शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विकासनिधीवर फक्त जनतेचाच अधिकार -विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:38 IST

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो.

ठळक मुद्देश्री आदिष्टी देवी मंदिर आवारात बसविलेल्या हायमास्टचे लोकार्पण

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो. त्यामुळे जनतेला अपेक्षित कामेच या निधीतून झाली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे लोकोपयोगी कामांची निवड करून ती पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी खांबाळे येथे केले.खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी मंदिर परिसरात खासदार निधीतून उभारलेल्या हायमास्टचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवली विधानसभाप्रमुख शैलेश भोगले, नागेंद्र परब, तालुकाप्रमुख मंगेश लोके, रमेश तावडे, नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, सरपंच संचिता गुरव, उपसरपंच लवू साळुंखे, बबन पवार, सूर्याजी पवार, सुनील पवार, शांताराम कदम, अशोक पवार, संजय साळुंखे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले की, विकासनिधीवर फक्त जनतेचाच हक्क असतो. त्यामुळे तुम्ही फक्त विकासकामे सूचवा. ती मार्गी लावण्याचे काम आमचे आहे. तळागाळापर्यंत विकास पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. येथील शेतकºयांच्या आंबा, काजूला चांगला दर मिळाला पाहिजे. काजूला चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. काजू बोर्डाला निधी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अधिकाधिक समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा विकासाकरीता आणलाआहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शैलेश भोगले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री आदिष्टी देवी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बबन पाटील यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ऊस संशोधन केंद्रासाठी प्रयत्नशील!वैभववाडी तालुक्यातील शेतकरी ऊस शेतीकडे वळला आहे. तालुक्यात ऊस कारखाना झाला असता तर ऊसाचे क्षेत्र आणखी वाढले असते. परंतु दोघांच्या भांडणामुळे कारखाना होऊ शकला नाही. ऊसशेतीची शास्त्रीय माहिती मिळावी या हेतूने ऊस संशोधन केंद्र होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिराच्या आवारात बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या उद्घाटनानंतर खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.