शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

निर्सगाची हानी नाही थांबली तर भविष्यात धोक्याची घंटा - सतिश लळीत

By अनंत खं.जाधव | Updated: April 8, 2024 19:26 IST

जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने लळीत सन्मानित 

सावंतवाडी : पर्यावरण टिकले तरच निर्सग टिकेल मात्र केंद्रातील सरकार ने पर्यावरणाचे नियमच धाब्यावर बसवले असल्याने बेसुमार वृक्षतोडी बरोबर निसर्गाची हानी सुरू आहे.त्यामुळे आगामी वर्षांत यांचे आपणास दुष्परिणाम भोगावे लागतील याची चाहूल आतापासूनच लागण्यास सुरूवात झाली आहे.असे भिती निवृत्त माहिती व जनसंपर्क उपसंचालक सतिश लळीत यांनी व्यक्त केली.श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी येथे आयोजित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै.जयानंद मठकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प रविवारी पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन या विषयावर लळीत यांनी गुंफले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रान माणूस प्रसाद गावडे यांनी भूषविले.यावेळी जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यी कमल परूळेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसाद पावसकर, डॉ सई लळीत, रमेश बोंद्रे, अँड संदीप निंबाळकर, प्रवीण बांदेकर, सिमा मठकर, मिहीर मठकर डॉ सुमेधा नाईक धुरी उपस्थित होत्या. यावेळी परूळेकर म्हणाल्या, जयानंद मठकर यांच्या बऱ्याच गुणांचा साधर्म्य असणारे सतिश लळीत यांना स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही निवड योग्य आहे. जयानंद मठकर यांना लोकशाही अभिप्रेत होती.आणि तशी लोकशाही आपल्या देशात आहे काय? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे परूळेकर म्हणाल्या.लळीत म्हणाले, मला प्रा मधू दंडवते,जयानंद मठकर यांच्या सान्निध्यात काही दिवस घालवता आले त्यामुळे पुरस्कार स्वीकारताना माझी जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले आपल्याकडे नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण असे दोन भाग आहेत सांस्कृतिक पर्यावरण बदलत असते. मात्र नैसर्गिक पर्यावरणात बदल होत नाही. नैसर्गिक पर्यावरण निर्माण करण्यासाठी भरपूर काळ जावा लागतो. पण नैसर्गिक पर्यावरणावर कुऱ्हाड मारली जाते तेव्हा मोठा पर्यावरणीय ऱ्हास होत आहे. जंगल तोडण्यासाठी दोडामार्ग मध्ये न्यायालयाची बंदी असूनही कुऱ्हाड मारली जात आहे हे दुर्देव आहे. नैसर्गिक जंगल कत्तल झाल्यावर उभ्या राहणाऱ्या कृत्रिम जंगलात नैसर्गिकता नाही. पर्यावरणाबद्दल कोणतीही आस्था नसणारे सरकार दहा वर्षे केंद्रात आहे. अस्तित्वात असलेले कायदे व संस्था नियम वाकवून काम करत आहेत.पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प मंजूर करताना जनतेला कळणार नाही अशी खबरदारी घेतली जात आहे. जलयुक्त शिवार योजना मजुरांची होती पण तीकंत्राटदारांची ठरली आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे लळीत म्हणाले.यावेळी प्रसाद गावडे यांनी जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या परिसराची विस्तृत मांडणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग