शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

कालसेकरच्या चक्रव्युहात पोलीस ?

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

वचक संपला : नऊ दिवसांनंतरही आरोपी मोकाट

रत्नागिरी : दोन खुनांसह २९ गंभीर गुन्ह्यातील आरोपी साहील कालसेकरने पोलिसांच्या वॉचमधून पलायन केल्यानंतर त्याला चक्रव्युहात अडकवून पुन्हा बेड्या घालण्यात ९ दिवसांनंतरही पोलिसांनी अपयश आले आहे. कालसेकरचा शोध कोठे व कसा घ्यावा, या मुद्द्यावरून सध्या पोलीसच चक्रव्युहात सापडल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. याप्रकरणी तातडीने पोलिसांनी साहीलला पकडले असते, तर पोलिसांना कोणी कितीही चकवा दिला तरी तो फार काळ लपून राहू शकत नाही, पोलिसांचे जाळे तेथपर्यंत पोहोचणारच, हे सिध्द झाले असते व अन्य गुन्हेगारांना जरब बसली असती. मात्र, अद्यापपर्यंत गुंड कालसेकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. चिपळूणच्या न्यायालयाने कालसेकरला अटक वॉरंट काढल्यानंतर हे प्रकरण स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे आले. या शाखेच्या पोलिसांनी साहील एमआयडीसीत आल्याचे समजताच त्याला पकडण्यासाठी जोरदार कारवाई केली. पोलीस नाईक उदय वाजे यांनी साहीलला मिठी मारून पकडून ठेवले. पाच ठिकाणी चावे घेऊनही वाजे यांनी त्याला सोडले नाही. त्याही स्थितीत साहीलला पकडण्यात आले. मात्र, त्यानंतरच खरा बेफिकिरपणा झाला, अन उपचारासाठी रुग्णालयात असलेला कालसेकर तेथे वॉचवर असलेल्या मुख्यालय पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. या घटनेला तब्बल ९ दिवस होऊन गेले आहेत. मात्र, कालसेकर मोकाट आहे. कालसेकर पलायनप्रकरणी निष्काळजीपणा व बेफिकिरी दाखवणाऱ्या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पोलीस पथकांद्वारे शोधमोहीम राबवण्यात येत असली तरी त्यात काहीच प्रगती झालेली नाही. त्यामुळे कालसेकर आता सापडेल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. खरेतर रत्नागिरी पोलिसांनी याआधी काही प्रकरणात अतिशय चांगल्या प्रकारे तपासकाम केले आहे. मात्र, कालसेकर प्रकरणात असे काय मोठे घडले की, त्याच्यापर्यंत पोलिसांचे जाळे ९ दिवस उलटूनही पोहोचू नये, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे आणि त्यामुळे गूढही निर्माण झाले आहे. नायशी (ता. चिपळूण) येथील असलेल्या साहील कालसेकर या गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली चिपळूण पोलिसांकडे आहे. त्याचा ठावठिकाणा असलेली ठिकाणेही पोलिसांना माहिती आहेत. असे असताना त्याच्यापर्यंत पोहोचण्यात व त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात यश आलेले नाही, त्यामुळे गूढ निर्माण झाले आहे. तो पसार झाल्यानंतर जिल्हाभरात तत्काळ नाकेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे तो जिल्ह्याबाहेर जाण्याची शक्यता कमीच आहे. तो जिल्ह्यातच असावा, असा संशय आहे. परंतु अद्याप तो सापडलेला नाही. त्यामुळे अन्य गुन्हेगारांचा धीर चेपण्याची भीती निर्माण झाली आहे. कालसेकरला लवकरात लवकर पकडणे, त्यासाठीच आवश्यक बनले आहे. (प्रतिनिधी)गुंड कालसेकरचे आश्रयस्थान कोणते ?अलिकडील काळात गुन्हेगार आणि काही पुढारी यांच्यात साटेलोटे असल्याची चर्चा नेहमीच होते. नेहमीच्या जागी सापडत नसलेला कालसेकर अशा संशय न येणाऱ्या कोणा पुढारी वा प्रतिष्ठिताच्या आश्रयाला नाहीना, या दिशेनेही तपास करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा रुग्णालयात कालसेकरला दाखल केल्यापासून ते पलायन करण्यापर्यंतचे सी. सी. टी. व्ही. फुटेज रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यावरून काही तपास लागल्याचे दिसत नाही. मुळातच गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या रुग्णालयीन उपचारादरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे घडले नाही. साहीलला लवकरच पकडणार, पोलिसांचा विश्वाससंपूर्ण जिल्ह्याला हादवरुन टाकणारा कुप्रसिद्ध गुंड साहील कालसेकर पोलिसांच्या तावडीतून निसटल्याच्या घटनेला ९ दिवस होऊनही जिल्हा पोलीस त्याला पडकण्यात यशस्वी झाले नसले तरी लवकरच गजाआड करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेसह अनेक पोलीस स्थानकांची स्वतंत्र पथके कालसेकरच्या शोधासाठी बाहेर पडली आहेत. साहीलला पकडण्यासाठी गेलेल्या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे खास वृत्त असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस चोख प्रत्युत्तर द्या, अशी सूचनाही देण्यात आल्याचे समजते. १५ जुलै रोजी साहीलने जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळ काढला होता. यानंतर बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. गेले ९ दिवस पोलिसांनी जिल्हा पिंजून काढला. तरीही साहीलला पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांना चकवा देऊन फरार होण्यात कालसेकर तरबेज आहे. पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही तो थेट हल्ला करतो, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.