शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नोटाबंदीविरोधात शुक्रवारपासून जनआंदोलन

By admin | Updated: January 2, 2017 23:04 IST

नारायण राणे यांची माहिती : राज्यस्तरीय आंदोलनाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवात

कणकवली : केंद्र शासनाच्या फसलेल्या नोटाबंदी निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने राज्यात जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाढती महागाई, नोटाबंदी तसेच सिंधुदुर्गातील विकास ठप्प झाल्यामुळे शासनाचा निषेध करीत काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि. ६) पहिले आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जनतेला ज्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागेल तसेच अन्याय होईल, त्या ठिकाणी यापुढे काँग्रेसच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी जाहीर केले.ओसरगाव येथील महिला भवनाच्या सभागृहात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेश पक्षनिरीक्षक शाम म्हात्रे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, भाजप शासनाचा नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. या निर्णयाला ५० दिवस उलटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सवलती म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. नोटाबंदीनंतर ५० दिवसांत बँकेच्या रांगेत उभे राहिलेल्यांपैकी १०० हून अधिक व्यक्तींचे बळी गेले आहेत. अनेक एटीएम सेंटर बंद आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नोटाबंदीमुळे क्रांती आणली म्हणणारे नरेंद्र मोदी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. नोटाबंदीनंतर कॅशलेस प्रणाली म्हणजे जनतेची फसवणूक आहे. स्वत:चे पैसे बँकेतून काढण्यासाठी जगातल्या कुठल्याच देशात निर्बंध नाहीत. मात्र, भारतात ते घालण्यात आले आहेत. हे शासन राष्ट्र आणि जनहिताचे नसून सध्या नरेंद्र मोदींची हुकूमशाही, बेबंदशाही सुरू आहे.अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांतही ४० ते ४५ टक्के कॅश चलनात आहे. नरेंद्र मोदींसह भाजपने जनतेला निवडणुकीपूर्वी दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न फसवे ठरले आहे.त्यामुळे या सर्व बाबींबरोबरच जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत काँग्रेस आता भाजप शासनाला जाब विचारणार आहे. सिंधुदुर्गसह राज्यात नोटाबंदी आणि कॅशलेस विरोधात काँग्रेस आंदोलन छेडणार आहे. नोटाबंदीच्या ५० दिवसांत ६४ निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. नोटाबंदीबाबत केंद्र शासन संभ्रमावस्थेत आहे. चलनातील ८६ टक्के नोटाबंदी केली. मात्र, त्यामुळे किती काळा पैसा बाहेर आला? याबाबत रिझर्व्ह बँक माहिती देण्यास असमर्थ ठरली आहे. देशातील भ्रष्टाचार कमी झाला का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? दरडोई उत्पन्न वाढले का? अशा प्रश्नांची उत्तरे शासनाने दिली पाहिजेत. ती दिली जात नाहीत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पंतप्रधानांकडून टाळाटाळ केली जात आहे. नोटाबंदीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून शेतकरी, मजूर, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बेकारी वाढत आहे. मात्र, शासन यावर काहीही भाष्य करीत नाही. शासनाने निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यायला हवीत. कॅशलेस व्यवहारासाठी मूलभूत सुविधा आपल्या देशात उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण असल्याचे राणे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)