शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तिलारीच्या पर्यटन विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:06 IST

मांगेलीसाठी हवा विशेष आराखडा

वैभव साळकरदोडामार्ग : एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले गोवा राज्य, तर दुसऱ्या बाजूला मोठी राष्ट्रीय बाजारपेठ असलेले बेळगाव शहर. वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा देखील विपुल, मात्र तरीसुद्धा राजकीय पुढाऱ्यांची अनास्था आणि स्वतंत्र नेतृत्वाचा अभाव या प्रमुख कारणांमुळे दोडामार्ग तालुका पर्यटनाच्या बाबतीत मागासलेला आहे. तिलारीत साकारलेले आंतरराज्यीय मातीचे धरण, तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा, वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली धबधबा, धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत असलेले नागनाथ मंदिर, तळकट येथील वनबाग आदी पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच कृषी पर्यटनाच्या संधी उपलब्ध झाल्यास तालुक्याचा पर्यटन विकास शक्य आहे. त्यातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.दोडामार्ग तालुक्यात एकापेक्षा एक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, या पर्यटनस्थळांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. किंबहुना येथील राजकीय पुढारी आणि लोकांनीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. परिणामी या पर्यटनस्थळांची पुरती वाताहत झाली आहे. केवळ पावसाळ्यात धबधब्याखाली न्हाऊन निघण्यापुरतेच पर्यटन तालुक्यात शिल्लक राहिले असून, या मरणासन्न अवस्थेत असलेल्या पर्यटन स्थळांना उर्जितावस्था देण्याची गरज आहे. महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेला तालुका म्हणजे दोडामार्ग ! २७ जून १९९९ ला या तालुक्याची निर्मिती झाली. त्यानंतर आज साधारणतः २५ वर्षांचा काळ लोटला. मात्र, इथली पर्यटनस्थळे अद्याप विकसित झालेली नाहीत. मध्यंतरीच्या काळात पर्यटन विकासाचे स्वप्न दाखविण्यात आले, मात्र कालांतराने ते धुळीलाच मिळाले. त्याचे कारण असे की, इथले राजकीय पुढारी आणि त्यांचे नेते त्यासाठी आग्रही नाहीत.तालुक्यात महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सर्वात मोठे तिलारी धरण साकारले आहे. या धरणाच्या पायथ्याशी बगीचा आहे. शिवाय धरणाला लागूनच काही अंतरावर उन्नेयी बंधारा आहे. एकेकाळी राणीची बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळकट येथील वनबागेचीही दुरवस्था झाली आहे. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेरवण-मेढे येथील नागनाथ मंदिराच्या पर्यटन विकासासाठीही प्रयत्न झालेले नाहीत.

भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचेवर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मांगेलीला, तर दरवर्षी वर्षा पर्यटनासाठी पावसाळ्यात लाखो पर्यटक येतात खरे, मात्र भौतिक सुविधांअभावी त्यांचा हिरमोड होतो. वास्तविक तालुक्याचा पर्यटन विकास सहज शक्य आहे. गोव्यात दरवर्षी येणाऱ्या लाखो देशी-विदेशी पर्यटकांना जवळच असलेल्या दोडामार्ग तालुक्यात वळविले जाऊ शकते. गोव्यासारखे जरी रुपेरी वाळूचे किनारे इथे नसले, तरी इथले सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. मात्र, त्यासाठी पर्यटनाचा विकास आणि पर्यटकांना लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे

हे व्हायला हवे दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरण साकारले आहे. या धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे . येथे जलपर्यटन शक्य आहे. डबल डेकर बोट अथवा अन्य साधनांद्वारे ते शक्य आहे. त्याकरिता आराखडा तयार करण्याची गरज आहे. शिवाय तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गार्डनचा म्हैसूर - उटी येथील रॉक गार्डनच्या धर्तीवर विकास शक्य आहे. शिवाय उन्नेयी बंधाऱ्याच्या विकास होणे गरजेचे आहे.

मांगेलीसाठी हवा विशेष आराखडामांगेलीमध्ये केवळ वर्षा पर्यटनच नव्हे, तर उन्हाळी पर्यटनालाही वाव आहे. मात्र, त्यासाठी नियोजनबद्ध विकासाची गरज आहे. पॅराग्लायडिंगही इथे सहज शक्य आहे. पण, त्याकरिता ग्रामस्थांची मानसिकता आणि राजकीय पुढाऱ्यांची इच्छाशक्ती गरजेची आहे.