शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

रत्नागिरीतील अणू उर्जा प्रकल्प चर्चेतून व्हायला हवा- डाॅ. रघुनाथ माशेलकर

By अनंत खं.जाधव | Updated: December 20, 2023 21:40 IST

डॉ. माशेलकर स्वत: प्रबोधन करण्यास तयार असल्याचीही दिली ग्वाही

सावंतवाडी: सध्या देशाला अणू उर्जा प्रकल्पाची गरज असून असे प्रकल्प झाले पाहिजेत अणू उर्जा प्रकल्पामुळे देशात आतापर्यंत कुठे हानी झाल्याचे उदाहरण नाही.त्यामुळे सरकार ने जनते मध्ये जाऊन प्रबोधन करावे तरच  रत्नागिरी जिल्ह्यातील अणू उर्जा प्रकल्प मार्गी लागेल  असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.रघुनाथ माशेलकर यांनी मांडले.

गरज भासल्यास मी स्वता प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यास जायला तयार आहे.कोकणची प्रगती साधायची असेल तर फक्त मनाची श्रीमंती असून चालणार नाही स्वताही श्रीमंत झाले पाहिजेत असे ही डाॅ.माशेलकर म्हणाले. डाॅ.रघुनाथ माशेलकर हे सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी तील कार्यक्रमा निमित्त आले असता पत्रकारांशी बोलत होते.

डाॅ.माशेलकर म्हणाले,देशात अनेक ठिकाणी अणू उर्जा प्रकल्प आहेत.तेथे आतापर्यंत कोणतीही चुकीची घटना घडली नाही.तसेच अणू उर्जा प्रकल्पामुळे आंब्याचे पीक नाहिसे होणार हे पूर्णपणे चुकीचे असून गुजरात जामनगर येथे तर अणू उर्जा प्रकल्प असतना चांगल्या पैकी आंब्याचे पीक येत आहे.त्यामुळे असे प्रकल्प होणे देशाच्या दृष्टीने गरजेचे आहे.असे ही त्यांनी सांगितले.

तसेच रत्नागिरी येथील प्रकल्प होण्यासाठी प्रबोधन ही महत्वाचे आहे.यासाठी त्यांनी ऑस्टोलिया मध्ये आपल्या मित्राने अणू उर्जा प्रकल्प उभारत असतना तेथील जनतेचे कसे प्रबोधन केले त्याचे उदाहरण दिले तसेच प्रबोधन रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मध्ये झाले पाहिजे असे डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.तसेच प्रबोधन करण्यासाठी सरकार ने सांगितल्यास मीही तेथे जाण्यास तयार आहे असून कोकणच्या श्रीमंती साठी माझे उर्वरित आयुष्य द्याला तयार आहे.असेही डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Raghunath Mashelkarडॉ. रघुनाथ माशेलकरSawantwadiसावंतवाडी