शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल !- वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:17 IST

रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे.

ठळक मुद्देकणकवलीत पत्रकार परिषद

कणकवली : रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे. लोकसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर कार्यकर्ते आणि मतदारांना अशा प्रकारातून  दहशत दाखवली जात आहे.  मात्र,  जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार वैभव नाईक यांनी येथे केली. 

कणकवली येथील विजय भवन मध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते.   आमदार वैभव नाईक म्हणाले, सत्ता आणि पैसा यांच्या जीवावर राणेंची असलेली मस्ती मागील ५ वर्षात जनतेने उतरवली आहे. टोलनाका तोडफोड प्रकरण , राजन तेली यांच्या मुलाला मारहाण करणे,  संदीप सावंतना  झालेली मारहाण यावरून राणेंची वृत्ती जनतेला दिसून आली आहे.  केवळ इंग्रजी बोलण्यापेक्षा चांगले वर्तन महत्वाचे आहे.

     नितेश व निलेश राणे यांचा सत्ता आणि संपत्तीची जोड घेऊन जनतेत दहशत निर्माण करणे यात हातखंडा आहे. त्यांची ही प्रवृत्ती काही केले तरी बदलू शकत नाही. हे सर्वांनाच माहीत झाले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या मुलांना विविध पक्षात प्रवेश दिला जात आहे. मात्र, यांना कोणताच पक्ष प्रवेश देत नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.

       यापूर्वी घडलेल्या घटना पहाता त्यांच्या पक्षाचा प्रचार करणा?्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर आपली काय स्थिती होऊ शकते ? याचा प्रथम विचार करावा आणि त्यानंतरच प्रचार करावा आणि सावध रहावे. दुस?्यांचे शिक्षण किती झाले ? उमेदवार इंग्लिश बोलतो काय? असले अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण नेमके काय करतो ? याचा आधी विचार करावा आणि त्यानंतरच दुस?्यांना उपदेश करावा .

      गेली चार वर्षे शांततेत असलेला जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. मात्र जनता त्याला भीक घालणार नाही.  निष्ठावंत शिवसैनिकांची काळजी राणे व त्यांच्या पुत्रांनी करू नये. त्यासाठी शिवसेना सक्षम आहे. मात्र, राणेंच्या पुत्रांनी अनेक निष्ठावंत कार्यकत्यार्ना दुखावले आहे. त्यामुळे ते त्यांची साथ सोडून गेले आहेत. हेही प्रथम लक्षात घ्यावे . असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला .

उध्दव ठाकरे १८ रोजी कणकवलीत !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे १८ एप्रिल रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येणार असून त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक