शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्हा शिवसेनेअंतर्गत ‘जुने-नवे’ वाद उफाळला!

By admin | Updated: May 25, 2015 00:35 IST

पदांसाठी साठमारी : तालुका, उपजिल्हाप्रमुखपदांवर डोळा

रत्नागिरी : शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) विभागात विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारासह घाऊक प्रमाणात राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या नव्या नेत्या-कार्यकर्त्यांना आता शांत बसणे कठीण जात आहे. त्यामुळे राजकीय पुनर्वसन कधी होणार, याकडे हे नवीन कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. त्यातूनच नवे व जुने कार्यकर्ते यांच्यातील वाद उफाळून आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. दुसऱ्या पक्षाचे आमदार कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले. त्यांना पक्षात घेण्यावरून सुरूवातीलाच जुन्या नव्यांमध्ये कलगी-तुरा रंगला होता. त्यानंतर हा वाद वाढतच गेला असून, आता शिवसेनेत येताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असा लकडा या नव्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे धरला आहे. त्यामुळे शिवसेनाअंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नव्या - जुन्यांच्या या वादात रत्नागिरी तालुकाप्रमुखपदी तसेच उपजिल्हाप्रमुखपदी असलेल्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. अन्य काही पदांसाठीही नवीन गटातील कार्यकर्ते आग्रही असून, त्याबाबत जाहीररित्या बोलले जात आहे. त्यामुळे नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळला आहे. लाभ कोणाला होणार व या वादात कोणाचे हात भाजणार, या चर्चेला उधाण आले आहे.नवीन गट शिवसेनेत आल्याने सेनेची मतदारसंघातील ताकद नक्कीच वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे प्रथमच लढल्या गेलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने नवीन-जुने कार्यकर्ते यांच्यात धूसफूस सुरू आहे. आता खूप वेळ झाला आहे. अजून किती वाट पाहायची, असा सवाल नवीन कार्यकर्ते नेत्यांना करीत आहेत. कार्यकर्त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर न झाल्यास अन्य पक्षाची वाट धरण्याची ‘प्रेमळ’ धमकीही दिली जात असल्याने नेतेही अस्वस्थ आहेत.नव्याने शिवसेनेत आलेल्या शिवसैनिक व त्यावेळच्या पक्षपदाधिकाऱ्यांचा डोळा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर आहे. उपजिल्हाप्रमुखपदावर सध्या राजेंद्र शिंदे असून, त्या पदावर राजेश सावंत यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न आहेत. तर तालुकाप्रमुखपदासाठीही नवीन गटाचे गजानन पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. रत्नागिरी शहर प्रमुखपद रिक्त असून, बिपीन बंदरकर यांच्या नावाचा विचार होत असला तरी जुन्यांमधील प्रशांत साळुंखेंच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)