शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर नाही - प्रदेश काँग्रेसची रणनीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:51 IST

काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणीे अखिल भारतीय काँग्रेसने बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणार हे गृहीत धरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने रणनीती आखली गेली आहे. या रणनीतीप्रमाणे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तरच द्यायचे नाही, असे ठरविण्यात आले आहे.

- अनंत जाधवसावंतवाडी, दि. 18 -  काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणीे अखिल भारतीय काँग्रेसने बरखास्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणार हे गृहीत धरून प्रदेश काँग्रेसच्यावतीने रणनीती आखली गेली आहे. या रणनीतीप्रमाणे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तरच द्यायचे नाही, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे राणेंच्या आरोपातील हवा निघून जाईलच; त्याशिवाय राणे पक्षातून गेले तर काँग्रेसवर याचा कोणताही फरक पडत नाही हेही यातून दिसून येईल, असा या रणनीतीचा भाग मानला जात आहे. याची अंमलबजावणी सिंधुदुर्गस्तरावर करण्याचे निर्दशही पक्षाने नूतन जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेस सोडणार, अशी चर्चा गेले कित्येक महिने सुरू आहे. मात्र, या चर्चेप्रमाणे अद्याप मुहूर्त मिळत नाही. मात्र, आता राणेंचा भाजप प्रवेश जवळ आल्याने काँग्रेसनेही तशी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. आठवड्यापूर्वी प्रदेश काँग्रेसच्यावतीने एक शिष्टमंडळ जिल्ह्यात पाठविले होते. मात्र, यावेळी झालेल्या बैठकीत राणे समर्थकांनीच प्रदेश स्तरावरून आलेल्या नेत्यांना धारेवर धरत ही बैठक हॉयजॅक केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पक्षात फूट पाडत असल्याचा आरोपही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी केला होता.या बैठकीचा अहवाल खासदार हुसेन दलवार्इं यांनी प्रदेश काँग्रेसला दिला होता. या अहवालानुसार अखिल भारतीय काँग्रेसने शनिवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली आहे. ही बरखास्ती राणे यांच्या जिव्हारी लागणार हे काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना माहीत आहे. त्यामुळेच राणे यांना डिवचण्यासाठीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राणे यांनी पक्षाच्या नेत्यावर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी आपल्या निशाण्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांना घेतले आहे.मात्र, राणे यांची टीका काँग्रेसने गृहीतच धरली होती. त्यामुळे राणे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायचे नाही, अशी रणनीती काँग्रेसच्यावतीने आखली आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राणेंच्या कोणत्याच टिकेला उत्तर देत नसून त्यांनी आपल्या सहकाºयांनाही उत्तर द्यायचे नाही असे सांगितले आहे. राणेंच्या आरोपांना उत्तर दिले नाही, तर त्यांच्या आरोपातील हवा निघून जाईल तसेच राणे हे काँग्रेसमधून गेलेच तर त्याचा पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही, असेही यातून दिसून येईल, अशी यामागची रणनीती असल्याचे दिसून येत आहे.प्रदेश काँग्रेसच्या या रणनीतीची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्याचे आदेशही नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांना दिले आहेत. त्यामुळे सावंत हे राणे यांच्या सध्या तरी आरोपांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसून, त्यांच्यावर राणे किंवा अन्य नेत्यांनी कोणतेही आरोप केले तर त्याचा खुलासा मात्र करणार, असे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले. मात्र, प्रदेश काँग्रेसची जशी रणनीती असेल तसे आम्ही काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रणनीती नाही, मात्र आम्ही ठरवलेच : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणनारायण राणे हे आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे ते आमच्यावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तरीही त्यांनी पक्षावर टीका केली, तर आम्ही त्यावर प्रत्युत्तर देणार नाही. ही रणनीती नाही, मात्र आम्ही तसे ठरविले आहे .पक्षाचे काम करून पक्ष मोठा करणे हे आमचे धोरण आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे