शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

वेंगुर्लेतील पोटनिवडणुकीला स्थगितीची शक्यता

By admin | Updated: January 10, 2015 00:22 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय : सात नगरसेवकांचे निलंबन रद्द

वेंगुर्ले : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या बारा नगरसेवकांचे निलंबन झाले होते. मात्र नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे उर्वरित सात जागांसाठी १८ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. दरम्यान, शुक्रवारी उच्च न्यायालयात गटनेते वामन कांबळी यांच्यासह सात नगरसेवकांचे निलंबन न्यायालयाने रद्द केल्याने या सातही नगरसेवकांना अभय मिळाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश येताच १२ जानेवारीपर्यंत निवडणुकीला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. वेंगुर्ले नगराध्यक्ष निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये दोन गट निर्माण झाले. या गटांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी पक्षादेश झुगारून काम केल्याने एकमेकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी विद्यमान नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्यासह राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील बाराही नगरसेवकांना अधिनियम १९८६ कलम ३ (१) (अ) व ३ (१) (ब) प्रमाणे अपात्र ठरविल्याचा निकाल जाहीर केला. नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बारा उमदेवार निवडून आल्याने राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. नगराध्यक्षपदी नम्रता कुबल, उपनगराध्यक्षपदी रमण वायंगणकर यांची निवड झाली होती. २५ जून २०१३ रोजी या दोघांनीही पदांचे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते. पुढील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अन्नपूर्णा नार्वेकर, पूजा कर्पे, नम्रता कुबल यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले होते. त्यावेळी जिल्हा पक्षनिरीक्षक आमदार किरण पावसकर यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सर्व नगर सेवकांची बैठक ५ जुलै रोजी कुडाळ शासकीय विश्रामगृहात झाली होती. त्यावेळी पावसकर यांच्या सूचनेप्रमाणे अन्नपूर्णा नार्वेकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, पूजा कर्पे यांनी अर्ज मागे घेतला नव्हता. तत्कालिन जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या आदेशाने अन्नपूर्णा नार्वेकर यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून बाराही नगरसेवकांनी पक्षादेश काढला होता. मात्र, विरोधी गटाच्या सात नगरसेवकांनी तो आदेश न पाळता कर्पे यांना मतदान केल्याप्रकरणी अपात्र ठरवावे, यासाठी तक्रार दाखल केली होती. नगरपरिषद निवडणुकीवेळी बारा नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले होते. त्यांच्या बैठकीत वामन कांबळे यांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी कांबळे यांनी कर्पे यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला होता. त्याचे उल्लंघन केल्याने अधिनियमाप्रमाणे अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्यांनी बाराही नगरसेवकांना अपात्र ठरविले. या निर्णयाविरोधात प्रसन्ना कुबल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार प्रसन्ना कुबल व इतर चार जणांना अभय मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद कायम राहिले आहे. (वार्ताहर)