शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

परप्रांतियांकडून लागवड...स्थानिकांची परवड

By admin | Updated: March 16, 2016 23:54 IST

दोडामार्गमधील शेतीतील विदारक अवस्था : केळी, रबर, अननस फळबागांत परप्रांतियांची घुसखोरी--दोडामार्गच्या विकासाची दिशा

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवा तालुका म्हणून दोडामार्ग तालुक्याची ओळख आहे. भौगोलिक परिस्थिती जरी खडतर असली तरी येथे पर्यटन उद्योगधंदे शिवाय कृषीक्षेत्राच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करणे शक्य आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या सतरा वर्षांच्या इतिहासात म्हणावे तसे प्रयत्न तालुक्याची विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी झाले नाहीत. इथला विकास कोणत्या माध्यमातून होऊ शकतो, त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत, यावर विचारमंथन करणारी आणि तालुक्याची विकास प्रक्रिया गतिमान करणारी ‘विकासाची दिशा’ ही मालिका ‘लोकमत’ आजपासून सुरू करीत आहे...वैभव साळकर --दोडामार्गतालुक्यातील शेतजमिनीत केळी, रबर या लागवडीपाठोपाठ आता अननस पिकाचेही पिक घेतले जात आहे. योग्य नियोजन व मेहनत घेतल्याने दोडामार्गमध्ये परप्रांतीय शेतकऱ्यांनी प्रचंड नफा मिळविल्याचे दाखवून दिले आहे. आपल्या जमिनी परप्रांतियांना कवडीमोलाने विकून स्थानिक शेतकऱ्यांची मात्र मोठी परवड होत आहे. त्यामुळे स्थानिकांनी ही शेतजमीन विकण्यापेक्षा कष्टाने फुलविली तर दोडामार्गचा विकास होण्यास वेळ लागणार नाही आणि त्यातून आर्थिक सुबत्ताही येईल.तालुक्यात येथील बळीराजा पारंपरिक भातशेती आणि नारळ, सुपारी व काजू या बागायतीची शेती करत होता. यातून तो म्हणावा तसा ‘समृद्ध’ झाला नाही. परिणामी शेती पडीक राहू लागली. त्यामुळे दोडामार्गच्या शेतजमिनीत परप्रांतीयांची घुसखोरी सुरू झाली. केरळ राज्यातून महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यात मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात केरळीयन शेतकऱ्यांची ‘एंट्री’ झाली आहे. कृषीक्षेत्रात अग्रेसर असणारे केरळ राज्य आणि तेथील ‘अभ्यासू’ शेतकऱ्यांना दोडामार्गमधील ‘सुपीक’ जमिनीने वेड लावल्याने वर्षानुवर्षे दोडामार्ग तालुक्यात केरळीयनांच्या संख्येत वाढच होत आहे. पाच-दहा वर्षांपूर्वी केवळ हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या परप्रांतीय शेतकऱ्यांची आजची एकट्या दोडामार्ग तालुक्यातील संख्या ‘गणती’ पलीकडची आहे. यामुळे दोडामार्ग तालुक्यात रबर लागवड विक्रमी क्षेत्रात झाली असून ओसाड डोंगर रांगात परप्रांतीयांनी रबराचे नंदनवन फुलविले आहे.दोडामार्गमधील काही शेतकरी आता परप्रांतियांच्या पावलावर पाऊल ठेवून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी येथील बहुतांश गावांना उपलब्ध झाले आहे. श्रम केल्यास नफा मिळतो, हे परप्रांतियांनी दाखवून दिल्याने स्थानिक बेरोजगार तरुण शेतकरी आता शेतीकडे वळले आहेत. तिलारी खोऱ्यातील युवकांनी तर घोटगे, घोटगेवाडी, भटवाडी आदी गावांमध्ये ‘समूहशेती’चा नवा पायंडा घातला आहे. तेथील सुशिक्षित तरुणांनी आठ-दहा युवकांचे गट करुन संयुक्तिकरित्या कित्येक एकर क्षेत्रात केळी लागवड केली आहे.पूर्वीच्या शेतकऱ्यांच्या नकारात्मक समजुतीला परप्रांतातील शेतकऱ्यांनी पूर्णत: तिलांजली दिली आहे. मुळस येथे अननस लागवड करणाऱ्या जॉर्ज नामक केरळीयन शेतकऱ्याने तर येथील स्थानिक शेतकऱ्यांसमोर एक आदर्श पायंडा घातला आहे. सुरूवातीला केवळ ‘केळी’, मग रबर आणि आता ‘अननस’ अशी कृषी-बागायतीची नवनवीन ‘कवाडे’ यशस्वीरित्या परप्रांतीय शेतकऱ्यांनी दाखवली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणे आवश्यक आहे.परप्रांतीय जर लाखो रुपये मोजून जमिनी घेऊन आपल्या घरापासून हजारो मैलावर येऊन कृषीक्रांती घडवितात, तर भूमिपुत्राला आपल्याच घरालगत ‘कृषीक्रांती’ साधण्यास अवघड ते काय, याचाही येथील प्रत्येक नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे.‘कृषीक्रांती’ची नवी कवाडेपरप्रांतीय शेतकऱ्यांनी आता दुर्गम अशा दोडामार्ग तालुक्यात ‘कृषीक्रांतीची’ नवी कवाडे उघड केली आहेत. सुरूवातीला केवळ केळी लागवडीतून त्यांनी समृद्धी साधली होती. आता लाखो रुपयांची गुंतवणूक करुन ‘रबर व अननस’ अशा लागवडीकडे ते वळले आहेत. सुरुवातीला केळी लागवडीतून आर्थिक सुबत्ता मिळविणारे परप्रांतीय आता सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत.