शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सुसंधी अन् अत्यावश्यक

By admin | Updated: September 20, 2015 23:40 IST

कृषी पर्यटन : पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद

प्रथमेश गुरव-- वेंगुर्र्ले  --‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी परदेशी आहे. आॅस्ट्रेलिया व अमेरिका यासारख्या प्रगत देशात बऱ्यापैकी रुजलेली आहे. तेथील शेतकऱ्यांबरोबरच त्या देशाच्या उत्पन्नालाही हातभार लावणारी आहे. त्यामुळेच तेथील शासनही या उपक्रमाला प्रोत्साहन देते. आपल्या देशात ही संकल्पना नवीन असूनही जेथे कृषी पर्यटन प्रकल्प आहेत, त्यांना पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज शहरी मंडळींसाठी ग्रामीण जीवन हा कुतूहलाचा विषय झाला आहे. प्रगत देशातील कृषी पर्यटन हे फक्त ‘कृषी’ पुरतेच मर्यादित असूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फळांनी बहरलेल्या झाडावरुन स्वत: हातांनी फळे तोडणे, त्याचा आस्वाद घेणे, भाजीपाला स्वत: काढणे, प्राणी पाहणे, बैलगाडीतून शेतात फेरफटका मारणे इत्यादी उपक्रम मोठ्या कल्पकतेने राबविले जातात. आपल्या देशात मात्र अजूनही शेती हा ग्रामीण जीवनाचा कणा आहे. येथील सर्व व्यवहार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी निगडीत असतात. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीलाही शेतीचेच अधिष्ठान लाभले आहे. त्यामुळे आपल्या देशात कृषी पर्यटन हे शेतीबरोबरच ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविते.भारताची ओळख खेड्यांचा देश अशी आहे. येथील जनता शेती व शेतीसंलग्न व्यवसायावर अवलंबून असल्याने शेती ही ग्रामीण भारताची संस्कृती आहे. परंतु, आज शेती व्यवसायापुढे अनेक अडचणी व आव्हाने उभी आहेत. शहरीकरणावर दिलेला भर, जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, हवामानातील अनिश्चितता या सर्वांचा परिणाम शेतीवर झालेला आहे.वाढीव उत्पादन खर्च व शेतमालाची कमी किंमत यामुळे शेतीचे आर्थिक गणित जमेनासे झाले आहे. पण या समस्यांबरोबरच या क्षेत्रात काही नवीन संधीही उपलब्ध होत आहेत. ‘कृषी पर्यटन’ ही त्यापैकीच एक संधी आहे. कृषी पर्यटन व्यवयाय एकंदरीतच जगभर वाढत आहे. विरंगुळा आणि नवनवीन अनुभूती घेण्यासाठी देशाटन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा फायदा आपल्या देशालाही मिळत आहे. पर्यटन हा शेती खालोखाल मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. त्यामुळे वाढत्या पर्यटन व्यवसायाबरोबरच रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध होत आहेत. काही शेतकरी हा उपक्रम राबवित आहेत. निसर्ग सौंदर्यात भर टाकणाऱ्या शेती व बागा, आपली स्वतंत्र ओळख आधीच निर्माण केलेले ग्रामीण खाद्यपदार्थ याचा त्यांनी भांडवल म्हणून वापर केला आहे. कृषी पर्यटनाद्वारे तेथील लोकजीवन व आदरातिथ्य याचा परिचयही पर्यटकांस करुन देत आहेत. या व्यवसायातून शेतकऱ्यांबरोबरच अनेकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उत्पन्न मिळत आहे. कोकणाचा विचार करता येथे येणाऱ्या पर्यटकांचे कोकणचे समुद्रकिनारे हे मुख्य आकर्षण आहे. येथील नारळी, पोफळीच्या, आंबा, काजूच्या बागांनी, वनश्रीने नटलेल्या कोकणच्या निसर्गसौंदर्याने मोलाची भर टाकली आहे. कृषी पर्यटन ही एक अशी संकल्पना आहे की, ज्यामध्ये शेती क्षेत्राशी संबंधित उद्योग उत्पादने आणि कारभाराचा पर्यटन अनुभूतीशी संगम साधण्यात आला. कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्पाची उभारणी करणे, उद्योग, शेती, फुलबागा उत्पादन प्रक्रिया इत्यादी ठिकाणी भेट सहली, शेतीवर आधारीत निवास आदी सुविधांपासून ते बैलगाडी प्रवासापर्यंत कृषी व ग्रामीण संस्कृतीशी संबंधित विविध अनुभव घेण्याची संधी या कृषी व ग्र्रामीण पर्यटनरुपाने पर्यटकांना उपलब्ध करुन देता येते.कृषी पर्यटनालाही फायदा होणार आहे. परदेशी पर्यटकांमुळे शासनाला परकीय चलन मिळू शकते. पर्यटन व्यवसायातून कराच्या माध्यमातून शासनाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. पर्यटनाच्यादृष्टीने होणाऱ्या या विकासाचे केंद्रीकरण टाळले पाहिजे. पर्यायाने माथेरान, महाबळेश्वर, गणपतीपुळेसारखी पर्यटन ठिकाणे सिमेंटची होणार नाहीत. गावातच रोजगार मिळाल्याने मुंबईसारख्या शहरातील वाढत्या शहरीकरणाचा प्रश्न सुटू शकतो. लोककला, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी वेगळा निधी लागणार नाही.