शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

.... तरच विश्वात्मक महात्मा गांधींचे महत्व समजेल : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:13 IST

कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे.... तरच विश्वात्मक महात्मा गांधींचे महत्व समजेल : श्रीपाल सबनीसगोपुरी आश्रमात कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांची १२५ व्या जयंती

कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. हा एकप्रकारे कोकणला मिळालेला बहुमान आहे. अप्पासाहेबांनी महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले. त्याप्रमाणे कृतीही केली. त्यामुळे त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. या कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त वागदे येथील गोपुरी आश्रमाच्यावतीने बहुउद्देशीय सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, अर्पिता मुंबरकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी , हरिहर वाटवे, आबा कांबळे , ललिता सबनीस, अमोल भोगले , रवींद्र मुसळे, शिवचरण, प्रा. दिलीप गरुड , मोहन सावंत आदी उपस्थित होते.यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले, बॅरिस्टर असलेल्या मोहनदास करमचंद गांधींनी ज्यावेळी हातात झाडू घेतला. तेव्हा ते महात्मा गांधी झाले. दुसऱ्या धर्मात काय चांगले आहे? हे समजून घेतले तर आपल्याला महात्मा गांधी समजतील. ते शोषण मुक्तीचा संदेश देत होते. त्यांचा हा संदेश अप्पासाहेब पटवर्धन यांनीही सर्वदूर पोहचवला. हरिजन , भंगी अशा समाजातील विविध घटकांच्या उद्धाराचा प्रयत्न अप्पांनी केला. त्यांचे कृषी तसेच अन्य क्षेत्रातील प्रयोग समजून घ्यावे लागतील. मनातील आणि जनातील स्वच्छता करणारा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो.गांधीवाद हा सर्व धर्माचे तत्व मानतो. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. असे महात्मा गांधी सांगत असत. विनाकारण अर्धवट माहितीच्या आधारावर देशाच्या फाळणीला जबाबदार धरून काही लोक महात्मा गांधींचा द्वेष करीत असतील तर ते मोठे दुर्दैव आहे. महात्मा गांधी , बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान एकच आहे. विकासाच्या संकल्पनाही जवळजवळ एकच आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देशात गांधी , आंबेडकर ,सावरकर यांच्या विचारावरून अलीकडे वाद घातले जातात. ते वाद संपले पाहिजेत. संकुचित मनातून सुरू झालेले हे वाद व्यापक मनातून विचार करून संपविले पाहिजेत.काही लोकांना महात्मा गांधी मेल्यावर देखील पचवता येत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्यावर विखारी शब्दात टीका करतात. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करतात. अपुऱ्या माहितीच्या आधारावर त्यांचे हे कृत्य सुरू असते. त्यातून आपले अज्ञानच ते प्रगट करीत असतात. मात्र, याउलट अप्पासाहेब पटवर्धनांनी गांधी, टिळक, सावरकर या सर्वांच्या भूमिका समजून घेतल्या आणि आपले समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवले. आपणही अप्पांसारखी सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. कोकण प्रांताला अप्पासाहेब पटवर्धनांसारखा नायक मिळाला तसा जर सर्व प्रांतांना मिळाला तर देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल. असेही श्रीपाल सबनीस यावेळी म्हणाले.प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, अप्पासाहेबांचे जीवन कृतिशील होते. त्यांचे विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी गोपुरीतर्फे संवाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे.अप्पासाहेबांनी इथे आर्थिक सक्षमता कशी येईल याचा नेहमी विचार केला.श्रीपाल सबनीस यांच्या सारखी मोठी साहित्यिक व्यक्ती या कार्यक्रमाला आली ही महत्वाची बाब आहे.या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.गोपुरीचे काम सतत चालू आहे.ते या पुढेही जोमाने चालू राहणार आहे.यावेळी रोहिदास धुसर म्हणाले, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारामुळेच मी घडलो आणि पोलीस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली. मी गुरे राखणारा होतो, पण अप्पांच्या विचाराने मी प्रभावित झालो आणि मोठा झालो.त्यामुळे त्यांच्यावर मी हा ग्रंथ लिहू शकलो.ते अनेक संकटातून पुढे गेले.त्यामुळे त्यांच्या हातून मोठे काम उभे राहू शकले.रोहिदास धुसर यांच्या 'बहुजनांचे देवदूत - अप्पासाहेब पटवर्धन ' या ग्रंथाचे प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. अन्य मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.फोटो ओळ -- वागदे येथील गोपुरी आश्रम परिसरातील अप्पासाहेब पटवर्धनांच्या पुतळ्याला श्रीपाल सबनीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दुसऱ्या छायाचित्रात श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसsindhudurgसिंधुदुर्ग