शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

‘कातकरीं’च्या वनौषधी मधाचे नामकरण

By admin | Updated: May 1, 2015 00:23 IST

सजग नागरिक मंचचा उपक्रम : ‘फॉरेस्ट हनी’ नावाने मध बाजारात

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नारूर येथील कातकरी समाजाच्या वनौषधी मध उत्पादन व्यवसायाला सजग नागरिक मंचाने ऊर्जितावस्था दिली आहे. या मधोत्पादनाचे ‘फॉरेस्ट हनी’ असे नामकरण करण्यात आले असून, कुडाळ येथे या उत्पादनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. सजग नागरिक मंचाच्या या उपक्रमामुळे कातकरी समाजाला आर्थिक सुबत्ता मिळण्याची आशा वाढली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करणारे आणि पूर्णत: निसर्गावरच अवलंबून असणारा कातकरी समाज पांरपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मोठ्या प्रमाणात मध गोळा करतो. या नैसर्गिक मधामध्ये वनौषधी गुणधर्म असतात. मात्र, या मधाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. जिल्ह्यातील आणि बाहेरील व्यापारी हा मध कमी दरात खरेदी करतात. त्यामुळे येथील कातकरी समाज अर्थाजर्नाने कमकुवतच आहे. या समाजाने गोळा केलेल्या औषधी मधाला बाजारात चांगली किंमत मिळावी, तसचे त्यातून त्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी सजग नागरिक मंचच्या अ‍ॅड. सुहास सावंत, सचिन देसाई, मोहम्मद शेख, अ‍ॅड. समीर कुलकर्णी, कार्यकर्त्यांनी या कातकरी समाजाशी बोलून या उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर कातकरी समाजाच्या सहकार्यातून त्यांनी गोळा केलेल्या मधावर प्रक्रिया करून सुबक स्वरुपातील उत्पादन बाजारात आणले आहे. याकामी त्यांना पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर यांनी सहकार्य केले. कातकरी समाजाने गोळा केलेल्या मध उत्पादनाला सजग नागरिक मंचाने ‘फॉरेस्ट हनी’ असे नाव दिले आहे. या उत्पादनाचा उद्घाटन समारंभ येथील मराठा समाज सभागृहात अ‍ॅड. अजित भणगे, कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे डॉ. विजय साठे, कुडाळचे उपसभापती आर. के. सावंत, डॉ. वंदना करंबेळकर, अ‍ॅड. सुहास सावंत यांच्या हस्ते व तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडले. डॉ. वंदना करंबेळकर म्हणाल्या की, कातकरी समाज पारंपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मध काढतो. त्यांनी गोळा केलेल्या मधात औषधी गुणधर्म असतात. तसेच तो त्रिदोष नाशकारकही असतो, असे सांगितले. दीपक नारकर यांनी सर्व बाजूंनी वंचित असलेला कातकरी समाज लाखो रुपयांच्या मधाचे उत्पादन करतात. परंतु,योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्यांना कवडीमोल मोबदला मिळतो.अ‍ॅड. अजित भणगे यांनी सजग नागरिक मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या कार्याला राजकीय वळण लागू देऊ नका, असे आवाहन केले. यावेळी संजय पिंगुळकर, पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर, बनी नाडकर्णी, अतुल बंगे, अ‍ॅड. अमोल सामंत व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समाज उपेक्षितयावेळी डॉ. विजय साठे म्हणाले, कातकरी समाजाकडे मातीतून सोने काढण्याची कला आहे. त्यांना निसर्गाने चांगल्या शक्ती दिल्या आहेत. नागरी समाजाला घाबरणारा हा समाज व्यसनाधीन असल्याने विकासाची पाळेमुळे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. त्यामुळे हा समाज उपेक्षितच राहिला. ही स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात १०० वर्षांनंतर हा समाज नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.