शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परुळेकरांचा राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध : पेडणेकर

By admin | Updated: November 17, 2015 00:01 IST

आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सिंधुदुर्गनगरी : काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे केवळ राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध दर्शवून स्थानिकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. भांडणे लावण्यापेक्षा त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांना भडकविण्याचे काम करू नका अन्यथा आपल्याविरोधात आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर यांच्यासह आरोंदा ग्रामस्थांनी दिला आहे. आरोंदा जेटीसंदर्भात सोमवारी आरोेंदा ग्रामस्थ व मच्छिमारांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत नाईक, वासुदेव कोचरेकर, आनंद परब, राजेश नाईक, तुळशीदास कुबल, भगवान नाईक, ज्ञानदेव नाईक, संतोष नाईक, गोपाळ नाईक, राजाराम रेडकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व मच्छिमार उपस्थित होते. तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शंभराहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आरोंदा येथील जेटीचे काम व्हाईट आॅर्चिड प्रा. लि. कंपनीकडून सुरु आहे. या जेटीवर अनेक बेरोजगार तरुण अवलंबून आहेत. ज्यांना रोजीरोटी नाही अशांना रोजगारांची संधी जेटीच्या स्वरुपात प्राप्त झाली आहे. मात्र गेली दोन वर्षे या जेटीसंदर्भात राजकीय संघर्षाचे वळण लागल्याने जेटीला प्रोत्साहन मिळत नाही. तरी स्थानिक लोकांच्या बेरोजगारीचा विचार करूनही जेटी चालू होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर म्हणाले की, आरोंदा जेटी झाल्यास कित्येकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्या आरोंदा जेटीसंदर्भात नाहक राजकारण केले जात आहे. या राजकीय संघर्षात आरोंदावासिय, ग्रामस्थ व मच्छिमार भरडले जात आहेत. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीला मान्यता देऊन चांगले काम केले. त्यांचे आम्ही अभिनंदनच करतो. पण काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे आरोंदा जेटीच्या कामात राजकारण करून ग्रामस्थांमध्ये तंटे लावण्याचे काम करत आहेत. (प्रतिनिधी)परुळेकरांचा राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध : पेडणेकरसिंधुदुर्गनगरी : काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे केवळ राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध दर्शवून स्थानिकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. भांडणे लावण्यापेक्षा त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांना भडकविण्याचे काम करू नका अन्यथा आपल्याविरोधात आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर यांच्यासह आरोंदा ग्रामस्थांनी दिला आहे.आरोंदा जेटीसंदर्भात सोमवारी आरोेंदा ग्रामस्थ व मच्छिमारांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत नाईक, वासुदेव कोचरेकर, आनंद परब, राजेश नाईक, तुळशीदास कुबल, भगवान नाईक, ज्ञानदेव नाईक, संतोष नाईक, गोपाळ नाईक, राजाराम रेडकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व मच्छिमार उपस्थित होते. तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शंभराहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.आरोंदा येथील जेटीचे काम व्हाईट आॅर्चिड प्रा. लि. कंपनीकडून सुरु आहे. या जेटीवर अनेक बेरोजगार तरुण अवलंबून आहेत. ज्यांना रोजीरोटी नाही अशांना रोजगारांची संधी जेटीच्या स्वरुपात प्राप्त झाली आहे. मात्र गेली दोन वर्षे या जेटीसंदर्भात राजकीय संघर्षाचे वळण लागल्याने जेटीला प्रोत्साहन मिळत नाही. तरी स्थानिक लोकांच्या बेरोजगारीचा विचार करूनही जेटी चालू होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर म्हणाले की, आरोंदा जेटी झाल्यास कित्येकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्या आरोंदा जेटीसंदर्भात नाहक राजकारण केले जात आहे. या राजकीय संघर्षात आरोंदावासिय, ग्रामस्थ व मच्छिमार भरडले जात आहेत. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीला मान्यता देऊन चांगले काम केले. त्यांचे आम्ही अभिनंदनच करतो. पण काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे आरोंदा जेटीच्या कामात राजकारण करून ग्रामस्थांमध्ये तंटे लावण्याचे काम करत आहेत. (प्रतिनिधी)