शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

आता गुरूजींच्याच गळ्यात शाळेतील पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:50 IST

रहिम दलाल । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : निवडणुका, जनगणना यासह असंख्य अशैक्षणिक कामांना जुंपल्या जाणाऱ्या शिक्षकांवर आता पाणीनमुने ...

रहिम दलाल ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : निवडणुका, जनगणना यासह असंख्य अशैक्षणिक कामांना जुंपल्या जाणाऱ्या शिक्षकांवर आता पाणीनमुने तपासण्याची जबाबदारीही टाकण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून शाळांना वॉटर प्युरिफायर पुरविण्यात आले होते. आता जिल्हा परिषदेला जाग आली असून, या प्युरिफायरमध्ये येणारे पाणी आणि त्यातून बाहेर पडणारे पाणी तपासण्याचे काम शिक्षकांच्या डोक्यावर मारण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे तसेच कागदी घोडे रंगविण्याची कामे जास्त करावी लागत असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत असल्याची ओरड सुरू आहे. या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने आयत्यावेळी काढलेल्या या आदेशामुळे सध्या शिक्षकांची धावाधाव उडाली असून, आधीच उष्म्याने हैराण झालेल्या शिक्षकांना आणखीनच घाम फुटला आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना वॉटर प्युरिफायर पुरविण्यात आले होते. हा पुरवठा शिक्षण विभागाकडून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत करण्यात आला होता. शासनाला अचानक दोन वर्षांनंतर जाग आल्याने या वॉटर प्युरिफायरच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. त्यामुळे हे काम शिक्षकांच्या माथ्यावर पडणार हे निश्चित आहे.शाळांना पुरविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरची रँडम पध्दतीने कोणत्याही १० शाळांचे इनलेट पाणी आणि आऊटलेट पाण्याची तपासणी करावयाची आहे. सर्वच शाळांना उन्हाळी सुट्या लागल्याने बहुतांश शिक्षक सुट्टीनिमित्ताने कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे ही तपासणी करण्यासाठी त्यांना परत यावे लागले आहे. कारण ही पाण्याची तपासणी केल्याचा अहवाल १५ मेपर्यंत जिल्हा परिषदेला सादर करावयाचा आहे. सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना हा आदेश ८ मे रोजी शिक्षणाधिकाºयांनी दिल्यानंतर १५ मेपर्यंत एवढ्या कमी वेळेत हा अहवाल सादर करावयाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची धावपळ उडाली असून, त्यांना हे त्रासदायक ठरत आहे. दोन वर्षांनंतर अचानक शासनाला वॉटर प्युरिफायमधील पाणी तपासणीची जाग आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.केंद्रप्रमुखांमार्फतअहवाल द्यावा लागणारपाणीनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत द्यावयाचे आहेत. तपासणीसाठी देताना इनलेट पाणी व आऊटलेट पाणी भरलेली १ लीटरची बाटली भरलेली असणे आवश्यक आहे. त्यासाठी या पाणी नमुन्यांचा अहवाल जिल्हा परिषदेला केंद्रप्रमुखांमार्फत सादर करावयाचा आहे, असे आदेशात म्हटले आहे.