शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल !- वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:17 IST

रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे.

ठळक मुद्देकणकवलीत पत्रकार परिषद

कणकवली : रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे. लोकसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर कार्यकर्ते आणि मतदारांना अशा प्रकारातून  दहशत दाखवली जात आहे.  मात्र,  जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार वैभव नाईक यांनी येथे केली. 

कणकवली येथील विजय भवन मध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते.   आमदार वैभव नाईक म्हणाले, सत्ता आणि पैसा यांच्या जीवावर राणेंची असलेली मस्ती मागील ५ वर्षात जनतेने उतरवली आहे. टोलनाका तोडफोड प्रकरण , राजन तेली यांच्या मुलाला मारहाण करणे,  संदीप सावंतना  झालेली मारहाण यावरून राणेंची वृत्ती जनतेला दिसून आली आहे.  केवळ इंग्रजी बोलण्यापेक्षा चांगले वर्तन महत्वाचे आहे.

     नितेश व निलेश राणे यांचा सत्ता आणि संपत्तीची जोड घेऊन जनतेत दहशत निर्माण करणे यात हातखंडा आहे. त्यांची ही प्रवृत्ती काही केले तरी बदलू शकत नाही. हे सर्वांनाच माहीत झाले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या मुलांना विविध पक्षात प्रवेश दिला जात आहे. मात्र, यांना कोणताच पक्ष प्रवेश देत नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.

       यापूर्वी घडलेल्या घटना पहाता त्यांच्या पक्षाचा प्रचार करणा?्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर आपली काय स्थिती होऊ शकते ? याचा प्रथम विचार करावा आणि त्यानंतरच प्रचार करावा आणि सावध रहावे. दुस?्यांचे शिक्षण किती झाले ? उमेदवार इंग्लिश बोलतो काय? असले अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण नेमके काय करतो ? याचा आधी विचार करावा आणि त्यानंतरच दुस?्यांना उपदेश करावा .

      गेली चार वर्षे शांततेत असलेला जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. मात्र जनता त्याला भीक घालणार नाही.  निष्ठावंत शिवसैनिकांची काळजी राणे व त्यांच्या पुत्रांनी करू नये. त्यासाठी शिवसेना सक्षम आहे. मात्र, राणेंच्या पुत्रांनी अनेक निष्ठावंत कार्यकत्यार्ना दुखावले आहे. त्यामुळे ते त्यांची साथ सोडून गेले आहेत. हेही प्रथम लक्षात घ्यावे . असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला .

उध्दव ठाकरे १८ रोजी कणकवलीत !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे १८ एप्रिल रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येणार असून त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक