शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचीही धाकदपटशा खपवून घेणार नाही

By admin | Updated: October 18, 2015 00:22 IST

नगरपंचायत निवडणूक : वैभववाडीतील व्यापारी, राजकीय पक्षांचा एल्गार

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी परजिल्ह्यातून आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून व्यापारी व नागरिकांना धमकावले जात आहे. परंतु वैभववाडी शहर शांतताप्रिय आहे. त्यामुळे कोणाचीही धाकदपटशा खपवून घेतली जाणार नाही, असा एल्गार व्यापारी व राजकीय पक्षांनी पत्रकार परिषदेत दिला. सज्जनराव रावराणे यांना धमकावल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांसह वैभववाडीतील व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस अधिकाऱ्यांशी त्या घटनेबाबत चर्चा केली. त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर सर्वपक्षीय पत्रकार परिषद झाली. यावेळी वैभववाडी शहर शांतताप्रिय आहे. परंतु, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेरून आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून व्यापारी व नागरिकांना धमकावले जात आहे. त्यामुळे शहरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक प्रत्येक पक्षाने लढवावी. परंतु येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कुठल्याच पक्षाने करू नये. आम्ही वैभववाडीची कणकवली किंवा वेंगुर्ले कदापि होवू देणार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा सर्वपक्षीयांनी दिला. (प्रतिनिधी) सर्वपक्षीय, व्यापारी आक्रमक : भीती निर्माण करु नका; गुंडशाहीला जनता उत्तर देईल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत संबंध आड येतात तेही जपावेच लागतात. त्यामुळे तंबी देऊन, भीती निर्माण करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न कुणी करू नये. सज्जनरावांना दिलेल्या धमकीचा आपण निषेध करतो. जनता याचा जरूर विचार करेल. परंतु वैभववाडीत दहशतवाद खपवून घेणार नाही, असे मत व्यापारी दिगंबर सावंत यांनी व्यक्त केले.बाहेरून माणसे आणून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करुन निवडणूक जिंकता येणार नाही. याचे भान ठेवावे. खेळीमेळीने निवडणुकीचा प्रचार सुरु असताना सज्जनरावांसारख्या जेष्ठांना धमकावले जात आहे. परंतु येथील नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गुंडशाहीला जनताच उत्तर देईल, असे शिवसेनेचे जयेंद्र रावराणे म्हणाले.खेळीमेळीच्या वातावरणात नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू असताना गुंड आणून दहशत निर्माण करण्याची गरज नव्हती. परंतु ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांना गुंड आणावे लागले. परंतु येथील नागरिकांना दहशतवाद नको आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातून मतदार दहशतीचा निषेध नोंदवतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे यांनी व्यक्त केली. बाहेरून माणसे आणून निवडणूक लढविण्याची वेळ येत असेल तर ही पक्ष संपल्याची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा पक्षाने नगरपंचायतीच्या निवडणुकीतून माघार घेतलेली बरी! अशा शब्दात मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विजय रावराणे यांनी टीका केली.