शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

विकासनिधीवर फक्त जनतेचाच अधिकार -विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:38 IST

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो.

ठळक मुद्देश्री आदिष्टी देवी मंदिर आवारात बसविलेल्या हायमास्टचे लोकार्पण

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो. त्यामुळे जनतेला अपेक्षित कामेच या निधीतून झाली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे लोकोपयोगी कामांची निवड करून ती पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी खांबाळे येथे केले.खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी मंदिर परिसरात खासदार निधीतून उभारलेल्या हायमास्टचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवली विधानसभाप्रमुख शैलेश भोगले, नागेंद्र परब, तालुकाप्रमुख मंगेश लोके, रमेश तावडे, नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, सरपंच संचिता गुरव, उपसरपंच लवू साळुंखे, बबन पवार, सूर्याजी पवार, सुनील पवार, शांताराम कदम, अशोक पवार, संजय साळुंखे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले की, विकासनिधीवर फक्त जनतेचाच हक्क असतो. त्यामुळे तुम्ही फक्त विकासकामे सूचवा. ती मार्गी लावण्याचे काम आमचे आहे. तळागाळापर्यंत विकास पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. येथील शेतकºयांच्या आंबा, काजूला चांगला दर मिळाला पाहिजे. काजूला चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. काजू बोर्डाला निधी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अधिकाधिक समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा विकासाकरीता आणलाआहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शैलेश भोगले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री आदिष्टी देवी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बबन पाटील यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ऊस संशोधन केंद्रासाठी प्रयत्नशील!वैभववाडी तालुक्यातील शेतकरी ऊस शेतीकडे वळला आहे. तालुक्यात ऊस कारखाना झाला असता तर ऊसाचे क्षेत्र आणखी वाढले असते. परंतु दोघांच्या भांडणामुळे कारखाना होऊ शकला नाही. ऊसशेतीची शास्त्रीय माहिती मिळावी या हेतूने ऊस संशोधन केंद्र होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिराच्या आवारात बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या उद्घाटनानंतर खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.