शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात शुक्रवारपासून जनआंदोलन

By admin | Updated: January 2, 2017 23:04 IST

नारायण राणे यांची माहिती : राज्यस्तरीय आंदोलनाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवात

कणकवली : केंद्र शासनाच्या फसलेल्या नोटाबंदी निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने राज्यात जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाढती महागाई, नोटाबंदी तसेच सिंधुदुर्गातील विकास ठप्प झाल्यामुळे शासनाचा निषेध करीत काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि. ६) पहिले आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जनतेला ज्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागेल तसेच अन्याय होईल, त्या ठिकाणी यापुढे काँग्रेसच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी जाहीर केले.ओसरगाव येथील महिला भवनाच्या सभागृहात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेश पक्षनिरीक्षक शाम म्हात्रे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, भाजप शासनाचा नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. या निर्णयाला ५० दिवस उलटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सवलती म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. नोटाबंदीनंतर ५० दिवसांत बँकेच्या रांगेत उभे राहिलेल्यांपैकी १०० हून अधिक व्यक्तींचे बळी गेले आहेत. अनेक एटीएम सेंटर बंद आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नोटाबंदीमुळे क्रांती आणली म्हणणारे नरेंद्र मोदी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. नोटाबंदीनंतर कॅशलेस प्रणाली म्हणजे जनतेची फसवणूक आहे. स्वत:चे पैसे बँकेतून काढण्यासाठी जगातल्या कुठल्याच देशात निर्बंध नाहीत. मात्र, भारतात ते घालण्यात आले आहेत. हे शासन राष्ट्र आणि जनहिताचे नसून सध्या नरेंद्र मोदींची हुकूमशाही, बेबंदशाही सुरू आहे.अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांतही ४० ते ४५ टक्के कॅश चलनात आहे. नरेंद्र मोदींसह भाजपने जनतेला निवडणुकीपूर्वी दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न फसवे ठरले आहे.त्यामुळे या सर्व बाबींबरोबरच जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत काँग्रेस आता भाजप शासनाला जाब विचारणार आहे. सिंधुदुर्गसह राज्यात नोटाबंदी आणि कॅशलेस विरोधात काँग्रेस आंदोलन छेडणार आहे. नोटाबंदीच्या ५० दिवसांत ६४ निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. नोटाबंदीबाबत केंद्र शासन संभ्रमावस्थेत आहे. चलनातील ८६ टक्के नोटाबंदी केली. मात्र, त्यामुळे किती काळा पैसा बाहेर आला? याबाबत रिझर्व्ह बँक माहिती देण्यास असमर्थ ठरली आहे. देशातील भ्रष्टाचार कमी झाला का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? दरडोई उत्पन्न वाढले का? अशा प्रश्नांची उत्तरे शासनाने दिली पाहिजेत. ती दिली जात नाहीत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पंतप्रधानांकडून टाळाटाळ केली जात आहे. नोटाबंदीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून शेतकरी, मजूर, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बेकारी वाढत आहे. मात्र, शासन यावर काहीही भाष्य करीत नाही. शासनाने निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यायला हवीत. कॅशलेस व्यवहारासाठी मूलभूत सुविधा आपल्या देशात उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण असल्याचे राणे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)