शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अर्धवट प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण!

By admin | Updated: June 6, 2016 00:52 IST

दीपक केसरकर : ओरोस येथील कार्यशाळा उत्साहात; सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविताना मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करून महाराष्ट्रात सिंधुदुर्ग सर्वांगीण विकास असलेला जिल्हा बनविणे हेच माझे ध्येय आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धवट राहिलेले प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण केले जातील, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी शरद भवन येथील कार्यशाळेत केले. ओरोस येथील शरद कृषी भवन येथे रविवारी चांदा ते बांदा आराखडा, कोकण ग्रामीण विकास पर्यटन आराखडा सादरीकरण, माझं गावं माझा विकास योजना सादरीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, आमदार वैभव नाईक, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, रचना संसद इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ए. डी. चिटणीस, चांदा ते बांदाच्या उच्चस्तरीय समितीचे सदस्य लीना बनसोड, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, बबन साळगावकर, सभापती सुचिता वजराठकर, शुभांगी पवार, रवींद्र जोगल, माजी आमदार प्रमोद जठार, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, जान्हवी सावंत यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख, ग्रामसेवक, सरपंच, आदी ८०० जण उपस्थित होते.केसरकर म्हणाले, पर्यटन व शेती समृद्धीतून आपल्याला आर्थिक विकास साधावयाचा आहे. दरडोई उत्पन्नात जिल्हा पुढारलेला आहे असे म्हणताना जिल्ह्यातील ४० हजार दारिद्र्यरेषेखालील जनता विसरून चालणार नाही. म्हणून केवळ पर्यटन नाही, तर शेतीतूनही जिल्हा समृद्ध झाला पाहिजे. त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. वरील चारही योजनांच्या सादरीकरणाचा सर्वांनी सर्व दृष्टिकोनातून विचार करावा व आपला गाव आदर्श पर्यटन गाव करण्याचा प्रयत्न करावा आणि आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहनही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर म्हणाले, सिंधुदुर्गासाठी हा सुवर्णक्षण आहे. असे सांगून विकास आराखड्याच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहेत. त्याचा तेथील ग्रामस्थांनी फायदा करून घ्यावा. मात्र, पर्यटनस्थळांची जाहिरात करताना फसवेगिरी असू नये, असेही ते म्हणाले.आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्गची लोकसंख्या वर्षानुवर्षे कमी होत आहे. सिंधुदुर्गातील रोजगाराची कमतरता हेच कारण प्रामुख्याने पुढे येते. म्हणून या माध्यमातून रोजगार वाढल्यास येथील जनता पुन्हा स्थिरावेल अशी आशा असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व रचना संसदचे अध्यक्ष ए. डी. चिटणीस यांचीही समयोचित भाषणे झाली. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांचे लाड आता खूप झालेकार्यशाळा सुरू झाली आणि सभागृहात विजेचा लपंडाव सुरू झाला. बंदिस्त सभागृहात उपस्थित कासावीस व्हायला लागले. त्यावेळी वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या विशेष कार्यशाळेच्या कार्यक्रमात असा हलगर्जीपणा करणे हे योग्य नसून या अधिकाऱ्यांना याची किंमत चुकवावीच लागेल. गेल्या दीड वर्षात अधिकाऱ्यांचे खूप लाड केले. मात्र, यापुढे तसे लाड न करता काम करा, अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यात बदलीसाठी तयार व्हा, असा सज्जड दमही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.