शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पिसेकामते येथे गव्यांचा धुमाकूळ शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:18 IST

पिसेकामते गावठणवाडी येथे गेली  दोन वर्षे गवे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे पावसाळी तसेच उन्हाळी शेती करणे अनेक शेतकºयांनी बंद केले आहे. या गव्यांच्या उच्छादापासून आपल्याला वाचवावे अशी मागणी

ठळक मुद्दे वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

कणकवली : पिसेकामते गावठणवाडी येथे गेली  दोन वर्षे गवे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे पावसाळी तसेच उन्हाळी शेती करणे अनेक शेतकºयांनी बंद केले आहे. या गव्यांच्या उच्छादापासून आपल्याला वाचवावे अशी मागणी पिसेकामते येथील त्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

पिसेकामते गावात शेतीसाठी बाराही महिने पाणी उपलब्ध असते. त्यामुळे अंकुश गुरव, गणेश गुरव, विष्णू गुरव, राजेंद्र गुरव, प्रकाश गुरव, विजय मोहिते अशा अनेक शेतकºयांनी एकत्र येत उन्हाळी भुईमूग करण्याचे ठरविले. तसेच या पिकाबरोबरच इतर पिकांची लागवड केली. मात्र, गव्यांनी या संपूर्ण पिकाची नासधूस करून टाकली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.गतवर्षी अंकुश गुरव, विलास गुरव यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात गव्यांनी नुकसान केले होते. त्यावेळी माजी उपसरपंच ज्ञानदेव गुरव यांनी या घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला दिली होती. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पार्सेकर व गुडेकर यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली होती. तसेच  पंचनामाही केला होता. मात्र, त्यानंतरही गव्यांचा त्रास सुरूच आहे.

तेथील  शेतकरी एकत्र येऊन हजारो रुपयांचे बियाणे घेऊन मोठ्या कष्टाने उन्हाळी शेती करीत आहेत. पण गव्याच्या त्रासामुळे शेतकºयांचे नुकसानच होत आहे. तसेच त्यांचे सर्व परिश्रम वाया जात आहेत.या समस्येकडे ज्ञानदेव गुरव यांनी वनक्षेत्रपाल सोनवडेकर यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वनकर्मचाºयांना पाठवून नुकसानीचा पंचनामा केला. मात्र, गव्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.

पिसेकामते येथील अनेक शेतकरी त्रस्त झाले असून नंदकुमार भोगले, अंकुश गुरव यांच्या काजूबागेचे तर जगन्नाथ मोहिते यांच्या चवळी, मूग यांचे नुकसानसुद्धा गव्यांनी केले आहे. गव्याच्या या त्रासामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. महिलावर्ग गव्यांच्या भीतीमुळे जंगलात जाणे टाळत आहे. त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे.  गव्यांच्या या समस्येवर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि दिलासा द्यावा अशी मागणी शेतकºयांतून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग