शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पोषण आहारास मालवणात विरोध

By admin | Updated: July 6, 2014 23:18 IST

महिला बचतगटांनी नगराध्यक्षांची घेतली भेट

मालवण : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागात पोषण आहार पुरवठा करण्यासाठी स्वारस्याच्या अभिव्यक्ती प्रक्रियेस मालवण शहरातील महिला बचतगटांनी विरोध दर्शविला आहे. शहरातील शाळांमध्ये पोषण आहार पुरविण्याचे काम करणाऱ्या बचतगटांच्या महिला प्रतिनिधींनी शनिवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची भेट घेऊन अभिव्यक्ती प्रक्रियेस विरोध दर्शविण्यासाठी पाठिंब्याची मागणी केली.शिक्षण विभागास प्राप्त झालेल्या परिपत्रकात म्हटले आहे, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्वारस्याच्या अभिव्यक्ती प्रक्रियेतून निवड करण्यात आलेल्या केंद्रीय स्वयंपाकगृहातून सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये आहार पुरवठा सुरु होणे अपेक्षित आहे. या केंद्रीय स्वयंपाकगृहातून आहार पुरवठा सुरु होईपर्यंत सध्याच्या कार्यपद्धतीनुसार कार्यरत यंत्रणेमार्फत पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आहार पुरवठा करून घेण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी जुन्या करारनाम्यात मुदतवाढ देताना पुढील आदेश होईपर्यंत फक्त तात्पुरत्या स्वरूपात आहार पुरवठा करण्याबाबतची तरतूद करण्यात यावी.दरम्यान, मालवण गटशिक्षण कार्यालयाने स्वारस्याच्या अभिव्यक्तीचे अर्ज मागविले होते. ही यंत्रणा नियुक्तीबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचे पत्र केंद्रप्रमुखांना पाठविले आहे. त्यामुळे शहरातील शाळांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचतगटांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी प्रियांका सामंत, अपर्णा देसाई, शुभदा परब, प्रिती साटेलकर, शिवाजी पारकर, सुवर्णा गावडे, श्रद्धा तळवडेकर, प्रमिला मयेकर आदींच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची भेट घेऊन हा आदेश महिला बचतगटांवर अन्यायकारक असल्याचे सांगितले.लोकप्रतिनिधींनी आम्हांला आता पाठिंबा द्यावा. गेली १४ वर्षे आम्ही शाळांना पोषण आहार पुरविण्याचे काम करतो आहोत. पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांकडेच राहवी. सन २००३ पासून ५० पैसे दरावर आम्ही हे काम करतोय. महिला बचतगटांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पंचायत समितीशी संपर्क साधला असता शासनाकडूनच हे आदेश प्राप्त आहेत. केंद्रीय स्वयंपाकगृहात पोषण आहार शिजविल्यानंतर त्याचे वितरण होणार आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)