शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

औद्योगिक भूमीला साजेसे साहित्य संमेलन करणार

By admin | Updated: December 17, 2015 01:23 IST

डॉ. पी. डी. पाटील : चिपळूणकरांना दिले साहित्य संमेलनाचे निमंत्रण

चिपळूण : पिंपरी - चिंचवड ही संताची भूमी आहे. या भूमीत हे साहित्य संमेलन होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या औद्योगिक भूमिला साजेसे साहित्य संमेलन आम्ही घेणार आहोत. या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी जेथे जेथे गेलो तेथे साहित्यप्रेमींचे मला अपार प्रेम लाभले. साहित्य विश्वाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. माझी पूर्वपुण्याई म्हणूनच मला स्वागताध्यक्ष होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी आज (बुधवारी) केले. पिंपरी - चिंचवड येथे दि. १५ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील लेखक, साहित्यिक व नागरिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने व निमंत्रण देण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पाटील चिपळूणमध्ये आले होते. शहरातील राधाताई लाड सभागृहात जिल्ह्यातील लेखक, साहित्यिक व नागरिकांशी संवाद साधून संमेलनाला येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी ज्येष्ठ कवी अरुण शेवते, माजी आमदार व संपादक नानासाहेब जोशी, को - आॅर्डिनेटर सचिन एटकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रा. सुहास बारटक्के उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने नानासाहेब जोशी यांनी पाटील यांचा सत्कार केला. पहिले निमंत्रण नगराध्यक्षा सावित्री होमकळस व त्यांच्या सहकाऱ्यांना डॉ. पाटील यांनी दिले. माजी आमदार जोशी यांनी चिपळूणमध्ये झालेले नाट्यसंमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, संगीत महोत्सव व साहित्य संमेलन यशस्वी झाल्याच्या आठवणी यावेळी जागवल्या. राज्यात जळगावनंतर या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. हे शहर चांगल्यारितीने सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न व्हावे, अशी आपली अपेक्षा आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य लोकांच्या घरापर्यंत पोहचवावे. पुण्याची समृध्दी कोकणने केली हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवराय व लोकमान्य टिळक यांची उदाहरणे दिली. कोकणाकडे आपण प्रेमाने पहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार भावे यांनी संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनात लेखक, साहित्यिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी राज्यातील विविध विभागात भेटी देत जागृती करत असल्याचे सांगितले. तरुणांसह सर्वांना संमेलनाचे अपडेट मिळावेत यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. संमेलनाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ७० लाखाचा निधी दिला जाणार आहे, असे पी. डी. पाटील यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)अ‍ॅपचे आज उदघाटनप्रगत, अप्रगत समाजाला एकत्र घेऊन जाणारे बोधचिन्ह संमेलनात आहे. त्याचे अ‍ॅनिमेशन केले आहे. संमेलनाचे अपडेट कळवण्यासाठी तयार केलेल्या अ‍ॅपचे उद्घाटन गुरुवार दि. १७ रोजी अभिनेते अमोल कोल्हे यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गीतकार गुलजार, माजी संरक्षण मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप नितीन गडकरी, विनोद तावडे आदींच्या उपस्थितीत होईल. या संमेलनात गुलजार, गायिका आशा भोसले, चेतन भगत यांच्या मुलाखती होतील.