शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या तोंडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:11 IST

सावंतवाडी येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकान गाळे हटविण्यात येत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी गणेश चतुर्थीच्या तोंडावर दुकानदारांवर अन्याय

सावंतवाडी : येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकान गाळे हटविण्यात येत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर आला आहे. असे असताना ही दुकाने हटविणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी निवेदनातून केला आहे.या निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. या कालावधीत अनधिकृत बांधकामे तसेच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाने स्थगितीचे आदेश दिले असताना सावंतवाडी पालिकेने येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकाने हटविली.

या कारवाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. बहुतांश छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, फेरीवाले असे अनेक गरीब लोक अडचणीत सापडले आहेत.मात्र, तरीही येथील पालिकेने लॉकडाऊन काळात शासनाचे अध्यादेश झुगारून २५ ते ३० वर्षे व्यवसाय करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने अतिक्रमण केल्याचे कारण पुढे करून काढून टाकली आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच लॉकडाऊन आहे. गणेश चतुर्थी सणही काही दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत गरिबांच्या पोटावर लाथ मारण्याचा हा प्रकार पालिकेने केला आहे.या कारवाईला मुख्यमंत्री म्हणून आपणाकडून तत्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्य नगर विकास मुख्य सचिव, कोकण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.गाळे मालकांना न्याय द्यावा : सुनील पेडणेकरसावंतवाडीत जी दुकाने आहेत ती पूर्वीपासूनची आहेत. त्यांना आताच का हटविण्यात आले? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला आहे. मग ही दुकाने हटवित असताना याचा तरी विचार केला गेला पाहिजे होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून दुकान गाळे मालकांना तसेच विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणीही सुनील पेडणेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गMarketबाजार