शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

युवकांमधील हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: September 24, 2015 00:08 IST

बी. जी. शेळके : आज हृदयविकार जागरूकता दिन

मिलिंद पारकर -कणकवली ==अवघ्या २० ते ३० वयोगटातील तरूणांचे हृदयविकाराने अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या जीवनशैलीचा फटका भारतीय तरूणांना बसत असून त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक बनली आहे. तरूणांनी आपल्या हृदयाकडे जागरूकतेने बघून आहारविहारात आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक हृदयविकार जागरूकता दिनानिमित्त डॉ. बी. जी. शेळके यांच्याशी साधण्यात आलेला संवाद..तरूणांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत?डॉ. शेळके : गेली पंचवीस वर्षे मी डॉक्टरी पेशात काम करताना अलिकडे २० ते ३० वयोगटातील मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. ५० ते ६० वयोगटात येणारे हृदयविकाराचे झटके आता युवकांमध्येही बसत आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे. तरूण मुलांमध्ये रक्तदाबाचा विकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. २०२० साली २०-३० वयोगटातील भारतीय तरूणांचे बळी जाण्याचे प्रमाण ५० हजार असेल, अशी शक्यता एका अभ्यासातून वर्तविण्यात आली आहे. आणि ती अतिशय धोकादायक आहे.युवकांमध्ये हृदयविकार वाढण्याचे कारण काय?डॉ. शेळके : सध्याची जीवनशैली बदलली असून ताणतणावाचे प्रमाणही वाढले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित श्रम आवश्यक आहेत. परंतु युवकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. आणि खाण्यात चायनीज, शीतपेये, फास्टफूड आहे. या खाण्यातून मीठाचे प्रमाण वाढते. तसेच शीतपेयांमधून अतिप्रमाणात साखर पोटात जाते. एका शीतपेयाच्या बाटलीतून २०० ग्रॅम साखर पोटात जाते. या साखरेतून तब्बल ८०० कॅलरीज शरीरात जातात. एवढ्या कॅलरी जाळण्यासाठी ६ तास व्यायाम करावा लागेल. छातीत मध्यभागी दुखणे, पोटापासून कानापर्यंत वेदना जाणे, विशेषत: डाव्या हातात वेदना होणे, घाम येणे, नाडीचे ठोके वाढणे, जीव घाबरा होणे आदी हृदयविकाराची लक्षणे आहेत पाश्चिमात्य जीवनशैली व भारतीय जीवनशैलीत फरक कोणता?डॉ. शेळके : पाश्चिमात्यांमध्ये आणि भारतीयांत भौगोलिक दृष्टीने मोठा फरक पडतो. पाश्चिमात्यांमध्ये सॅलडचा म्हणजे कच्च्या भाज्या, गाजर, टोमॅटो आदींचा आहारात वापर खूप असतो. त्यामुळे शरीरात फायबरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होते. हेच फायबर जास्तीच्या चरबीला शरीराबाहेर टाकतात. मात्र, आपल्याकडे भाज्या खाण्यास नाक मुरडले जाते. पाश्चिमात्य जीवनशैलीत एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चार-पाच वेळा थोडे-थोडे खाल्ले जाते. आपल्याकडे एकाचवेळी जास्त खाण्यावर भर दिला जातो. पाश्चिमात्यांच्या शरीरात मूळातच घातक कॉलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. तर भारतीयांमध्ये जास्त असते. पाश्चिमात्यांचा ३० बीएमआय नॉर्मल समजला जातो. तर आपल्याकडील व्यक्तीमध्ये २५ बीएमआय (वजन-उंची गुणोत्तर) ही पातळी ठरवण्यात आली आहे. हॉटेलात जाऊन खाण्यामुळे धोका वाढतोय का?डॉ. शेळके : निश्चितच. हॉटेलमध्ये जाऊन खाण्याकडे युवकांचा विशेषत: कल वाढला आहे. त्यामध्येही चमचमीत चायनीज खाण्यावर भर दिला जातो. एकाच तेलात परत परत तळल्याने घातक कॉलेस्टेरॉल तेलात उतरतात. हॉटेलमधील बहुतांश पदार्थ मैद्यापासून बनवले जातात. ज्यामध्ये फायबरचा लवलेश नसतो. एक कप चहात ७० कॅलरीज असतात. जास्त कॅलरीज (उष्मांक) ग्रहण करणाऱ्या व्यक्तींचे आयुर्मान कमी असते असा अभ्यास आहे. उष्मांक घेण्याचे प्रमाण वाढल्यास नवीन पेशी, रक्तवाहिन्या निर्माण होण्याचे प्रमाण घटते आणि अकाली मृत्यूची शक्यताही वाढत जाते.