शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक मच्छिमारांची नेत्यांकडून कायम दिशाभूलच: परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:09 IST

पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या काहीजणांनी या मच्छिमारांची कायमच दिशाभूल केली आहे. फक्त संघर्षासाठी पारंपारिक मच्छिमाराना वापरून घेऊन न्याय मात्र कधीही मिळवून दिलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पारंपारिक मच्छिमारानी आता तरी विचार करावा आणि सावध व्हावे .असे आवाहन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देपारंपारिक मच्छिमारांची नेत्यांकडून कायम दिशाभूलचपरशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या काहीजणांनी या मच्छिमारांची कायमच दिशाभूल केली आहे. फक्त संघर्षासाठी पारंपारिक मच्छिमाराना वापरून घेऊन न्याय मात्र कधीही मिळवून दिलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पारंपारिक मच्छिमारानी आता तरी विचार करावा आणि सावध व्हावे .असे आवाहन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, श्रमिक मच्छिमारांचे पदाधिकारी व पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी प्रथम टॉलर्स त्यांनतर अत्याधुनिक पर्ससीननेट , गिलनेट व आता एलईडी फिशिंग असा संघर्ष पारंपारिक मच्छिमारांसाठी तयार केला.मात्र, नेतेगिरी मिरवणाऱ्या या नेत्यांनी पारंपारिक मच्छिमारांसोबत कोणतीही बैठक न घेता आगामी निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानाला पाठींबा देण्याचा परस्पर निर्णय जाहीर केला आहे. या हंगामातील मच्छिमारी ३१ मे रोजी संपणार असताना एक आठवड्यापूर्वी हा निर्णय घेऊन त्यांनी कोणाचा स्वार्थ साधला?पारंपारिक मच्छिमारांनी मेळावा घेऊन अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मतदानाच्या दोन दिवस आधी तो निर्णय बदलणारे कोण होते? हे पारंपारिक मच्छिमारांनी शोधण्याची गरज आहे.आचरा येथील आंदोलनात ९३ पारंपारिक मच्छिमारांवर गुन्हा दाखल करणारे व पारंपारिक मच्छिमार आता स्वाभिमान पक्षात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? हा खरा प्रश्न आहे. आतापर्यंत पारंपारिक मच्छिमारांच्या संघर्षात ज्यांनी दरोडे किंवा खुनाचा प्रयत्न असा गुन्हा अंगावर घेतला त्या मच्छिमारांचे आता पुढे काय होणार? याचा विचार होणे आवश्यक आहे.स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पंधरा वर्षे पालकमंत्री होते तर आता भाजपचे खासदार आहेत. गेल्या दोन वर्षात किंवा त्यापूर्वी त्यांनी पारंपारिक मच्छिमारांच्या प्रश्नासाठी केंद्र शासनाजवळ काय प्रयत्न केले? त्याचबरोबर खासदार विनायक राऊत , केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू , अनंत गीते यांनी गेल्या ४ वर्षात काय उपाययोजना केल्या आहेत ? मग यापूर्वी काहीही करू न शकलेले हे नेते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरी काय प्रयत्न करणार आहेत?एलईडी बारा नॉटिकलच्या बाहेर मच्छिमारी करीत असल्याने हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. त्यावर शासनाला निर्णय घेण्यास लावण्याऐवजी खासदार विनायक राऊत केंद्रीय मंत्र्यांकडे एलईडी फिशिंग करणाऱ्यांना घेऊन गेले. ही शोकांतिका आहे.पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी स्वाभिमानला पाठींबा देताना त्या पक्षाच्या किती सदस्यांच्या एलईडी पर्ससीननेट आहेत हे अभ्यासले नाही का ? त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या पक्षात आधुनिकीकरणाच्या नावाखाली मच्छिमारी करणारे आहेत. त्याना पाठींबा देऊन पारंपारिक मच्छिमारांचे नेते कोणाला न्याय मिळवून देणार आहेत.पालकमंत्री असताना नारायण राणे यांनी आधुनिकतेची कास धरणारे असे ज्यांच्याबद्दल सांगितले त्यांनीच पर्ससीननेट धारकांची संस्था निर्माण केली आहे . त्याच नेत्यांनी आता एलईडीमुळे पर्ससीननेट चालत नसल्याने व्यवसायातून मुक्त होवून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर आता पारंपारिक मच्छिमारांना उपदेश करून राजकारणातून आपले पुनर्वसन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे सर्व जनतेला माहीत आहे.श्रमिक जीव रापण मच्छिमार संघटनेच्या अध्यक्षानी स्वाभिमान पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करणारे आणि पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या श्रमिक जीव रापण मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नॅशनल फिश वर्कर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत आपली भूमिका काय आहे? ते जाहीर करावे .असे ही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग