शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सक्षम नेतृत्व नसल्यानेच नगरसेवक फुटले

By admin | Updated: November 29, 2015 00:59 IST

जयेंद्र परूळेकर : दोडामार्गात काँग्रेसने इतिहास रचला, युती नेतृत्वहीन असल्याचा आरोप

सावंतवाडी : काँग्रेसवर घोडेबाजारांचा आरोप करणाऱ्यांनी दोडामार्ग पंचायत समितीच्या निवडणुकीत गाढव बाजार केला होता का? असा सवाल कॉग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केला आहे. युतीकडे सक्ष्म नेतृत्व नसल्यानेच त्यांचे नगरसेवक फुटल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.येथील माजी खासदार कार्यालयात भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोडामार्गचे नूतन नगराध्यक्ष संतोष नानचे याचा सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई,सभापती प्रमोद सावंत, अनिल निरवडेकर, प्रमोद गावडे, संतोष जोईल उपस्थित होते.डॉ. परूळेकर म्हणाले, दोडामार्ग मध्ये काँग्रेस आघाडीने इतिहास रचला असून युतीचे दहा नगरसेवक असतानाही युतीला विजय मिळवता आला नाही. हे दुर्देव आहे. शिवसेना व भाजपमध्ये असलेल्या भांडणामुळेच हे सर्व चित्र उभे राहिले असून काँग्रेसमध्ये विकास करण्याची क्षमता आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी हे वेळोवेळी दाखवून दिले असून दोडामार्ग सरपंचपदी असताना संतोष नानचे यांनी केलेल्या कामामुळेच आज त्यांच्यावर जनतेने विश्वास टाकला आणि तो त्यांनी सार्थ ठरवला आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर हे दोडामार्गमध्ये काँग्रेसने घोडेबाजार केला, असे म्हणतात. मग पंचायत समिती निवडणूकीत तुम्ही काय केले होते. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी तर तत्वाच्या गोष्टी सांगूच नयेत. त्यांनी राष्ट्रवादी सोडताना अनेकांना आपल्या बाजूने घेतले, ते कशाच्या जीवावर हे ही सर्वांना माहीती असून आता पालकमंत्र्याचा त्यांच्याच मतदार संघातही दबदबा राहिला नाही हे सिध्द झाले आहे. दोडामार्ग मधील विजयांने पुन्हा एकदा नारायण राणे यांचे कार्य तालुक्याला अनुभवता येणार असून अनेक विकासांचे प्रकल्प नवीन नगरपालिकेत राबवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. तसेच शिवसेना व भाजपकडे जिल्हयात नेतृत्वच नाही, त्यामुळे नगरसेवक फुटले असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. (प्रतिनिधी)