शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

रेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:46 IST

कणकवली तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे.

ठळक मुद्देरेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीटइंटरनेट मिळत नसल्याने  पॉस मशीन जंगलात ठेवून घेताहेत अंगठे

कणकवली : तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे. वृद्ध ग्रामस्थांनाही सावडाव गावात रेशन धान्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.या गंभीर समस्येकडे कणकवली तहसीलदार रमेश पवार लक्ष देतील का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे. सावडाव गावठणवाडी येथे रेशन धान्य दुकान संपूर्ण गावाचे आहे. त्याठिकाणी इंटरनेट सेवा मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पॉस मशीनवर रेशन कार्डधारकाचे अंगठे घेता येत नाहीत.त्यासाठी रेशन धान्य दुकानदार बाळा वारंग यांनी गावातील जंगलमय अशा सावडाव धबधब्यानजीकच्या परिसरात प्लास्टिकचे कागद बांधून झोपडी उभारली आहे. त्याठिकाणी रेशन दुकानदार बसतात. कार्डधारकांना त्याठिकाणी जावे लागते. तिथे पॉस मशीनवर अंगठा लागला तरच धान्य दिले जात आहे.एकीकडे कोरोना महामारीत जनता होरपळली जात असताना रेशनिंगसाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने जंगलात जाऊन अंगठा लावावा लागत आहे. या समस्येने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.तसेच यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या समस्येमुळे वृद्ध तसेच गोरगरीब ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जंगलात जाऊन तेथे थांबावे लागत आहे. तसेच येणे-जाणे यात वेळ खर्ची जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामस्थांना रेशनिंग दुकानावरील धान्य घेण्यासाठी २ किलोमीटर पायपीट किंवा विनाकारण वाहन खर्च करावा लागत आहे. एकीकडे कोरोना महामारीत नागरिक त्रस्त झाले असताना पॉस मशीन डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार रमेश पवार किंवा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करावा. तसेच त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सावडाव ग्रामस्थांनी केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता मेटाकुटीस आली आहे. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग