शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

राजकीय क्षेत्र ढवळले

By admin | Updated: October 1, 2015 00:28 IST

दोडामार्ग नगरपंचायतीचे बिगुल : सक्षम उमेदवारांसाठी चाचपणी

वैभव साळकर - दोडामार्ग-शासन नियमानुसार प्रथमच ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यावर निवडणूक आयोगाने कसई दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबरला जाहीर केल्याने निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवार शोधताना राजकीय पक्षांची चांगलीच धावपळ उडाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना-भाजप एकत्र येत आघाडी व युती करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर या दोहोंसमोर अपक्षांचे कडवे आव्हानही याही निवडणुकीत उभे असेल, असा होरा राजकीय क्षेत्रातून वर्तविला जात आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासन सत्तेत असताना तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त करून देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे कसई दोडामार्ग शहरात नगरपंचायत निवडणुकीचे नगारे आता घुमू लागले आहेत. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने पहील्या-वहिल्या नगरपंचायतीवर निवडूून जाण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी आरक्षित जागा झाल्याने आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. या पूर्वी कसई दोडामार्गची निवडणूक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लढविण्यात आली होती. मात्र त्यांनतर प्रथमच नगरपंचायतीची निवडणूक होेणार असल्याने ही निवडणूक पक्षचिन्हावर लढविली जाणार आहे. मात्र, काही ठिकाणी पक्षचिन्हावर निवडणूक न लढता अपक्ष म्हणून रिंगणात उतरून मतदारांसमोर एक वेगळे चित्र तयार करण्याचा प्रयत्नही होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कसई दोडामार्ग शहरातील एका गटाकडून अपक्षांची मिळून आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राजकीय पक्षांसमोर अपक्षांचीच मोठी अडचण निर्माण होणार आहे. एकंदरीत कसई दोडामार्ग नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चांगलीच गाजणार असून राजकीय नेतेमंडळींसाठी त्यांचे अस्तित्व पुन्हा एकदा दाखवून देणारी महत्वाची संधी ठरणार आहे, हे मात्र नक्की. त्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.पदाधिकाऱ्यांची तारेवरची कसरतकसई दोडामार्ग नगर पंचायतीसाठी १७ प्रभाग असून यातील तब्बल नऊ प्रभाग हे स्त्रियांसाठी राखीव आहेत. त्यापैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून तीन स्त्री उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. तर उर्वरीत पैकी अनुसूचित जातीसाठी-१, नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून-२ व सर्वसाधारणमधून पाच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यावयाचे आहेत. मात्र, नगरपंचायतीसाठी पडलेले हे आरक्षण राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरले असून आरक्षित जागांवर उमेदवार शोधताना राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींची चांगलीच तारांबळ उडाली आहे. १ आॅक्टोबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरावयाचे असल्याने कमी कालावधीमध्ये राजकीय पक्षांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप या पक्षांनी जरी आघाडी आणि युती करण्याच्या वल्गना केल्या असल्या तरी अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याने आघाडी व युती होण्यावर शिक्कामोर्तब झाले नाही. परिणामत: आघाडी आणि युतीच्या या घोळात उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.