शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

चित्र-शिल्प संमेलन यशस्वी करणार

By admin | Updated: December 1, 2014 00:19 IST

कणकवलीतील बैठकीत निर्धार : नगराध्यक्षांकडून सहकार्याची ग्वाही

कणकवली : शहरात प्रथमच अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी शहरवासीयांकडून योगदान मिळेल. तसेच विविध स्तरावर मदत उपलब्ध करून हे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार मान्यवरांनी येथील बैठकीत व्यक्त केला. अखंड लोकमंच सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने शहरात होणाऱ्या अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलनाच्या नियोजनाची बैठक नामानंद मोडक यांच्या अध्यक्षतेखाली भवानी मंगल कार्यालयात झाली. यावेळी विविध संस्था प्रतिनिधींसह आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, नगराध्यक्षा प्रज्ञा खोत, रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण, दिग्दर्शक सुहास वरूणकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते भाई खोत, अशोक करंबेळकर आदींनी संमेलनासाठी सहाय्य करण्याची ग्वाही दिली.संमेलनामागील भूमिका मांडताना मोडक म्हणाले की, आजवर साहित्य संमेलन, नाट्य, संगीत, गझल संमेलने होतात. या संमेलनांत सजावट, नेपथ्य, रंगकाम, रांगोळी आदींचा समावेश होतो. त्यासाठी राबणारे कलाकारांना त्या मंचावर अभिव्यक्त होता येत नाही. त्यामुळे चित्र, शिल्प, याबरोबरच छायाचित्रकार, रांगोळीकार, मूर्तीकार, नेपथ्यकार, व्यंगचित्रकार या सर्वांच्या कलांना मुक्ताविष्कार देणारे संमेलन कणकवलीत आयोजित करण्यात आहे. प्रा. विजय जामसंडेकर म्हणाले की, व्यक्त होण्याचे चित्र हे प्रभावी माध्यम आहे. भाषा किंंवा इतर कला चित्रांच्या माध्यमातून शिकता येतात. चित्र, शिल्प कलेवर जगभरात मोठे काम होत आहे. त्यात आपले कलाकार मागे पडू नयेत. यासाठी अशी संमेलने व्हायला हवीत. आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत यांनीही संमेलन यशस्वी करण्याची भूमिका मांडली. चित्र-शिल्प संमेलन कणकवलीत होत असून ते भूषणावह असल्याचे नगराध्यक्षा अ‍ॅड. खोत म्हणाल्या. नगरपंचायतीचे सहकार्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सुहास वरूणकर यांनी कलासंमेलनाच्या माध्यमातून शहरात सांस्कृतिक केंद्र उभे रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नियोजन बैठकीत प्रा. हरिभाऊ भिसे, मूर्तिकार मारूती पालव, आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, नगरसेवक सुशांत नाईक, दशावतारी कलावंत बी. के. तांबे, हरी परब, नारायण हजेरी आदी मान्यवरांनी विचार मांडले. विजय पालकर, मनोज मेस्त्री, इंद्रजित खांबे, प्रशांत काणेकर, राखी अरदकर, समीर गुरव, चेतन तारी आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार संतोष राऊळ यांनी मानले. (प्रतिनिधी)