शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

औद्योगिक भूमीला साजेसे साहित्य संमेलन करणार

By admin | Updated: December 17, 2015 01:23 IST

डॉ. पी. डी. पाटील : चिपळूणकरांना दिले साहित्य संमेलनाचे निमंत्रण

चिपळूण : पिंपरी - चिंचवड ही संताची भूमी आहे. या भूमीत हे साहित्य संमेलन होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या औद्योगिक भूमिला साजेसे साहित्य संमेलन आम्ही घेणार आहोत. या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी जेथे जेथे गेलो तेथे साहित्यप्रेमींचे मला अपार प्रेम लाभले. साहित्य विश्वाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. माझी पूर्वपुण्याई म्हणूनच मला स्वागताध्यक्ष होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी आज (बुधवारी) केले. पिंपरी - चिंचवड येथे दि. १५ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील लेखक, साहित्यिक व नागरिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने व निमंत्रण देण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पाटील चिपळूणमध्ये आले होते. शहरातील राधाताई लाड सभागृहात जिल्ह्यातील लेखक, साहित्यिक व नागरिकांशी संवाद साधून संमेलनाला येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी ज्येष्ठ कवी अरुण शेवते, माजी आमदार व संपादक नानासाहेब जोशी, को - आॅर्डिनेटर सचिन एटकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रा. सुहास बारटक्के उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने नानासाहेब जोशी यांनी पाटील यांचा सत्कार केला. पहिले निमंत्रण नगराध्यक्षा सावित्री होमकळस व त्यांच्या सहकाऱ्यांना डॉ. पाटील यांनी दिले. माजी आमदार जोशी यांनी चिपळूणमध्ये झालेले नाट्यसंमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, संगीत महोत्सव व साहित्य संमेलन यशस्वी झाल्याच्या आठवणी यावेळी जागवल्या. राज्यात जळगावनंतर या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. हे शहर चांगल्यारितीने सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य लोकांच्या घरापर्यंत पोहचवावे. पुण्याची समृध्दी कोकणने केली हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवराय व लोकमान्य टिळक यांची उदाहरणे दिली. कोकणाकडे आपण प्रेमाने पहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार भावे यांनी संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनात लेखक, साहित्यिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी राज्यातील विविध विभागात भेटी देत जागृती करत असल्याचे सांगितले. तरुणांसह सर्वांना संमेलनाचे अपडेट मिळावेत यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. संमेलनाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ७० लाखाचा निधी दिला जाणार आहे, असे पी. डी. पाटील यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)अ‍ॅपचे आज उदघाटनप्रगत, अप्रगत समाजाला एकत्र घेऊन जाणारे बोधचिन्ह संमेलनात आहे. त्याचे अ‍ॅनिमेशन केले आहे. संमेलनाचे अपडेट कळवण्यासाठी तयार केलेल्या अ‍ॅपचे उद्घाटन गुरुवार दि. १७ रोजी अभिनेते अमोल कोल्हे यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गीतकार गुलजार, माजी संरक्षण मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप नितीन गडकरी, विनोद तावडे आदींच्या उपस्थितीत होईल. या संमेलनात गुलजार, गायिका आशा भोसले, चेतन भगत यांच्या मुलाखती होतील.