शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus Lockdown : ८ एकरातील लिलीच्या फुलशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 14:02 IST

कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. याचा फटका सर्वांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसला आहे. बँकेचे कर्ज घेऊन दिवस-रात्र शेतात राबून आता उत्पादनावेळी कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात ८ एकर शेतजमिनीत मल्हार कुटुंबीयांनी लिली या फुलशेतीची लागवड केली आहे. मात्र, फूल मार्केट बंद असल्याने बाजारपेठ मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देफुलशेती आली अडचणीत, कोरोनाचा फटका निरवडे येथील शेतकऱ्यांवर आली कर्जबाजारी होण्याची वेळ

रामचंद्र कुडाळकरतळवडे : कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. याचा फटका सर्वांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसला आहे. बँकेचे कर्ज घेऊन दिवस-रात्र शेतात राबून आता उत्पादनावेळी कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात ८ एकर शेतजमिनीत मल्हार कुटुंबीयांनी लिली या फुलशेतीची लागवड केली आहे. मात्र, फूल मार्केट बंद असल्याने बाजारपेठ मिळणे कठीण झाले आहे.निरवडे येथील विवेक वासुदेव मल्हार, बाबली विठू मल्हार, शोभा नंदकिशोर मल्हार, आरती रमाकांत मल्हार या चार शेतकºयांनी लिली फुलशेतीची लागवड केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे फूल मार्केट बंद असल्याने ही फुले कोण घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

विवेक मल्हार, बाबली मल्हार, शोभा मल्हार, आरती मल्हार हे गेली अनेक वर्षे ही लिली फुलशेती करतात. सध्या फुलशेतीचे उत्पादनही चांगले होते. यावर्षी ही फुलशेती बहरली होती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे फूल मार्केटही बंद आहे. बाजारपेठेच पूर्णत: ठप्प असल्याने या शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विवेक वासुदेव मल्हार यांचे महिन्याला ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाबली विठू मल्हार यांचे १ लाखाचे, शोभा नंदकिशोर मल्हार यांचे ५० हजार रुपयांचे तर आरती रमाकांत मल्हार यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एक महिन्याचा विचार करता जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना विषाणूमुळे या शेतकऱ्यांच्या फुलशेतीला कसा फटका बसला याविषयी जाणून घेतले असता त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.निरवडे येथील शेतकऱ्यांचा एकत्रित विचार करता या शेतकऱ्यांनी रात्रं-दिवस काबाडकष्ट करून जवळपास ८ एकर शेतजमिनीत लिली फुलशेतीची लागवड केली होती. या फुलशेतीवर त्याचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन असल्याने तयार झालेल्या लिली फुलांचे दिवसाला हजारो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे. फुलांची तोडणी न केल्यामुळे ती सुकून गेली आहेत.ही फुलशेती करण्यासाठी केलेला खर्च जास्त असून उत्पन्न काहीच नाही अशी परिस्थिती आहे. शासनाने आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी या शेतकऱ्यांतून होत आहे. आज सरकार शेतकºयांना शेती करा व आर्थिक उन्नती साधा असा सल्ला देते. मात्र, आज या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.गोव्यातील फुलांचे मार्केट झाले बंद, उलाढाल पूर्णपणे ठप्पनिरवडे येथील हे शेतकरी गोव्यातील म्हापसा, पणजी तसेच अन्य बाजारपेठेत ही फुले नेऊन विकतात. पण सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा बंद आहेत. पूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलेल आहे. त्यामुळे सध्या या फुलांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

कोरोना विषाणूमुळे सध्या शेतकरीवर्ग मोठ्या नुकसानीमध्ये सापडला आहे. रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेती केली. पण जेव्हा यातून फायदा मिळणार होता तेव्हा मात्र नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने आम्हां शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे.- रोहन मल्हार, युवा शेतकरी, निरवडे, सावंतवाडी

आम्ही शेती करण्यासाठी जो खर्च केला त्यातून आर्थिक फायदा मिळणे कठीण बनले आहे. दिवसाला आमचे दोन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. एक महिना बाजारपेठ बंद राहिल्यास आमचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. आमची मेहनत पूर्णपणे वाया गेली आहे.- विवेक मल्हार, शेतकरी,निरवडे, सावंतवाडीबाजारपेठ बंद असल्याने आमचा माल विकायचा कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज मोठ्या प्रमाणत लिलीची फुले शेतात खराब होत आहेत. माल असून आम्ही तो विकू शकत नाही अशी बिकट अवस्था झाली आहे. आमचे यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.- बाबली मल्हार, शेतकरी,निरवडे, सावंतवाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग