शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणेंनी वायफळ बडबड थांबवावी

By admin | Updated: October 27, 2015 00:16 IST

विनायक राऊत : वैभववाडीच्या रचनात्मक विकासाची जबाबदारी युतीची

वैभववाडी : विकास कसा बघायचा हे आमदार नीतेश राणे यांना कळत नाही. त्यामुळे त्यांनी वायफळ बडबड थांबवावी आणि आम्ही काय करतो ते शांतपणे पाहत बसावे, असा टोला लगावत लोकसभेपासून सुरु झालेले राजकीय परिवर्तन जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत असेच सुरु राहणार असून वैभववाडीच्या रचनात्मक विकासाची जबाबदारी शिवसेना भाजप युतीने घेतली आहे, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार राऊत वैभववाडीत आले असता त्यांनी जयेंद्र रावराणे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुभाष मयेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, राजेंद्र राणे, नंदू शिंदे, मंगेश लोके, श्रीराम शिंगरे, रोहन रावराणे आदी उपस्थित होते. राऊत पुढे म्हणाले, माजी पालकमंत्री नारायण राणे व त्यांच्या पिलावळीचा खादाडपणा आणि लुबाडण्याच्या धोरणामुळे सिंधुदुर्गची पिछेहाट झाली होती. राणेंच्या जाचातून सुटका झाल्यानंतर आता युती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याची परिस्थिती सुधारत आहे. वैभववाडीच्या विकास आराखड्याची मालवणसारखी स्थिती आम्हाला होऊ द्यायची नाही. बिल्डर, हॉटेल व्यावसायिक स्वत:च्या मालमत्ता वाचविण्यासाठी मालवण नगर परिषदेतील सत्ताधा-यांनी स्थानिकांच्या राहत्या घरांवर आरक्षणे टाकण्याचे पाप केले आहे. ते इथे होऊ द्यायचे नाही; म्हणून येथील मतदारांनी निर्भयपणे युतीच्या उमेदवारांना मतदान करावे. राऊत म्हणाले की, वैभववाडी हे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचे मध्यवर्ती ठिकाण आहे. वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्गामुळे वैभववाडीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. त्यामुळे वैभववाडीचा विकास आराखडा तज्ञांची मते आणि स्थानिकांना विश्वासात घेऊनच रचनात्मक पद्धतीने तयार केला जाईल. केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत १0२ कोटींचे पॅकेज मंजूर झाले आहे. या योजनेमुळे सागरी आणि डोंगरी भागातील पर्यटनाला चालना मिळणार त्यामध्ये गगनगडापासून आंबोलीपर्यंतच्या गावांचा पर्यटन विकास केला जाणार आहे. कणकवली नगरपंचायतीत सुरु असलेली दहशत गुंडगिरी झुगारून माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी वेगळा पर्याय उभारुन कणकवलीकरांची निर्भत्सनेतून सुटका केली. त्याबद्दल अ‍ॅड. खोत यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कणकवलीतील बदलामुळे राणे पितापुत्रांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वैभववाडीतील जनताही विकासासाठी आमच्यासोबत राहिल , असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पारकरांच्या प्रवेशाचे निमंत्रण आजच देतो : राऊत संदेश पारकर यांच्या शिवसेना प्रवेशाला स्थानिक पदाधिका-यांचा विरोध आहे. त्यामुळे मातोश्रीवर पारकरांचा प्रवेश घेऊन दाखवा असे आव्हान आमदार नीतेश राणे यांनी दिले आहे. याबाबत विचारले असता, आम्ही कोणावरही दबाव टाकून पक्षप्रवेश घेत नाही. पारकरांच्या शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण आपण आजच नीतेश राणेंना देत आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.