शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

युवकांमधील हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: September 24, 2015 00:08 IST

बी. जी. शेळके : आज हृदयविकार जागरूकता दिन

मिलिंद पारकर -कणकवली ==अवघ्या २० ते ३० वयोगटातील तरूणांचे हृदयविकाराने अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या जीवनशैलीचा फटका भारतीय तरूणांना बसत असून त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक बनली आहे. तरूणांनी आपल्या हृदयाकडे जागरूकतेने बघून आहारविहारात आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक हृदयविकार जागरूकता दिनानिमित्त डॉ. बी. जी. शेळके यांच्याशी साधण्यात आलेला संवाद..तरूणांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत?डॉ. शेळके : गेली पंचवीस वर्षे मी डॉक्टरी पेशात काम करताना अलिकडे २० ते ३० वयोगटातील मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. ५० ते ६० वयोगटात येणारे हृदयविकाराचे झटके आता युवकांमध्येही बसत आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे. तरूण मुलांमध्ये रक्तदाबाचा विकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. २०२० साली २०-३० वयोगटातील भारतीय तरूणांचे बळी जाण्याचे प्रमाण ५० हजार असेल, अशी शक्यता एका अभ्यासातून वर्तविण्यात आली आहे. आणि ती अतिशय धोकादायक आहे.युवकांमध्ये हृदयविकार वाढण्याचे कारण काय?डॉ. शेळके : सध्याची जीवनशैली बदलली असून ताणतणावाचे प्रमाणही वाढले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित श्रम आवश्यक आहेत. परंतु युवकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. आणि खाण्यात चायनीज, शीतपेये, फास्टफूड आहे. या खाण्यातून मीठाचे प्रमाण वाढते. तसेच शीतपेयांमधून अतिप्रमाणात साखर पोटात जाते. एका शीतपेयाच्या बाटलीतून २०० ग्रॅम साखर पोटात जाते. या साखरेतून तब्बल ८०० कॅलरीज शरीरात जातात. एवढ्या कॅलरी जाळण्यासाठी ६ तास व्यायाम करावा लागेल. छातीत मध्यभागी दुखणे, पोटापासून कानापर्यंत वेदना जाणे, विशेषत: डाव्या हातात वेदना होणे, घाम येणे, नाडीचे ठोके वाढणे, जीव घाबरा होणे आदी हृदयविकाराची लक्षणे आहेत पाश्चिमात्य जीवनशैली व भारतीय जीवनशैलीत फरक कोणता?डॉ. शेळके : पाश्चिमात्यांमध्ये आणि भारतीयांत भौगोलिक दृष्टीने मोठा फरक पडतो. पाश्चिमात्यांमध्ये सॅलडचा म्हणजे कच्च्या भाज्या, गाजर, टोमॅटो आदींचा आहारात वापर खूप असतो. त्यामुळे शरीरात फायबरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होते. हेच फायबर जास्तीच्या चरबीला शरीराबाहेर टाकतात. मात्र, आपल्याकडे भाज्या खाण्यास नाक मुरडले जाते. पाश्चिमात्य जीवनशैलीत एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चार-पाच वेळा थोडे-थोडे खाल्ले जाते. आपल्याकडे एकाचवेळी जास्त खाण्यावर भर दिला जातो. पाश्चिमात्यांच्या शरीरात मूळातच घातक कॉलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. तर भारतीयांमध्ये जास्त असते. पाश्चिमात्यांचा ३० बीएमआय नॉर्मल समजला जातो. तर आपल्याकडील व्यक्तीमध्ये २५ बीएमआय (वजन-उंची गुणोत्तर) ही पातळी ठरवण्यात आली आहे. हॉटेलात जाऊन खाण्यामुळे धोका वाढतोय का?डॉ. शेळके : निश्चितच. हॉटेलमध्ये जाऊन खाण्याकडे युवकांचा विशेषत: कल वाढला आहे. त्यामध्येही चमचमीत चायनीज खाण्यावर भर दिला जातो. एकाच तेलात परत परत तळल्याने घातक कॉलेस्टेरॉल तेलात उतरतात. हॉटेलमधील बहुतांश पदार्थ मैद्यापासून बनवले जातात. ज्यामध्ये फायबरचा लवलेश नसतो. एक कप चहात ७० कॅलरीज असतात. जास्त कॅलरीज (उष्मांक) ग्रहण करणाऱ्या व्यक्तींचे आयुर्मान कमी असते असा अभ्यास आहे. उष्मांक घेण्याचे प्रमाण वाढल्यास नवीन पेशी, रक्तवाहिन्या निर्माण होण्याचे प्रमाण घटते आणि अकाली मृत्यूची शक्यताही वाढत जाते.