शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्हा शिवसेनेअंतर्गत ‘जुने-नवे’ वाद उफाळला!

By admin | Updated: May 25, 2015 00:35 IST

पदांसाठी साठमारी : तालुका, उपजिल्हाप्रमुखपदांवर डोळा

रत्नागिरी : शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) विभागात विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारासह घाऊक प्रमाणात राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या नव्या नेत्या-कार्यकर्त्यांना आता शांत बसणे कठीण जात आहे. त्यामुळे राजकीय पुनर्वसन कधी होणार, याकडे हे नवीन कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. त्यातूनच नवे व जुने कार्यकर्ते यांच्यातील वाद उफाळून आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. दुसऱ्या पक्षाचे आमदार कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले. त्यांना पक्षात घेण्यावरून सुरूवातीलाच जुन्या नव्यांमध्ये कलगी-तुरा रंगला होता. त्यानंतर हा वाद वाढतच गेला असून, आता शिवसेनेत येताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असा लकडा या नव्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे धरला आहे. त्यामुळे शिवसेनाअंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नव्या - जुन्यांच्या या वादात रत्नागिरी तालुकाप्रमुखपदी तसेच उपजिल्हाप्रमुखपदी असलेल्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. अन्य काही पदांसाठीही नवीन गटातील कार्यकर्ते आग्रही असून, त्याबाबत जाहीररित्या बोलले जात आहे. त्यामुळे नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला आहे. लाभ कोणाला होणार व या वादात कोणाचे हात भाजणार, या चर्चेला उधाण आले आहे.नवीन गट शिवसेनेत आल्याने सेनेची मतदारसंघातील ताकद नक्कीच वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे प्रथमच लढल्या गेलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने नवीन-जुने कार्यकर्ते यांच्यात धूसफूस सुरू आहे. आता खूप वेळ झाला आहे. अजून किती वाट पाहायची, असा सवाल नवीन कार्यकर्ते नेत्यांना करीत आहेत. कार्यकर्त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर न झाल्यास अन्य पक्षाची वाट धरण्याची ‘प्रेमळ’ धमकीही दिली जात असल्याने नेतेही अस्वस्थ आहेत.नव्याने शिवसेनेत आलेल्या शिवसैनिक व त्यावेळच्या पक्षपदाधिकाऱ्यांचा डोळा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर आहे. उपजिल्हाप्रमुखपदावर सध्या राजेंद्र शिंदे असून, त्या पदावर राजेश सावंत यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न आहेत. तर तालुकाप्रमुखपदासाठीही नवीन गटाचे गजानन पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. रत्नागिरी शहर प्रमुखपद रिक्त असून, बिपीन बंदरकर यांच्या नावाचा विचार होत असला तरी जुन्यांमधील प्रशांत साळुंखेंच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)