शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

केवळ अकरा वायरमनवर सव्वाशे वाड्यांचा भार

By admin | Updated: September 27, 2014 00:10 IST

दिव्याखाली अंधार : खाडीपट्टावासीयांना अंधारात राहण्याची वेळ कायमच

खाडीपट्टा : खेड तालुक्यातील खाडीपट्टा भागातील कर्जी बीट येथील महावितरण कंपनीच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना व सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्जी बीट येथे एकूण १३ वायरमनची मंजूूर आहेत. प्रत्यक्षात येथे ११ वायरमन वर्षानुवर्ष राबत आहेत. त्यामुळे महावितरणच्या ११ कर्मचाऱ्यांवर २३ पेक्षा जास्त गावातील १२५ वाड्यांचा भार सोसावा लागत आहे.कर्जी बीट कार्यालयामध्ये फक्त ११ कर्मचारी कार्यरत असल्यामुळे प्रत्येक वायरमनकडे अनेक वाड्यांचा भार असतो. एखाद्या गावातील किंवा घरातील वीज गेल्यास त्या गाव किंवा वाडीला चार पाच दिवस अंधारात राहावे लागते. कर्जी बीटअंतर्गत नांदगाव, कोरेगाव, संगलट, शेरवली, तळघर, अणसुरे, मुंबके, शिर्शी, राजवेल, कर्जी, आमशेत, मुळगाव, तुंबाड, बहिरवली, होडखाड, पन्हाळे, आष्टीसह सुमारे २३ गावांतील १२५ वाड्या आहेत. या गावातील मोठ्या व जंगल भागातील मोठ्या लोकसंख्येच्या १०० पेक्षा जास्त वाड्या आहेत. मात्र, त्यांच्यासाठी कर्जी बीट कार्यालयामध्ये फक्त ११ वायरमन असल्याने त्यांची मोठी परवड होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या सर्व गावांमध्ये ५५ पेक्षा जास्त ट्रान्सफार्मर असून, वायरमन अपुरे आहेत. वास्तविक एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी कमीत कमी १५ ते १७ वायरमन असणे आवश्यक होते. सध्याची खाडीपट्टा परिसराची परिस्थिती बिकट आहे. येथील काही गावांना वायरमन नसल्याने या गावातील वीजधारकांचे हाल होत आहेत. त्यांना पावसाळ्यात अधिक अंधाराचा त्रास होतो. वायरमन दुरुस्तीच्या कामासाठी नेहमीच बाहेर असतात. सडलेले खांब दिसत असतानाही जीव धोक्यात घालून दुरुस्तीची कामे करतात. कधी या कर्मचाऱ्यांनीच काम न करण्याचा पवित्रा घेतला तर महावितरण जागे होईल काय? असा प्रश्न विचारला जात आहे. वस्तुस्थिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मांडली जात नसल्याने त्यावर योग्य ती कार्यवाही होत नाही. मोठी दुर्घटना घडण्याअगोदरच महावितरणमे आवश्यक ते बदल करावेत, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता पावसाळा अंतिम टप्यात असून मिळालेल्या काळात सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)महावितरणच्या विविध कार्यालयांतून सध्या रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. खेड तालुक्यातील कर्जी बीटमध्ये याचा फटका बसत आहे. खेड तालुक्यातील १२५ पेक्षा अधिक गावांचा भार केवळ २३ कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याने तेथील कारभाराबाबत संताप आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांबाबत काही निर्णय होईल काय, असा सवाल विचारला जातो.