शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

आचरा ग्रामसभेत ठराव : देवस्थान जमिनप्रश्नी न्यायाची मागणी

आचरा : आचरा गावच्या जमिनींच्या सात-बारावरील वरिष्ठ धारणकर्ता म्हणून श्री देव रामेश्वर हे नाव कमी करून सात-बारा हा पूर्ववत करावा, अशी मागणी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत करण्यात आली होती. परंतु आजमितीपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत शासनाने याबाबत निर्णय १० जानेवारीपर्यंत न दिल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर निर्णय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा ठराव आचरा ग्रामसभेत घेण्यात आला.आचरा गावची ग्रामसभा सरपंच मंगेश टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर, चंदू पांगे, अवधूत हळदणकर, तृप्ती मिराशी, परशुराम शेटये, जेरोन फर्नांडीस, अनिल करंडो, साक्षी ठाकूर, समीर ठाकूर, अरूण आपकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.सन १९६४ला फेरफार क्रमांक २५९५ प्रमाणे नंतर सात-बारावर इतर हक्कात देवस्थानला फक्त वसुलीचा अधिकार असा शेरा ठेवण्यात आला होता. २९ मे १९७४ साली परिपत्रकानुसार आचरा फेरफार क्रमांक ३१७३ व गाऊडवाडी फेरफार १४५५ होऊन वरिष्ठ धारण करणारा म्हणून श्री देव रामेश्वर व कनिष्ठधारक यांची नावे दाखल करण्यात आली. ज्या परिपत्रकाने हा बदल झाला. त्याची माहिती तहसील कार्यालयाकडे ग्रामपंचायतीने केली असता उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. हा गोंधळात टाकणारा बदल महसूल खात्याच्या चुकीच्या फेरबदलाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यामुळे आचरा गावच्या जमिनीची खरेदी-विक्री, बिनशेती, बोजा धारण करणे असे व्यवहार बंद पडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यामुळेच ग्रामस्थांच्या मागणीमुळे १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत देवस्थानच्या खुद्द मालकीच्या जमिनी सोडून इतर जमिनीच्या सात-बारावरील देवस्थानचे नाव कमी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. परंतु शासन दरबारी आजच्या दिवसापर्यंत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनाचा मार्ग आचरा ग्रामसभेत घेतला आहे.यावेळी ग्रामसभेत आपले मत मांडताना ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर म्हणाले, देवस्थानचे नाव सात-बारावरून कमी होणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्या जीविताचा हा प्रश्न आहे. देवस्थानचे नाव कमी करणे म्हणजे आम्ही देवाच्या विरोधात नाही. देव रामेश्वराचे हक्क अबाधित राखले जातील, पूर्वी ज्याप्रमाणे ‘इ’ करार होत होते त्याचप्रमाणे ‘इ’ करार व्हावेत, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी आचऱ्याच्या आठवडा बाजाराची जागा बदलल्यावरून जोरदार चर्चा झाली. गेल्या ग्रामसभेत आचरा आठवडा बाजाराची जागा बदलण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्याची इतिवृत्तात नोंदच नसल्याने सरपंच टेमकर यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले व वेळीच उपाययोजना करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)न्यायालयीन लढा देणारसात-बारावरून देवस्थानचे नाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत न्यायालयीन लढाई देण्याचे यावेळी ग्रामसभेत ठरविण्यात आले. यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल न्यायाधिकरण यांच्याकडे न्याय मागण्यासाठी न्यायालयीन लढा चालू करण्यात यावा व त्यासाठी लागणारा खर्च हा ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजन गावकर यांनी केली असता ग्रामसभेच्यावतीने मान्य करण्यात आली. न्यायालयीन लढा सक्षम करण्यासाठी ग्रामस्थांमधून ग्रामसभेत एक कमिटी तयार करण्यात आली असून यामध्ये आबा मुणगेकर, अनिल करंजे, जयदीप पांगे, सुभाष नलावडे, सचिन बागवे आदींचा समावेश करण्यात आला आहे.