शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

आता गुरूजींच्याच गळ्यात शाळेतील पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:50 IST

रहिम दलाल । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : निवडणुका, जनगणना यासह असंख्य अशैक्षणिक कामांना जुंपल्या जाणाऱ्या शिक्षकांवर आता पाणीनमुने ...

रहिम दलाल ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : निवडणुका, जनगणना यासह असंख्य अशैक्षणिक कामांना जुंपल्या जाणाऱ्या शिक्षकांवर आता पाणीनमुने तपासण्याची जबाबदारीही टाकण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून शाळांना वॉटर प्युरिफायर पुरविण्यात आले होते. आता जिल्हा परिषदेला जाग आली असून, या प्युरिफायरमध्ये येणारे पाणी आणि त्यातून बाहेर पडणारे पाणी तपासण्याचे काम शिक्षकांच्या डोक्यावर मारण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे तसेच कागदी घोडे रंगविण्याची कामे जास्त करावी लागत असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत असल्याची ओरड सुरू आहे. या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने आयत्यावेळी काढलेल्या या आदेशामुळे सध्या शिक्षकांची धावाधाव उडाली असून, आधीच उष्म्याने हैराण झालेल्या शिक्षकांना आणखीनच घाम फुटला आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना वॉटर प्युरिफायर पुरविण्यात आले होते. हा पुरवठा शिक्षण विभागाकडून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत करण्यात आला होता. शासनाला अचानक दोन वर्षांनंतर जाग आल्याने या वॉटर प्युरिफायरच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. त्यामुळे हे काम शिक्षकांच्या माथ्यावर पडणार हे निश्चित आहे.शाळांना पुरविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरची रँडम पध्दतीने कोणत्याही १० शाळांचे इनलेट पाणी आणि आऊटलेट पाण्याची तपासणी करावयाची आहे. सर्वच शाळांना उन्हाळी सुट्या लागल्याने बहुतांश शिक्षक सुट्टीनिमित्ताने कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे ही तपासणी करण्यासाठी त्यांना परत यावे लागले आहे. कारण ही पाण्याची तपासणी केल्याचा अहवाल १५ मेपर्यंत जिल्हा परिषदेला सादर करावयाचा आहे. सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना हा आदेश ८ मे रोजी शिक्षणाधिकाºयांनी दिल्यानंतर १५ मेपर्यंत एवढ्या कमी वेळेत हा अहवाल सादर करावयाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची धावपळ उडाली असून, त्यांना हे त्रासदायक ठरत आहे. दोन वर्षांनंतर अचानक शासनाला वॉटर प्युरिफायमधील पाणी तपासणीची जाग आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.केंद्रप्रमुखांमार्फतअहवाल द्यावा लागणारपाणीनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत द्यावयाचे आहेत. तपासणीसाठी देताना इनलेट पाणी व आऊटलेट पाणी भरलेली १ लीटरची बाटली भरलेली असणे आवश्यक आहे. त्यासाठी या पाणी नमुन्यांचा अहवाल जिल्हा परिषदेला केंद्रप्रमुखांमार्फत सादर करावयाचा आहे, असे आदेशात म्हटले आहे.