शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

मडुरा टर्मिनसचा वाद उफाळण्याची शक्यता

By admin | Updated: January 7, 2015 00:38 IST

संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात : राणे व केसरकर यांच्यात कलगी-तुरा शक्य

संतोष परब - मडुरा -केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचे टर्मिनस सावंतवाडी येथेच होणार असल्याचे रत्नागिरी येथील कार्यक्रमात जाहीर केल्याने हे टर्मिनस मडुरा येथेच व्हावे, अशी मागणी मडुरावासीयांनी केली आहे. कोकण रेल्वेच्या टर्मिनस मुद्यावरुन माजी मंत्री नारायण राणे व विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात कलगी-तुरा सर्वश्रृत आहे. या पार्श्वभूमीवर टर्मिनस सावंतवाडीत होण्याचा घाट घालत असल्याने हे टर्मिनस मडुरा येथे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश गावडे यांनी दिल्याने नवा वाद उफाळण्या शक्यता आहे. मडुरा येथे टर्मिनस होण्यासाठी मडुरा दशक्रोशी संघर्ष समितीने केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मडुरा येथेच टर्मिनस होणार असल्याचे जाहीर केले होते. प्रशासनानेही हालचाली सुरु केल्या. काँग्रेसची सत्ता असताना मुंबई येथून तत्कालिन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांना मडुरा येथील टर्मिनस जागेसंदर्भात अहवाल पाठविण्याचा आदेश देण्यात आला होता. टर्मिनस उभारण्यासाठी मडुरा रेल्वेस्थानक परिसरात मुबलक जागा उपलब्ध आहे. तसेच स्थानिक लोकही टर्मिनससाठी कोकण रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. असे असताना मडुरावासीयांच्या मागणीचा विचार न करता टर्मिनस हे सावंतवाडी येथे हलविण्यात येत असल्याने स्थानिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वेचे मडुरा हे शेवटचे स्थानक असल्याने तसेच याठिकाणी जागा उपलब्ध असल्याने मडुरा येथे टर्मिनस व्हावे, अशी अपेक्षा मडुरा दशक्रोशी संघर्ष समितीने केली होती. मात्र सावंतवाडी मतदारसंघाचे तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री केसरकर यांनी टर्मिनस होण्यासाठी सावंतवाडी हेच योग्य ठिकाण असल्याचे सांगून सावंतवाडीेला पसंती दिली. संपादित जमीनी शेतकऱ्यांना परत करामडुरा परिसरातील शेतकऱ्यांना मडुरा टर्मिनससाठी भूसंपादन करण्याबाबत दोन वेळा नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांची दिशाभूल करुन हे टर्मिनस सावंतवाडी येथे हलविल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचा टर्मिनसला विरोध नाही मात्र फसवणूक करुन घेतलेल्या अतिरिक्त संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.टर्मिनस मडुरा येथेच व्हावे मडुरा येथे टर्मिनस होणार असल्याने या परिसरातील जमिनींना सोन्याचे भाव आला आहे. याठिकाणी टर्मिनस झाल्यास या परिसराचा कायापालट होणार आहे. या भागाचा सर्वच दृष्टिकोनातून विकास होणार असल्याने टर्मिनस मडुरा येथेच व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले. टर्मिनस सावंतवाडी येथे नेण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा गावडे यांनी दिला. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री गावडे यांची भेट घेऊन मडुरावासीयांचे म्हणणे मांडणार असल्याचे गावडे म्हणाले.