शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

.... तरच विश्वात्मक महात्मा गांधींचे महत्व समजेल : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:13 IST

कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे.... तरच विश्वात्मक महात्मा गांधींचे महत्व समजेल : श्रीपाल सबनीसगोपुरी आश्रमात कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांची १२५ व्या जयंती

कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. हा एकप्रकारे कोकणला मिळालेला बहुमान आहे. अप्पासाहेबांनी महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले. त्याप्रमाणे कृतीही केली. त्यामुळे त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. या कोकणच्या गांधींची महती जर खऱ्या अर्थाने कोकणातील बांधवांमध्ये पोहोचली तरच विश्वात्मक अशा महात्मा गांधींचे महत्व या कोकणातील जनतेला समजू शकेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त वागदे येथील गोपुरी आश्रमाच्यावतीने बहुउद्देशीय सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, अर्पिता मुंबरकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी , हरिहर वाटवे, आबा कांबळे , ललिता सबनीस, अमोल भोगले , रवींद्र मुसळे, शिवचरण, प्रा. दिलीप गरुड , मोहन सावंत आदी उपस्थित होते.यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले, बॅरिस्टर असलेल्या मोहनदास करमचंद गांधींनी ज्यावेळी हातात झाडू घेतला. तेव्हा ते महात्मा गांधी झाले. दुसऱ्या धर्मात काय चांगले आहे? हे समजून घेतले तर आपल्याला महात्मा गांधी समजतील. ते शोषण मुक्तीचा संदेश देत होते. त्यांचा हा संदेश अप्पासाहेब पटवर्धन यांनीही सर्वदूर पोहचवला. हरिजन , भंगी अशा समाजातील विविध घटकांच्या उद्धाराचा प्रयत्न अप्पांनी केला. त्यांचे कृषी तसेच अन्य क्षेत्रातील प्रयोग समजून घ्यावे लागतील. मनातील आणि जनातील स्वच्छता करणारा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो.गांधीवाद हा सर्व धर्माचे तत्व मानतो. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. असे महात्मा गांधी सांगत असत. विनाकारण अर्धवट माहितीच्या आधारावर देशाच्या फाळणीला जबाबदार धरून काही लोक महात्मा गांधींचा द्वेष करीत असतील तर ते मोठे दुर्दैव आहे. महात्मा गांधी , बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान एकच आहे. विकासाच्या संकल्पनाही जवळजवळ एकच आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देशात गांधी , आंबेडकर ,सावरकर यांच्या विचारावरून अलीकडे वाद घातले जातात. ते वाद संपले पाहिजेत. संकुचित मनातून सुरू झालेले हे वाद व्यापक मनातून विचार करून संपविले पाहिजेत.काही लोकांना महात्मा गांधी मेल्यावर देखील पचवता येत नाहीत. त्यामुळे ते त्यांच्यावर विखारी शब्दात टीका करतात. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करतात. अपुऱ्या माहितीच्या आधारावर त्यांचे हे कृत्य सुरू असते. त्यातून आपले अज्ञानच ते प्रगट करीत असतात. मात्र, याउलट अप्पासाहेब पटवर्धनांनी गांधी, टिळक, सावरकर या सर्वांच्या भूमिका समजून घेतल्या आणि आपले समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवले. आपणही अप्पांसारखी सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. कोकण प्रांताला अप्पासाहेब पटवर्धनांसारखा नायक मिळाला तसा जर सर्व प्रांतांना मिळाला तर देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल. असेही श्रीपाल सबनीस यावेळी म्हणाले.प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, अप्पासाहेबांचे जीवन कृतिशील होते. त्यांचे विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी गोपुरीतर्फे संवाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे.अप्पासाहेबांनी इथे आर्थिक सक्षमता कशी येईल याचा नेहमी विचार केला.श्रीपाल सबनीस यांच्या सारखी मोठी साहित्यिक व्यक्ती या कार्यक्रमाला आली ही महत्वाची बाब आहे.या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.गोपुरीचे काम सतत चालू आहे.ते या पुढेही जोमाने चालू राहणार आहे.यावेळी रोहिदास धुसर म्हणाले, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारामुळेच मी घडलो आणि पोलीस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली. मी गुरे राखणारा होतो, पण अप्पांच्या विचाराने मी प्रभावित झालो आणि मोठा झालो.त्यामुळे त्यांच्यावर मी हा ग्रंथ लिहू शकलो.ते अनेक संकटातून पुढे गेले.त्यामुळे त्यांच्या हातून मोठे काम उभे राहू शकले.रोहिदास धुसर यांच्या 'बहुजनांचे देवदूत - अप्पासाहेब पटवर्धन ' या ग्रंथाचे प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. अन्य मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.फोटो ओळ -- वागदे येथील गोपुरी आश्रम परिसरातील अप्पासाहेब पटवर्धनांच्या पुतळ्याला श्रीपाल सबनीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दुसऱ्या छायाचित्रात श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. राजेंद्र मुंबरकर, जयवंत मठकर, ठाकूर, सुचिता कोरगावकर, रोहिदास धुसर, मंगेश नेवगी आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसsindhudurgसिंधुदुर्ग