शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दखल न घेतल्यास जनतेचा उद्रेक

By admin | Updated: February 10, 2015 00:27 IST

आरोंदा जेटीप्रकरण : परशुराम उपरकर यांनी दिला इशारा

कणकवली : आरोंदा जेटीप्रकरणी पोलीस धाकदपटशा करून तेथील मच्छिमारांना उद्ध्वस्त करीत आहेत. मच्छिमारांचा लढा सनदशीर मार्गाने सुरु असताना प्रशासनाने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. पोलिसांकडून गस्तीनौकेचा वापर मच्छिमारांवर दबाव आणण्यासाठी केला जात असून हे तत्काळ न थांबल्यास जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा मनसेचे कोकण विभागीय संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, आरोंदा जेटीमुळे अनेक दुष्परिणाम होणार असल्याने आपण ग्रामस्थांबरोबर लढा सुरु केला. मात्र आता या जेटीचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. कोळसा घेऊन आलेल्या बार्जेसमुळे आरोंदा जेटी परिसरात पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गोवा तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या आशिर्वादाने मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांना त्यांची जाळी काढायला लावून ही बार्जेस जेटीपर्यंत आणण्यात आली. हा मच्छिमारांना उद्ध्वस्त करण्याचाच प्रयत्न आहे. मच्छिमारी करण्यास कोणतीही परवानगी नाकारणार नाही असे मेरीटाईम बोर्डाला जेटीशी संबंधित असलेल्यांनी लिहून दिले होते. परंतु आता मच्छिमारीला अटकाव करण्यात येत आहे. पालकमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होत असून मच्छिमारांना उद्ध्वस्त होण्यापासून ते वाचवू शकत नाहीत. वास्तविक मच्छिमारांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणे आवश्यक होते. मात्र तसे अजूनही झालेले नाही. मच्छिमारांच्या संस्थेमार्फत ११७ जणांनी मेरीटाईम बोर्डाकडे नोंद केली असून कर्जही घेतले आहे. ते सर्व मच्छिमार देशोधडीला लागणार आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही असे सांगणारे पालकमंत्री आपल्या मतदारसंघात कोळशाची वाहतूक होत असतानाही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुळावर उठणारे हे शासन असल्याचे स्पष्ट होत असून गोरगरीबांचे रोजगार काढून घेतले जात आहेत, असेही उपरकर म्हणाले. (वार्ताहर)पालकमंत्री मूग गिळून गप्प का?आरोंदा जेटीमुळे मच्छिमार देशोधडीला लागत असताना आजी व माजी पालकमंत्री मूग गिळून का गप्प बसले आहेत हेच समजत नसल्याचे उपरकर म्हणाले. ११ फेब्रुवारी रोजी सुनावणीआरोंदा जेटीप्रकरणी अवमान याचिकेची ११ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. जेटीवर कोळसा उतरवून ती सुरु केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न जेटीचालकांकडून करण्यात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे उपरकर म्हणाले.