शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासाच्या नियोजनात सहभागी व्हा

By admin | Updated: February 1, 2017 00:35 IST

दीपक केसरकर यांचे आवाहन : महिला ढोलपथकाची शोभायात्रा ठरली आकर्षण, व्यापारी मेळावा उत्साहात

वैभववाडी : आपल्या व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन निर्माण करुन व्यापाऱ्यांनी जिल्हा विकासाच्या नियोजनात सहभागी झाले पाहिजे. त्याचबरोबर चाकोरीबद्ध पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडून शासनाच्या योजनांचा लाभ घेत नवे उद्योगधंदे उभारण्यासाठी पुढाकार घेऊन स्थानिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करतानाच जिल्ह्याच्या व्यापारवृध्दीत कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यापारी एकता मेळाव्यात दिली.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या २९ व्या व्यापारी एकता मेळाव्याला शोभायात्रेने सुरुवात झाली. तर पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते एकता मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे शंतनू भडकमकर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, सभापती शुभांगी पवार, नगराध्यक्ष संजय चव्हाण, सारस्वत बँकेचे अनिल सौदागर, अरविंद नेवाळकर, मुख्याधिकारी सचिन बोरसे, वैभववाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज सावंत, जिल्हा महासंघाचे सहकार्यवाह संजय सावंत, स्वागताध्यक्ष संजय लोके, रविराज जाधव, नितीन वाळके आदी उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, एकता मेळाव्यातून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या एकतेचे दर्शन घडते. व्यापाऱ्यांनी जीएसटीचे स्वागत केले पाहिजे. व्यापारात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यवसायाच्या मार्केटिंगचे तंत्र अंगिकारण्याची गरज आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या एकतेचे दर्शन महाराष्ट्राला अनेकदा झाले आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करून सचोटीने व्यापार करणारा जिल्हा अशी राज्यात सिंधुदुर्गची ओळख आहे. ही शक्ती महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरावी, असे आवाहन केसरकर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, मी गृहमंत्री असलो तरी आधी व्यापारीच होतो. त्यामुळे व्यापारी बांधवाच्या भावना, व्यवसायात येणाऱ्या अडचणींची आपल्याला चांगली जाण आहे. व्यापाराशी निगडीत अर्थ खातेही माझ्याकडेच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात नवनव्या उद्योग विकासाच्या योजना येऊ घातल्या आहेत. त्यांचा लाभ जिल्ह्यातील लोकांनी घेतला पाहिजे. न्याहारी-निवास योजनेसाठी व्यापाऱ्यांनी स्वत: पुढे येऊन स्थानिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अन्यथा, कोकणातील माणसांच्या अर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्याा 'चांदा ते बांदा' सारख्या योजनांचा लाभ परप्रांतीय लोक उठविल्याशिवाय राहणार नाहीत असेही केसरकर म्हणाले.आमदार नीतेश राणे म्हणाले की, व्यापाऱ्यांना पोषक वातावरण निर्माण करुन त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार व आमची आहे. व्यापाऱ्यांसाठी पुढचा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आर्थिक समृद्धीत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी व्यापाऱ्यांना ताकद देण्याची गरज आहे. नोटाबंदीचा निर्णय चांगला की वाईट हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण 'कॅशलेस' व्यवहारासाठी व्यापाऱ्यांना सुविधा निर्माण करुन देण्याची जबाबदारी सरकारचे मंत्री म्हणून केसरकरांची आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवतानाच त्यांना आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करु. यावेळी जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या मांडताना कॅशलेसची सक्ती ठीक आहे. परंतु, त्यातून गरीब आणि शेतकऱ्यांना तूर्तास वगळले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दिगंबर सावंत यांना जीवनगौरव, शेवंता साळवी यांना महिला उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. राजेंद्र पाताडे, संतोष टक्के यांनी सुत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)