शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्रतिज्ञा करूया भारताच्या अखंडतेची

By admin | Updated: October 31, 2014 00:40 IST

आज राष्ट्रीय एकात्मता दिन : ऐक्य अबाधित राखणे प्रत्येकाचीच जबाबदारी!

अजय लाड ल्ल सावंतवाडीविविधतेतून एकता याचे प्रतिक म्हणून भारत देशाकडे पाहिले जाते. या देशात विविध धर्माचे, जातीचे आणि पंथाचे लोक एकत्र नांदतात. चीननंतर जगातील लोकसंख्येत आघाडीवर असलेल्या भारत देशातील एकता कायम राखण्याकरिता राष्ट्रीय एकात्मता दिनाचे आयोजन करण्यात येते. ३१ आॅक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त साऱ्या भारतीयांनी देशाच्या अखंडतेसाठी प्रतिज्ञा घेत ऐक्य आणि सामंजस्याची रुजवण करणे, एवढाच या दिनाचा उद्देश आहे.देशात एकूण २९ राज्य आणि ७ संघराज्य आहेत. तसेच देशातील २२ भाषांना संविधानातून मान्यता दिली आहे. तर हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून गौरविले आहे. स्वांतत्र्यापासून आतापर्यंतच्या काळात भारतीयांमधील एकता तोडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, देशातील आणि देशाबाहेरील या वाईट प्रवृत्ती कदापि यशस्वी झाल्या नाहीत. कारण या देशातील बंधुता ही प्रत्येक भारतीयाच्या मनात वसलेली असून त्याचे बंध तोडणे शक्य नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काही कालावधीत देशातील जनतेमध्ये जातीधर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यानंतरही देशाची अखंडता कायम राहिली आहे. येथील काही लोकांमधील ऐक्य व जातीय सलोखा कमी झालेला असल्याचे लक्षात आल्याने राष्ट्रीय एकात्मता दिनाला महत्त्व प्राप्त होते.भारताला एक मजबूत आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीकोनातून देशातील धर्म, संस्कृती, जातपात, रुढी परंपरा यांच्यात सांगड घालणे गरजेचे बनलं. लोकांमधील विविधता एका समान पातळीवर आणणे आवश्यक बनले आणि त्यातूनच राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना रुढ झाली. देशातील साऱ्यांनी भारतीय या एका ओळखीने एकत्र आल्यास देशातील माणसामाणसातील बंध तुटून अखंड भारत निर्माण झाला आहे. ब्रिटीशांच्या विरोधातील लढाईत भारतीयांनी या एकतेचे सामर्थ्य अनुभवले असून त्याची प्रचितीही देशाच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून सर्वांसमोर आहे. राष्ट्रीय एकात्मता दिन हा आंतर राज्य युवक एक्सचेंज कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, राष्ट्रीय युवा महोत्सव, युवा पुरस्कार, एकात्मतेबाबत परिषदा, चर्चासत्रे आयोजित करुन सर्वांमध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत साजरा केला जातो. राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आयोजित शिबिरांमध्ये, महोत्सवामध्ये देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. प्रत्येक संस्कृती, धर्म, भौगोलिक परिस्थिती ही आपापल्या ठिकाणी उदात्त असल्याची जाणीव यातून करुन दिली जाते. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्याही ३१ आॅक्टोबर १९८४ साली झाली होती. त्यांच्या आठवणीसाठी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो, ज्यामुळे कोणत्याही अघटीत घटनेने देशाच्या एकतेला बाधा येऊ नये, हाच उद्देश यामागे आहे.राष्ट्रीय एकता कायम राखण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापनाही करण्यात आली आहे. देशातील जातीयतावाद, धर्मांमधील तेढ व प्रादेशिकतावाद यांच्या समूळ नष्टतेसाठी १९६१ साली पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना केली होती. देशात शांतता नांदण्यासाठी अंतर्गत समस्या मिटविण्याचे कार्य ही परिषद करत होती. या परिषदेची २0१0 साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना १४७ सदस्यांसह पुनर्बांधणी करण्यात आली. जातीय सलोखा राखणे, तेढ कमी करणे, सर्व समस्या चर्चेतून सोडविण्याचे काम या परिषदेच्या सदस्यांव्दारे केले जाते.प्रत्येकजण वेगळे राज्य वेगळा प्रदेश मागत असतानाच या एकात्मता दिनानिमित्त त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणून चर्चा घडवून जनजागृती करण्याची जबाबदारी आपल्या साऱ्यांचीच आहे. देशाची अखंडता राखण्यासाठी प्रत्येकानेच प्रतिज्ञा करावी, 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत'. एकात्मता दिन साजरा करण्याची कारणे४देशातील नागरिकांना शांतता, एकमेकांतील प्रेम अबाधित ठेवण्यासाठी व ऐक्य बाळगण्याकरिता प्रोत्साहीत करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता दिनाचे आयोजन केले जाते. ४एकमेकांबद्दलचा आदर वृध्दींगत होण्यासाठी या दिनाला महत्त्व दिले गेले आहे.४वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, धर्म, भौगोलिक विविधता असल्याने येथील लोकांमध्ये सुसंवाद घडविण्यासाठी, समाजातील ऐक्य बळकट करण्यासाठी विविध धर्म व प्रांतातील चांगल्या गोष्टी सर्वांना ज्ञात होण्यासाठी.