शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर नाही - प्रदेश काँग्रेसची रणनीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:51 IST

काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणीे अखिल भारतीय काँग्रेसने बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणार हे गृहीत धरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने रणनीती आखली गेली आहे. या रणनीतीप्रमाणे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तरच द्यायचे नाही, असे ठरविण्यात आले आहे.

- अनंत जाधवसावंतवाडी, दि. 18 -  काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणीे अखिल भारतीय काँग्रेसने बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणार हे गृहीत धरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने रणनीती आखली गेली आहे. या रणनीतीप्रमाणे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तरच द्यायचे नाही, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे राणेंच्या आरोपातील हवा निघून जाईलच; त्याशिवाय राणे पक्षातून गेले तर काँग्रेसवर याचा कोणताही फरक पडत नाही हेही यातून दिसून येईल, असा या रणनीतीचा भाग मानला जात आहे. याची अंमलबजावणी सिंधुदुर्गस्तरावर करण्याचे निर्दशही पक्षाने नूतन जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेस सोडणार, अशी चर्चा गेले कित्येक महिने सुरू आहे. मात्र, या चर्चेप्रमाणे अद्याप मुहूर्त मिळत नाही. मात्र, आता राणेंचा भाजप प्रवेश जवळ आल्याने काँग्रेसनेही तशी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. आठवड्यापूर्वी प्रदेश काँग्रेसच्यावतीने एक शिष्टमंडळ जिल्ह्यात पाठविले होते. मात्र, यावेळी झालेल्या बैठकीत राणे समर्थकांनीच प्रदेश स्तरावरून आलेल्या नेत्यांना धारेवर धरत ही बैठक हॉयजॅक केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पक्षात फूट पाडत असल्याचा आरोपही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी केला होता.या बैठकीचा अहवाल खासदार हुसेन दलवार्इं यांनी प्रदेश काँग्रेसला दिला होता. या अहवालानुसार अखिल भारतीय काँग्रेसने शनिवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली आहे. ही बरखास्ती राणे यांच्या जिव्हारी लागणार हे काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना माहीत आहे. त्यामुळेच राणे यांना डिवचण्यासाठीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राणे यांनी पक्षाच्या नेत्यावर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी आपल्या निशाण्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांना घेतले आहे.मात्र, राणे यांची टीका काँग्रेसने गृहीतच धरली होती. त्यामुळे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनीती काँग्रेसच्यावतीने आखली आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राणेंच्या कोणत्याच टिकेला उत्तर देत नसून त्यांनी आपल्या सहकाºयांनाही उत्तर द्यायचे नाही असे सांगितले आहे. राणेंच्या आरोपांना उत्तर दिले नाही, तर त्यांच्या आरोपातील हवा निघून जाईल तसेच राणे हे काँग्रेसमधून गेलेच तर त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, असेही यातून दिसून येईल, अशी यामागची रणनीती असल्याचे दिसून येत आहे.प्रदेश काँग्रेसच्या या रणनीतीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्याचे आदेशही नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत. त्यामुळे सावंत हे राणे यांच्या सध्या तरी आरोपांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसून, त्यांच्यावर राणे किंवा अन्य नेत्यांनी कोणतेही आरोप केले तर त्याचा खुलासा मात्र करणार, असे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले. मात्र, प्रदेश काँग्रेसची जशी रणनीती असेल तसे आम्ही काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रणनीती नाही, मात्र आम्ही ठरवलेच : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणनारायण राणे हे आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे ते आमच्यावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तरीही त्यांनी पक्षावर टीका केली, तर आम्ही त्यावर प्रत्युत्तर देणार नाही. ही रणनीती नाही, मात्र आम्ही तसे ठरविले आहे .पक्षाचे काम करून पक्ष मोठा करणे हे आमचे धोरण आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे