शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:46 IST

कणकवली तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे.

ठळक मुद्देरेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीटइंटरनेट मिळत नसल्याने  पॉस मशीन जंगलात ठेवून घेताहेत अंगठे

कणकवली : तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे. वृद्ध ग्रामस्थांनाही सावडाव गावात रेशन धान्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.या गंभीर समस्येकडे कणकवली तहसीलदार रमेश पवार लक्ष देतील का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे. सावडाव गावठणवाडी येथे रेशन धान्य दुकान संपूर्ण गावाचे आहे. त्याठिकाणी इंटरनेट सेवा मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पॉस मशीनवर रेशन कार्डधारकाचे अंगठे घेता येत नाहीत.त्यासाठी रेशन धान्य दुकानदार बाळा वारंग यांनी गावातील जंगलमय अशा सावडाव धबधब्यानजीकच्या परिसरात प्लास्टिकचे कागद बांधून झोपडी उभारली आहे. त्याठिकाणी रेशन दुकानदार बसतात. कार्डधारकांना त्याठिकाणी जावे लागते. तिथे पॉस मशीनवर अंगठा लागला तरच धान्य दिले जात आहे.एकीकडे कोरोना महामारीत जनता होरपळली जात असताना रेशनिंगसाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने जंगलात जाऊन अंगठा लावावा लागत आहे. या समस्येने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.तसेच यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या समस्येमुळे वृद्ध तसेच गोरगरीब ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जंगलात जाऊन तेथे थांबावे लागत आहे. तसेच येणे-जाणे यात वेळ खर्ची जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामस्थांना रेशनिंग दुकानावरील धान्य घेण्यासाठी २ किलोमीटर पायपीट किंवा विनाकारण वाहन खर्च करावा लागत आहे. एकीकडे कोरोना महामारीत नागरिक त्रस्त झाले असताना पॉस मशीन डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार रमेश पवार किंवा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करावा. तसेच त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सावडाव ग्रामस्थांनी केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता मेटाकुटीस आली आहे. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग