शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

.... तरच विश्वात्मक महात्मा गांधींचे महत्व समजेल : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:13 IST

कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे.... तरच विश्वात्मक महात्मा गांधींचे महत्व समजेल : श्रीपाल सबनीसगोपुरी आश्रमात कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांची १२५ व्या जयंती

कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. हा एकप्रकारे कोकणला मिळालेला बहुमान आहे. अप्पासाहेबांनी महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले. त्याप्रमाणे कृतीही केली. त्यामुळे त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. या कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त वागदे येथील गोपुरी आश्रमाच्यावतीने बहुउद्देशीय सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, अर्पिता मुंबरकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी , हरिहर वाटवे, आबा कांबळे , ललिता सबनीस, अमोल भोगले , रवींद्र मुसळे, शिवचरण, प्रा. दिलीप गरुड , मोहन सावंत आदी उपस्थित होते.यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले, बॅरिस्टर असलेल्या मोहनदास करमचंद गांधींनी ज्यावेळी हातात झाडू घेतला. तेव्हा ते महात्मा गांधी झाले. दुसऱ्या धर्मात काय चांगले आहे? हे समजून घेतले तर आपल्याला महात्मा गांधी समजतील. ते शोषण मुक्तीचा संदेश देत होते. त्यांचा हा संदेश अप्पासाहेब पटवर्धन यांनीही सर्वदूर पोहचवला. हरिजन , भंगी अशा समाजातील विविध घटकांच्या उद्धाराचा प्रयत्न अप्पांनी केला. त्यांचे कृषी तसेच अन्य क्षेत्रातील प्रयोग समजून घ्यावे लागतील. मनातील आणि जनातील स्वच्छता करणारा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो.गांधीवाद हा सर्व धर्माचे तत्व मानतो. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. असे महात्मा गांधी सांगत असत. विनाकारण अर्धवट माहितीच्या आधारावर देशाच्या फाळणीला जबाबदार धरून काही लोक महात्मा गांधींचा द्वेष करीत असतील तर ते मोठे दुर्दैव आहे. महात्मा गांधी , बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान एकच आहे. विकासाच्या संकल्पनाही जवळजवळ एकच आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देशात गांधी , आंबेडकर ,सावरकर यांच्या विचारावरून अलीकडे वाद घातले जातात. ते वाद संपले पाहिजेत. संकुचित मनातून सुरू झालेले हे वाद व्यापक मनातून विचार करून संपविले पाहिजेत.काही लोकांना महात्मा गांधी मेल्यावर देखील पचवता येत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्यावर विखारी शब्दात टीका करतात. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करतात. अपुऱ्या माहितीच्या आधारावर त्यांचे हे कृत्य सुरू असते. त्यातून आपले अज्ञानच ते प्रगट करीत असतात. मात्र, याउलट अप्पासाहेब पटवर्धनांनी गांधी, टिळक, सावरकर या सर्वांच्या भूमिका समजून घेतल्या आणि आपले समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवले. आपणही अप्पांसारखी सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. कोकण प्रांताला अप्पासाहेब पटवर्धनांसारखा नायक मिळाला तसा जर सर्व प्रांतांना मिळाला तर देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल. असेही श्रीपाल सबनीस यावेळी म्हणाले.प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, अप्पासाहेबांचे जीवन कृतिशील होते. त्यांचे विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी गोपुरीतर्फे संवाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे.अप्पासाहेबांनी इथे आर्थिक सक्षमता कशी येईल याचा नेहमी विचार केला.श्रीपाल सबनीस यांच्या सारखी मोठी साहित्यिक व्यक्ती या कार्यक्रमाला आली ही महत्वाची बाब आहे.या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.गोपुरीचे काम सतत चालू आहे.ते या पुढेही जोमाने चालू राहणार आहे.यावेळी रोहिदास धुसर म्हणाले, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारामुळेच मी घडलो आणि पोलीस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली. मी गुरे राखणारा होतो, पण अप्पांच्या विचाराने मी प्रभावित झालो आणि मोठा झालो.त्यामुळे त्यांच्यावर मी हा ग्रंथ लिहू शकलो.ते अनेक संकटातून पुढे गेले.त्यामुळे त्यांच्या हातून मोठे काम उभे राहू शकले.रोहिदास धुसर यांच्या 'बहुजनांचे देवदूत - अप्पासाहेब पटवर्धन ' या ग्रंथाचे प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. अन्य मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.फोटो ओळ -- वागदे येथील गोपुरी आश्रम परिसरातील अप्पासाहेब पटवर्धनांच्या पुतळ्याला श्रीपाल सबनीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दुसऱ्या छायाचित्रात श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसsindhudurgसिंधुदुर्ग