक्रमात टीका

वैभववाडी : जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता विरोधकांमध्ये नाही आणि जठारांमध्ये ती पात्रता नाही हे जनतेला पटवून द्या, असे आवाहन राणे यांनी केले.ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि पंचायत समिती इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, सभापती नासीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने आदी उपस्थित होते.राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आनेवाले है असे सांगून सत्तेवर येताच महागाईत वाढ करून जनतेला फसविले आहे. जिल्ह्याचा विकास करायला मोदी इथे येणार नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना जनतेने यापुढे बळी पडू नये. लोकसभा निवडणुकीत वैभववाडी तालुक्याने हवी तशी साथ दिली नाही. याचे मला खूप वाईट वाटले. परंतु हे पुन्हा घडणार नाही. याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावी.राणे यांनी आमदार जठार यांचा नामोल्लेख गटार असा करून सगळे मी केले असे म्हणणाऱ्या आमदारांनी काय केले? विकासकामे करण्याची त्यांची पात्रता आहे का? असा सवाल करीत नीतेश राणेंना कणकवलीतून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे वैभववाडी तालुका नावाप्रमाणे वैभवशाली बनविण्यासाठी तालुक्याने संपूर्ण साथ द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले. (प्रतिनिधी)