शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल !- वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:17 IST

रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे.

ठळक मुद्देकणकवलीत पत्रकार परिषद

कणकवली : रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे. लोकसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर कार्यकर्ते आणि मतदारांना अशा प्रकारातून  दहशत दाखवली जात आहे.  मात्र,  जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार वैभव नाईक यांनी येथे केली. 

कणकवली येथील विजय भवन मध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते.   आमदार वैभव नाईक म्हणाले, सत्ता आणि पैसा यांच्या जीवावर राणेंची असलेली मस्ती मागील ५ वर्षात जनतेने उतरवली आहे. टोलनाका तोडफोड प्रकरण , राजन तेली यांच्या मुलाला मारहाण करणे,  संदीप सावंतना  झालेली मारहाण यावरून राणेंची वृत्ती जनतेला दिसून आली आहे.  केवळ इंग्रजी बोलण्यापेक्षा चांगले वर्तन महत्वाचे आहे.

     नितेश व निलेश राणे यांचा सत्ता आणि संपत्तीची जोड घेऊन जनतेत दहशत निर्माण करणे यात हातखंडा आहे. त्यांची ही प्रवृत्ती काही केले तरी बदलू शकत नाही. हे सर्वांनाच माहीत झाले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या मुलांना विविध पक्षात प्रवेश दिला जात आहे. मात्र, यांना कोणताच पक्ष प्रवेश देत नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.

       यापूर्वी घडलेल्या घटना पहाता त्यांच्या पक्षाचा प्रचार करणा?्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर आपली काय स्थिती होऊ शकते ? याचा प्रथम विचार करावा आणि त्यानंतरच प्रचार करावा आणि सावध रहावे. दुस?्यांचे शिक्षण किती झाले ? उमेदवार इंग्लिश बोलतो काय? असले अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण नेमके काय करतो ? याचा आधी विचार करावा आणि त्यानंतरच दुस?्यांना उपदेश करावा .

      गेली चार वर्षे शांततेत असलेला जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. मात्र जनता त्याला भीक घालणार नाही.  निष्ठावंत शिवसैनिकांची काळजी राणे व त्यांच्या पुत्रांनी करू नये. त्यासाठी शिवसेना सक्षम आहे. मात्र, राणेंच्या पुत्रांनी अनेक निष्ठावंत कार्यकत्यार्ना दुखावले आहे. त्यामुळे ते त्यांची साथ सोडून गेले आहेत. हेही प्रथम लक्षात घ्यावे . असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला .

उध्दव ठाकरे १८ रोजी कणकवलीत !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे १८ एप्रिल रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येणार असून त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक