शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

राणेंनाच जनतेने पळवून लावले

By admin | Updated: November 7, 2015 22:19 IST

वैभव नाईक : शिवसेना नेहमीच मच्छिमारांच्या पाठीशी

मालवण : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या ‘पळपुटा आमदार’ या विधानाचा आमदार वैभव नाईक यांनी चांगलाच समाचार घेत राणे यांना चिमटे काढले. जिल्ह्यातील सुज्ञ जनतेने नारायण राणे यांना नाकारून मुंबईला पळविले. त्यानंतर मुंबईच्याही जनतेने त्यांना नाकारून मुंबईतून पळवून लावले आहे. त्यामुळे कोण ‘पळपुटा’ आहे याचा राणे यांनी विचार करावा, अशी नाईक यांनी बोचरी टीका करीत चोख प्रत्युत्तर दिले. शिवसेना नेहमीच मच्छिमारांच्या पाठीशी राहिली आहे. बेकायदेशीर आणि पर्ससीन मासेमारीप्रश्नी शिवसेनेची भूमिका विरोधीच राहील अशी स्पष्टोक्ती नाईक यांनी दिली. येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नाईक बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबू टेंबुलकर, तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर, सोमनाथ लांबोर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. नाईक म्हणाले, जनतेच्या न्याय हितासाठी शिवसैनिक गुन्हे दाखल करून घेण्यास कधीही माघार घेणार नाहीत. मच्छिमारांनी कायदा हातात घेऊ नये व जिल्ह्यात शांतता राहावी हीच आपली भूमिका आहे. मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर पुढील आठवड्यात मालवण दौऱ्यावर येणार आहेत. मत्स्योद्योग मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही मच्छिमारांना पाठिंबा असून, येत्या हिवाळी अधिवेशनात मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत निश्चितच आवाज उठविला जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)