शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
8
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
9
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
10
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
11
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
12
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
13
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
14
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
15
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
16
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
17
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
18
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
19
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
20
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले

सिंधुदुर्गात आता लागणार प्रत्येकाची कसोटी

By admin | Updated: September 29, 2014 00:02 IST

खरी ताकद कळणार; चौरंगी लढतीमुळे विजयाबाबतची गणिते बनली अवघड

महेश सरनाईक ल्ल कणकवलीविधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील लढाई बहुरंगी आणि बहुढंगी होणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच चौरंगी लढती होणार असल्याने विजयाबाबतची गणिते मांडणे अवघड बनले आहे. परंतु पहिल्यांदाच या निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे, ते स्पष्ट होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता आतापर्यंत विधानसभांच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष, नंतर जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, शिवसेना अशा सर्वच पक्षांसोबत येथील जनता त्या त्या स्थितीतील वातावरणाप्रमाणे राहिली आहे. परंतु या प्रत्येकवेळच्या निवडणुकीत प्रमुख दोन पक्षांमध्येच लढत झाली आहे. आता ही पहिलीच निवडणूक असेल की, यावेळी प्रमुख चार पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक उमेदवाराची कसोटी लागणार आहे.आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये नारायण राणे विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्ष अशी लढाई असायची. मात्र, ही अशी पहिलीच वेळ आहे की, सर्व पक्ष वेगवेगळे लढत आहेत आणि प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता केवळ राणे यांना विरोध करायचा म्हणून दुसऱ्याला मदत करायची, हे जुने सूत्रदेखील चालणार नाही. कारण या निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्या पक्षाची किती ताकद आहे. कोण पक्षाशी निष्ठावंत आहे. कोणी किती प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले, या सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला मानणारे काही कार्यकर्ते आणि मतदार आहेत ते त्या त्या पद्धतीने प्रत्येकाच्या मागे राहणार आहेत. त्यामुळे केवळ व्यक्तीविरोधाचा मुद्दा या निवडणुकीत गौण ठरणार आहे.त्यामुळे यापूर्वी नारायण राणेंच्या पर्यायाने काँग्रेसच्या विरोधात अंतर्गत युती करून लढणारे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे पक्ष आता स्वतंत्ररित्याच एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याने नारायण राणेंसाठी पर्यायाने काँग्रेससाठी ही निवडणूक इतर पक्षांच्या तुलनेने सोपी ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईकर चाकरमान्यांचा मोठा फायदा झाला. कारण येथील बहुसंख्य कुटुंबातील एकतरी व्यक्ती व्यवसाय, उद्योगानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक, शिवसेना विभागप्रमुख, शाखाप्रमुख, वॉर्डप्रमुख अशा सर्वच बाबतीत मूळचे कोकणातील रहिवासी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेच्या प्रचारकार्यात मोठी भूमिका निभावली होती. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १६ एप्रिलला झाली होती, तर मुंबईमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २४ एप्रिलला झाली होती. त्यामुळे कोकणातील निवडणुकीत मुंबईकर चाकरमान्यांनी मदत केली. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाचवेळी १५ आॅक्टोबरला मतदान होणार आहे आणि सर्व पक्ष वेगवेगळे लढत असल्याने प्रत्येकाला आपला मतदारसंघ किंवा आपला भाग सोडून दुसरीकडे प्रचारासाठी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे यावेळी कोणाची मदत अथवा सहानुभूतीदेखील मिळण्याची शक्यता नाही. गत सर्व निवडणुकापेक्षा ही निवडणूक वेगळी असल्याने आता याबाबत तर्कवितर्क बांधणेदेखील सोपे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोण जिंकणार, कोण हरणार याबाबत अंदाज बांधण्यापेक्षा प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करा, असे आदेश सर्वच नेत्यांकडून आपआपल्या कार्यकर्त्यांना दिले जात आहेत.