शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात आता लागणार प्रत्येकाची कसोटी

By admin | Updated: September 29, 2014 00:02 IST

खरी ताकद कळणार; चौरंगी लढतीमुळे विजयाबाबतची गणिते बनली अवघड

महेश सरनाईक ल्ल कणकवलीविधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील लढाई बहुरंगी आणि बहुढंगी होणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच चौरंगी लढती होणार असल्याने विजयाबाबतची गणिते मांडणे अवघड बनले आहे. परंतु पहिल्यांदाच या निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे, ते स्पष्ट होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता आतापर्यंत विधानसभांच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष, नंतर जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, शिवसेना अशा सर्वच पक्षांसोबत येथील जनता त्या त्या स्थितीतील वातावरणाप्रमाणे राहिली आहे. परंतु या प्रत्येकवेळच्या निवडणुकीत प्रमुख दोन पक्षांमध्येच लढत झाली आहे. आता ही पहिलीच निवडणूक असेल की, यावेळी प्रमुख चार पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक उमेदवाराची कसोटी लागणार आहे.आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये नारायण राणे विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्ष अशी लढाई असायची. मात्र, ही अशी पहिलीच वेळ आहे की, सर्व पक्ष वेगवेगळे लढत आहेत आणि प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता केवळ राणे यांना विरोध करायचा म्हणून दुसऱ्याला मदत करायची, हे जुने सूत्रदेखील चालणार नाही. कारण या निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्या पक्षाची किती ताकद आहे. कोण पक्षाशी निष्ठावंत आहे. कोणी किती प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले, या सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला मानणारे काही कार्यकर्ते आणि मतदार आहेत ते त्या त्या पद्धतीने प्रत्येकाच्या मागे राहणार आहेत. त्यामुळे केवळ व्यक्तीविरोधाचा मुद्दा या निवडणुकीत गौण ठरणार आहे.त्यामुळे यापूर्वी नारायण राणेंच्या पर्यायाने काँग्रेसच्या विरोधात अंतर्गत युती करून लढणारे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे पक्ष आता स्वतंत्ररित्याच एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याने नारायण राणेंसाठी पर्यायाने काँग्रेससाठी ही निवडणूक इतर पक्षांच्या तुलनेने सोपी ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईकर चाकरमान्यांचा मोठा फायदा झाला. कारण येथील बहुसंख्य कुटुंबातील एकतरी व्यक्ती व्यवसाय, उद्योगानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक, शिवसेना विभागप्रमुख, शाखाप्रमुख, वॉर्डप्रमुख अशा सर्वच बाबतीत मूळचे कोकणातील रहिवासी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेच्या प्रचारकार्यात मोठी भूमिका निभावली होती. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १६ एप्रिलला झाली होती, तर मुंबईमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २४ एप्रिलला झाली होती. त्यामुळे कोकणातील निवडणुकीत मुंबईकर चाकरमान्यांनी मदत केली. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाचवेळी १५ आॅक्टोबरला मतदान होणार आहे आणि सर्व पक्ष वेगवेगळे लढत असल्याने प्रत्येकाला आपला मतदारसंघ किंवा आपला भाग सोडून दुसरीकडे प्रचारासाठी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे यावेळी कोणाची मदत अथवा सहानुभूतीदेखील मिळण्याची शक्यता नाही. गत सर्व निवडणुकापेक्षा ही निवडणूक वेगळी असल्याने आता याबाबत तर्कवितर्क बांधणेदेखील सोपे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोण जिंकणार, कोण हरणार याबाबत अंदाज बांधण्यापेक्षा प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करा, असे आदेश सर्वच नेत्यांकडून आपआपल्या कार्यकर्त्यांना दिले जात आहेत.