शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भात कापणीच्या वेळी अनेक आजार डोके वर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:32 IST

खरीप भात लावणी आणि भात कापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्वेतिहास पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकºयांना भात कापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे.

ठळक मुद्देलेप्टोची भीती : शेतकरी हवालदिलबळींमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची संख्या अधिकपायरोजन, हेप्टोमेडिस, पुनामा , इक्टिरोहिमोरेडिका लेप्टोचे ज्ञात जीवाणू

कडावल,11 : ग्रामीण भागात भातकापणीच्या कामास वेग आला आहे. परिणामी लेप्टो स्पायरोसिसच्या जीवाणूंचे वसतिस्थान असणाºया भात खाचरांशी आता शेतकºयांचा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला आहे. जिल्ह्यातील अनेक व्यक्तींचे बळी घेतलेल्या या रोगाचे सावट अद्याप पूर्णत: दूर झालेले नाही. खरीप भात लावणी आणि भात कापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्वेतिहास पाहता  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकºयांना भात कापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला गेल्या काही वर्षांपासून लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला कणकवली तालुक्यातील काही गावांपर्यंतच मर्यादित असलेल्या लेप्टोने नंतर जिल्ह्याच्या इतर भागातही थैमान घालायला सुरुवात केली. या रोगामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लेप्टोच्या प्रभावाखाली प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता अधिक प्रमाणात आल्याचे दिसून येते. विशेषत: भात लावणी व भात कापणीच्या काळातच या रोगाचा अधिक फैलाव झाल्याचा पूर्वेतिहास असून आजपर्यंत या रोगामुळे गेलेल्या बळींमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची संख्या अधिक आहे.

लेप्टो जीवाणूंचे उगमस्थान असलेल्या उंदीर, घुशींचा वावर जेथे अस्वच्छता व अडगळ असेल तेथे मोठ्या प्रमाणात असतो. तेथे त्यांनी विसर्जित केलेल्या मूत्रातील जीवाणू आसपासच्या परिसरात तसेच भात खाचरात स्थिरावतात. केवळ दोन मिली मूत्रात सुमारे दहा कोटी जीवाणूंचा अधिवास असू शकतो. यावरून याची भयानकता सहज लक्षात येते. पायरोजन, हेप्टोमेडिस, पुनामा व इक्टिरोहिमोरेडिका इत्यादी लेप्टोचे प्रमुख ज्ञात जीवाणू आहेत.

लेप्टोचा फैलाव झाला की, पौष्टिक आहार घ्या, पायात गमबूट घाला, हातमोजांचा वापर करा असे सल्ले आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून शेतकºयांना दिले जातात. मात्र एका गमबूटची किंमत आज एक हजार रूपयांच्या आसपास आहे. एवढा खर्च गरीब शेतकºयांच्या आवाक्याबाहेर आहे. दरम्यान, परिसरात भातकापणीला जोरदार सुरुवात झाली आहे. शेतकरी दिवसभर भातखाचरात राबत आहेत. लेप्टोची काळी छाया अद्यापही पूर्णत: दूर झालेली नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना भातकापणी बरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावत आहे.