शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

नोटाबंदीविरोधात शुक्रवारपासून जनआंदोलन

By admin | Updated: January 2, 2017 23:04 IST

नारायण राणे यांची माहिती : राज्यस्तरीय आंदोलनाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवात

कणकवली : केंद्र शासनाच्या फसलेल्या नोटाबंदी निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने राज्यात जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाढती महागाई, नोटाबंदी तसेच सिंधुदुर्गातील विकास ठप्प झाल्यामुळे शासनाचा निषेध करीत काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि. ६) पहिले आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जनतेला ज्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागेल तसेच अन्याय होईल, त्या ठिकाणी यापुढे काँग्रेसच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी जाहीर केले.ओसरगाव येथील महिला भवनाच्या सभागृहात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेश पक्षनिरीक्षक शाम म्हात्रे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, भाजप शासनाचा नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. या निर्णयाला ५० दिवस उलटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सवलती म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. नोटाबंदीनंतर ५० दिवसांत बँकेच्या रांगेत उभे राहिलेल्यांपैकी १०० हून अधिक व्यक्तींचे बळी गेले आहेत. अनेक एटीएम सेंटर बंद आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नोटाबंदीमुळे क्रांती आणली म्हणणारे नरेंद्र मोदी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. नोटाबंदीनंतर कॅशलेस प्रणाली म्हणजे जनतेची फसवणूक आहे. स्वत:चे पैसे बँकेतून काढण्यासाठी जगातल्या कुठल्याच देशात निर्बंध नाहीत. मात्र, भारतात ते घालण्यात आले आहेत. हे शासन राष्ट्र आणि जनहिताचे नसून सध्या नरेंद्र मोदींची हुकूमशाही, बेबंदशाही सुरू आहे.अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांतही ४० ते ४५ टक्के कॅश चलनात आहे. नरेंद्र मोदींसह भाजपने जनतेला निवडणुकीपूर्वी दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न फसवे ठरले आहे.त्यामुळे या सर्व बाबींबरोबरच जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत काँग्रेस आता भाजप शासनाला जाब विचारणार आहे. सिंधुदुर्गसह राज्यात नोटाबंदी आणि कॅशलेस विरोधात काँग्रेस आंदोलन छेडणार आहे. नोटाबंदीच्या ५० दिवसांत ६४ निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. नोटाबंदीबाबत केंद्र शासन संभ्रमावस्थेत आहे. चलनातील ८६ टक्के नोटाबंदी केली. मात्र, त्यामुळे किती काळा पैसा बाहेर आला? याबाबत रिझर्व्ह बँक माहिती देण्यास असमर्थ ठरली आहे. देशातील भ्रष्टाचार कमी झाला का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? दरडोई उत्पन्न वाढले का? अशा प्रश्नांची उत्तरे शासनाने दिली पाहिजेत. ती दिली जात नाहीत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पंतप्रधानांकडून टाळाटाळ केली जात आहे. नोटाबंदीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून शेतकरी, मजूर, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बेकारी वाढत आहे. मात्र, शासन यावर काहीही भाष्य करीत नाही. शासनाने निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यायला हवीत. कॅशलेस व्यवहारासाठी मूलभूत सुविधा आपल्या देशात उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण असल्याचे राणे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)