शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘कातकरीं’च्या वनौषधी मधाचे नामकरण

By admin | Updated: May 1, 2015 00:23 IST

सजग नागरिक मंचचा उपक्रम : ‘फॉरेस्ट हनी’ नावाने मध बाजारात

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नारूर येथील कातकरी समाजाच्या वनौषधी मध उत्पादन व्यवसायाला सजग नागरिक मंचाने ऊर्जितावस्था दिली आहे. या मधोत्पादनाचे ‘फॉरेस्ट हनी’ असे नामकरण करण्यात आले असून, कुडाळ येथे या उत्पादनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. सजग नागरिक मंचाच्या या उपक्रमामुळे कातकरी समाजाला आर्थिक सुबत्ता मिळण्याची आशा वाढली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करणारे आणि पूर्णत: निसर्गावरच अवलंबून असणारा कातकरी समाज पांरपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मोठ्या प्रमाणात मध गोळा करतो. या नैसर्गिक मधामध्ये वनौषधी गुणधर्म असतात. मात्र, या मधाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. जिल्ह्यातील आणि बाहेरील व्यापारी हा मध कमी दरात खरेदी करतात. त्यामुळे येथील कातकरी समाज अर्थाजर्नाने कमकुवतच आहे. या समाजाने गोळा केलेल्या औषधी मधाला बाजारात चांगली किंमत मिळावी, तसचे त्यातून त्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी सजग नागरिक मंचच्या अ‍ॅड. सुहास सावंत, सचिन देसाई, मोहम्मद शेख, अ‍ॅड. समीर कुलकर्णी, कार्यकर्त्यांनी या कातकरी समाजाशी बोलून या उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर कातकरी समाजाच्या सहकार्यातून त्यांनी गोळा केलेल्या मधावर प्रक्रिया करून सुबक स्वरुपातील उत्पादन बाजारात आणले आहे. याकामी त्यांना पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर यांनी सहकार्य केले. कातकरी समाजाने गोळा केलेल्या मध उत्पादनाला सजग नागरिक मंचाने ‘फॉरेस्ट हनी’ असे नाव दिले आहे. या उत्पादनाचा उद्घाटन समारंभ येथील मराठा समाज सभागृहात अ‍ॅड. अजित भणगे, कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे डॉ. विजय साठे, कुडाळचे उपसभापती आर. के. सावंत, डॉ. वंदना करंबेळकर, अ‍ॅड. सुहास सावंत यांच्या हस्ते व तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडले. डॉ. वंदना करंबेळकर म्हणाल्या की, कातकरी समाज पारंपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मध काढतो. त्यांनी गोळा केलेल्या मधात औषधी गुणधर्म असतात. तसेच तो त्रिदोष नाशकारकही असतो, असे सांगितले. दीपक नारकर यांनी सर्व बाजूंनी वंचित असलेला कातकरी समाज लाखो रुपयांच्या मधाचे उत्पादन करतात. परंतु,योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्यांना कवडीमोल मोबदला मिळतो.अ‍ॅड. अजित भणगे यांनी सजग नागरिक मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या कार्याला राजकीय वळण लागू देऊ नका, असे आवाहन केले. यावेळी संजय पिंगुळकर, पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर, बनी नाडकर्णी, अतुल बंगे, अ‍ॅड. अमोल सामंत व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समाज उपेक्षितयावेळी डॉ. विजय साठे म्हणाले, कातकरी समाजाकडे मातीतून सोने काढण्याची कला आहे. त्यांना निसर्गाने चांगल्या शक्ती दिल्या आहेत. नागरी समाजाला घाबरणारा हा समाज व्यसनाधीन असल्याने विकासाची पाळेमुळे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. त्यामुळे हा समाज उपेक्षितच राहिला. ही स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात १०० वर्षांनंतर हा समाज नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.