शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

निर्सगाची हानी नाही थांबली तर भविष्यात धोक्याची घंटा - सतिश लळीत

By अनंत खं.जाधव | Updated: April 8, 2024 19:26 IST

जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने लळीत सन्मानित 

सावंतवाडी : पर्यावरण टिकले तरच निर्सग टिकेल मात्र केंद्रातील सरकार ने पर्यावरणाचे नियमच धाब्यावर बसवले असल्याने बेसुमार वृक्षतोडी बरोबर निसर्गाची हानी सुरू आहे.त्यामुळे आगामी वर्षांत यांचे आपणास दुष्परिणाम भोगावे लागतील याची चाहूल आतापासूनच लागण्यास सुरूवात झाली आहे.असे भिती निवृत्त माहिती व जनसंपर्क उपसंचालक सतिश लळीत यांनी व्यक्त केली.श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी येथे आयोजित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै.जयानंद मठकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प रविवारी पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन या विषयावर लळीत यांनी गुंफले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रान माणूस प्रसाद गावडे यांनी भूषविले.यावेळी जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यी कमल परूळेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसाद पावसकर, डॉ सई लळीत, रमेश बोंद्रे, अँड संदीप निंबाळकर, प्रवीण बांदेकर, सिमा मठकर, मिहीर मठकर डॉ सुमेधा नाईक धुरी उपस्थित होत्या. यावेळी परूळेकर म्हणाल्या, जयानंद मठकर यांच्या बऱ्याच गुणांचा साधर्म्य असणारे सतिश लळीत यांना स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही निवड योग्य आहे. जयानंद मठकर यांना लोकशाही अभिप्रेत होती.आणि तशी लोकशाही आपल्या देशात आहे काय? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे परूळेकर म्हणाल्या.लळीत म्हणाले, मला प्रा मधू दंडवते,जयानंद मठकर यांच्या सान्निध्यात काही दिवस घालवता आले त्यामुळे पुरस्कार स्वीकारताना माझी जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले आपल्याकडे नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण असे दोन भाग आहेत सांस्कृतिक पर्यावरण बदलत असते. मात्र नैसर्गिक पर्यावरणात बदल होत नाही. नैसर्गिक पर्यावरण निर्माण करण्यासाठी भरपूर काळ जावा लागतो. पण नैसर्गिक पर्यावरणावर कुऱ्हाड मारली जाते तेव्हा मोठा पर्यावरणीय ऱ्हास होत आहे. जंगल तोडण्यासाठी दोडामार्ग मध्ये न्यायालयाची बंदी असूनही कुऱ्हाड मारली जात आहे हे दुर्देव आहे. नैसर्गिक जंगल कत्तल झाल्यावर उभ्या राहणाऱ्या कृत्रिम जंगलात नैसर्गिकता नाही. पर्यावरणाबद्दल कोणतीही आस्था नसणारे सरकार दहा वर्षे केंद्रात आहे. अस्तित्वात असलेले कायदे व संस्था नियम वाकवून काम करत आहेत.पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प मंजूर करताना जनतेला कळणार नाही अशी खबरदारी घेतली जात आहे. जलयुक्त शिवार योजना मजुरांची होती पण तीकंत्राटदारांची ठरली आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे लळीत म्हणाले.यावेळी प्रसाद गावडे यांनी जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या परिसराची विस्तृत मांडणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग