शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याचे जलव्यवस्थापन समिती सभेत आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:54 IST

Zp Sindhudurg : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी खोदाईचे काम केले जात असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. घटत चाललेली पाण्याची पातळी वाढावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासन यांनी सभेत दिले.

ठळक मुद्देरेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याचे जलव्यवस्थापन समिती सभेत आदेशघटलेली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल

ओरोस : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी खोदाईचे काम केले जात असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. घटत चाललेली पाण्याची पातळी वाढावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासन यांनी सभेत दिले.जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन झाली. यावेळी समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती महेंद्र चव्हाण, अंकुश जाधव, शेरवानी गावकर, सदस्य मायकल डिसोजा, श्वेता कोरगावकर, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधन विहिरींची खोदाई केली जाते. पाण्‍याचा भरमसाठ उपसा केला जातो. त्याचा परिणाम भूगर्भातील पाण्याच्या पातळीवर होत आहे. तरी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी. यासाठी १५ वित्त आयोगाने तरतूद करण्यात यावी याबाबत सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात त्याचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सभेत दिले.जलसंधारणाच्या कामांचा आराखडा जल व्यवस्थापन समितीसमोर मंजुरीला न ठेवत परस्पर जिल्हा नियोजनाकडे पाठविला गेल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेली महत्त्वाची कामे वगळण्यात आली आहेत, असा आरोप करत जलसंधारणचा वार्षिक कृती आराखडा परस्पर जिल्हा नियोजनकडे कसा गेला ? असा प्रश्न उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत उपस्थित केला. यावर कोणत्याही कामाची यादी अथवा आराखड्याची यादी जल व्यवस्थापन समिती सभेत ठेवल्याशिवाय परस्पर मंजुरीसाठी जिल्हा नियोजनकडे पाठवू नये, असा ठराव घेण्यात आला....तर व्याजासहित रक्कम भरून घेणारदेवगड विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेची तब्बल ६३ लाख ५८ हजार रुपये एवढी पाणीपट्टी थकीत आहे. त्यामध्ये विजयदुर्ग योजनेची १३ लाख ५८ हजार तर देवगड नळयोजनेची ५० लाख रुपये एवढी पाणीपट्टी थकीत आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस बजावण्यात आले आहेत. यातील काही ग्रामपंचायतींकडे ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींनी ती जिल्हा परिषदेकडे भरणा केलेली नाही, अशा काही ग्रामपंचायती असल्याची चर्चा सभागृहात सदस्यांनी केली.

यावर मात्र ज्या ग्रामपंचायतींकडे पूर्ण पाणीपट्टी वसूल झाली आहे. मात्र, त्यांनी ती जिल्हा परिषद भरली नाही अशा ग्रामपंचायतींकडून व्याजासहित पाणीपट्टी भरून घेतली जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सभेत दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग