शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शिवसेनेअंतर्गत ‘जुने-नवे’ वाद उफाळला!

By admin | Updated: May 25, 2015 00:35 IST

पदांसाठी साठमारी : तालुका, उपजिल्हाप्रमुखपदांवर डोळा

रत्नागिरी : शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) विभागात विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारासह घाऊक प्रमाणात राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या नव्या नेत्या-कार्यकर्त्यांना आता शांत बसणे कठीण जात आहे. त्यामुळे राजकीय पुनर्वसन कधी होणार, याकडे हे नवीन कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. त्यातूनच नवे व जुने कार्यकर्ते यांच्यातील वाद उफाळून आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. दुसऱ्या पक्षाचे आमदार कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले. त्यांना पक्षात घेण्यावरून सुरूवातीलाच जुन्या नव्यांमध्ये कलगी-तुरा रंगला होता. त्यानंतर हा वाद वाढतच गेला असून, आता शिवसेनेत येताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असा लकडा या नव्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे धरला आहे. त्यामुळे शिवसेनाअंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नव्या - जुन्यांच्या या वादात रत्नागिरी तालुकाप्रमुखपदी तसेच उपजिल्हाप्रमुखपदी असलेल्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. अन्य काही पदांसाठीही नवीन गटातील कार्यकर्ते आग्रही असून, त्याबाबत जाहीररित्या बोलले जात आहे. त्यामुळे नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला आहे. लाभ कोणाला होणार व या वादात कोणाचे हात भाजणार, या चर्चेला उधाण आले आहे.नवीन गट शिवसेनेत आल्याने सेनेची मतदारसंघातील ताकद नक्कीच वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे प्रथमच लढल्या गेलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने नवीन-जुने कार्यकर्ते यांच्यात धूसफूस सुरू आहे. आता खूप वेळ झाला आहे. अजून किती वाट पाहायची, असा सवाल नवीन कार्यकर्ते नेत्यांना करीत आहेत. कार्यकर्त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर न झाल्यास अन्य पक्षाची वाट धरण्याची ‘प्रेमळ’ धमकीही दिली जात असल्याने नेतेही अस्वस्थ आहेत.नव्याने शिवसेनेत आलेल्या शिवसैनिक व त्यावेळच्या पक्षपदाधिकाऱ्यांचा डोळा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर आहे. उपजिल्हाप्रमुखपदावर सध्या राजेंद्र शिंदे असून, त्या पदावर राजेश सावंत यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न आहेत. तर तालुकाप्रमुखपदासाठीही नवीन गटाचे गजानन पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. रत्नागिरी शहर प्रमुखपद रिक्त असून, बिपीन बंदरकर यांच्या नावाचा विचार होत असला तरी जुन्यांमधील प्रशांत साळुंखेंच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)